शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

शहरी बस फेब्रुवारीपासून बंद

By admin | Updated: January 6, 2017 23:15 IST

महामंडळाचे महापालिकेला पत्र : पाच वर्षांत ४५ कोटींचा तोटा

सांगली : गेल्या पाच वर्षांत एसटी महामंडळाच्या सांगली आगाराला शहरी बस वाहतुकीतून ४५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे सांगली महापालिकेने बससेवा ताब्यात घ्यावी अथवा ४५ कोटींची भरपाई द्यावी, असा प्रस्ताव राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिला आहे. हा प्रस्ताव महापालिकेने अमान्य केल्यास १ फेब्रुवारीपासून शहरी बससेवा बंद करण्यात येईल, असा इशारा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष रणजितसिंह देओल यांनी दिला आहे. यासंदर्भात उपाध्यक्ष देओल यांनी ४ जानेवारीरोजी महापालिकेच्या आयुक्तांना पत्र दिले आहे. शहरी बससेवा बंद होण्याच्या वृत्ताने सांगली, मिरजेत खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून मात्र या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. राज्यातील रस्ते वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) स्थापना करण्यात आली. महामंडळाकडून काही महापालिकांची हद्द वगळता संपूर्ण राज्यामध्ये टप्पानिहाय प्रवासी वाहतूक चालविली जाते. काही महापालिका, नगरपालिकांच्या हद्दीमध्ये शहरी वाहतूक व ग्रामीण भागासाठी ग्रामीण सेवा चालते. वास्तविक महापालिका हद्दीत प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. मात्र एसटी महामंडळाकडून सामाजिक बांधिलकी या नात्याने महापालिका हद्दीतही शहरी बससेवा सुरू आहे. सांगली महापालिका हद्दीतही महामंडळाकडून शहरी बससेवा सुरू आहे. सांगली, मिरज, कुपवाडसह वीस-बावीस किलोमीटर अंतरातील काही ग्रामीण भागात सिटी बसेस सोडल्या जातात. दररोज महामंडळाकडून दैनंदिन सुमारे ५०० फेऱ्या होतात. मात्र गेल्या पाच वर्षात सांगली, मिरज, कुपवाड या तीन शहरांतील बस वाहतुकीतून महामंडळाला ४५ कोटी ३३ लाख ६९ हजार रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महामंडळाची आर्थिक स्थितीही खालावलेली असून, अशा स्थितीत शहरी वाहतूक चालविणे महामंडळाच्या हिताचे नाही. त्यासाठी महापालिकेने शहरी बस वाहतुकीमुळे होणाऱ्या तोट्याची भरपाई करावी, असा प्रस्ताव महामंडळाचे उपाध्यक्ष देओल यांनी दिला आहे. महापालिकेने ४५ कोटी ३३ लाख रुपयांची भरपाई न दिल्यास १ फेब्रुवारीपासून शहरी बससेवा बंद केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधीं)आतापर्यंत सहा प्रस्ताव : महापालिकेची होणार कोंडीसांगली महापालिकेलगतच्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर या महापालिका शहरी बससेवा चालवितात. त्यामुळे सांगली महापालिकेनेही बससेवा ताब्यात घ्यावी, असा प्रस्ताव महामंडळाकडून देण्यात आला आहे. आतापर्यंत सहावेळा असा प्रस्ताव पालिकेकडे आला होता. पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांनी यापूर्वीच बससेवा चालविण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे प्रत्येकवेळी त्यावर निर्णय होऊ शकला नाही. आता महामंडळानेच बससेवा बंद करण्याचे पत्र दिल्याने पालिकेची कोंडी होणार आहे.