शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शहरी बस फेब्रुवारीपासून बंद

By admin | Updated: January 6, 2017 23:15 IST

महामंडळाचे महापालिकेला पत्र : पाच वर्षांत ४५ कोटींचा तोटा

सांगली : गेल्या पाच वर्षांत एसटी महामंडळाच्या सांगली आगाराला शहरी बस वाहतुकीतून ४५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे सांगली महापालिकेने बससेवा ताब्यात घ्यावी अथवा ४५ कोटींची भरपाई द्यावी, असा प्रस्ताव राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिला आहे. हा प्रस्ताव महापालिकेने अमान्य केल्यास १ फेब्रुवारीपासून शहरी बससेवा बंद करण्यात येईल, असा इशारा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष रणजितसिंह देओल यांनी दिला आहे. यासंदर्भात उपाध्यक्ष देओल यांनी ४ जानेवारीरोजी महापालिकेच्या आयुक्तांना पत्र दिले आहे. शहरी बससेवा बंद होण्याच्या वृत्ताने सांगली, मिरजेत खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून मात्र या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. राज्यातील रस्ते वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) स्थापना करण्यात आली. महामंडळाकडून काही महापालिकांची हद्द वगळता संपूर्ण राज्यामध्ये टप्पानिहाय प्रवासी वाहतूक चालविली जाते. काही महापालिका, नगरपालिकांच्या हद्दीमध्ये शहरी वाहतूक व ग्रामीण भागासाठी ग्रामीण सेवा चालते. वास्तविक महापालिका हद्दीत प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. मात्र एसटी महामंडळाकडून सामाजिक बांधिलकी या नात्याने महापालिका हद्दीतही शहरी बससेवा सुरू आहे. सांगली महापालिका हद्दीतही महामंडळाकडून शहरी बससेवा सुरू आहे. सांगली, मिरज, कुपवाडसह वीस-बावीस किलोमीटर अंतरातील काही ग्रामीण भागात सिटी बसेस सोडल्या जातात. दररोज महामंडळाकडून दैनंदिन सुमारे ५०० फेऱ्या होतात. मात्र गेल्या पाच वर्षात सांगली, मिरज, कुपवाड या तीन शहरांतील बस वाहतुकीतून महामंडळाला ४५ कोटी ३३ लाख ६९ हजार रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महामंडळाची आर्थिक स्थितीही खालावलेली असून, अशा स्थितीत शहरी वाहतूक चालविणे महामंडळाच्या हिताचे नाही. त्यासाठी महापालिकेने शहरी बस वाहतुकीमुळे होणाऱ्या तोट्याची भरपाई करावी, असा प्रस्ताव महामंडळाचे उपाध्यक्ष देओल यांनी दिला आहे. महापालिकेने ४५ कोटी ३३ लाख रुपयांची भरपाई न दिल्यास १ फेब्रुवारीपासून शहरी बससेवा बंद केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधीं)आतापर्यंत सहा प्रस्ताव : महापालिकेची होणार कोंडीसांगली महापालिकेलगतच्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर या महापालिका शहरी बससेवा चालवितात. त्यामुळे सांगली महापालिकेनेही बससेवा ताब्यात घ्यावी, असा प्रस्ताव महामंडळाकडून देण्यात आला आहे. आतापर्यंत सहावेळा असा प्रस्ताव पालिकेकडे आला होता. पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांनी यापूर्वीच बससेवा चालविण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे प्रत्येकवेळी त्यावर निर्णय होऊ शकला नाही. आता महामंडळानेच बससेवा बंद करण्याचे पत्र दिल्याने पालिकेची कोंडी होणार आहे.