शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

शहरी बस फेब्रुवारीपासून बंद

By admin | Updated: January 6, 2017 23:15 IST

महामंडळाचे महापालिकेला पत्र : पाच वर्षांत ४५ कोटींचा तोटा

सांगली : गेल्या पाच वर्षांत एसटी महामंडळाच्या सांगली आगाराला शहरी बस वाहतुकीतून ४५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे सांगली महापालिकेने बससेवा ताब्यात घ्यावी अथवा ४५ कोटींची भरपाई द्यावी, असा प्रस्ताव राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिला आहे. हा प्रस्ताव महापालिकेने अमान्य केल्यास १ फेब्रुवारीपासून शहरी बससेवा बंद करण्यात येईल, असा इशारा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष रणजितसिंह देओल यांनी दिला आहे. यासंदर्भात उपाध्यक्ष देओल यांनी ४ जानेवारीरोजी महापालिकेच्या आयुक्तांना पत्र दिले आहे. शहरी बससेवा बंद होण्याच्या वृत्ताने सांगली, मिरजेत खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून मात्र या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. राज्यातील रस्ते वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) स्थापना करण्यात आली. महामंडळाकडून काही महापालिकांची हद्द वगळता संपूर्ण राज्यामध्ये टप्पानिहाय प्रवासी वाहतूक चालविली जाते. काही महापालिका, नगरपालिकांच्या हद्दीमध्ये शहरी वाहतूक व ग्रामीण भागासाठी ग्रामीण सेवा चालते. वास्तविक महापालिका हद्दीत प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. मात्र एसटी महामंडळाकडून सामाजिक बांधिलकी या नात्याने महापालिका हद्दीतही शहरी बससेवा सुरू आहे. सांगली महापालिका हद्दीतही महामंडळाकडून शहरी बससेवा सुरू आहे. सांगली, मिरज, कुपवाडसह वीस-बावीस किलोमीटर अंतरातील काही ग्रामीण भागात सिटी बसेस सोडल्या जातात. दररोज महामंडळाकडून दैनंदिन सुमारे ५०० फेऱ्या होतात. मात्र गेल्या पाच वर्षात सांगली, मिरज, कुपवाड या तीन शहरांतील बस वाहतुकीतून महामंडळाला ४५ कोटी ३३ लाख ६९ हजार रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महामंडळाची आर्थिक स्थितीही खालावलेली असून, अशा स्थितीत शहरी वाहतूक चालविणे महामंडळाच्या हिताचे नाही. त्यासाठी महापालिकेने शहरी बस वाहतुकीमुळे होणाऱ्या तोट्याची भरपाई करावी, असा प्रस्ताव महामंडळाचे उपाध्यक्ष देओल यांनी दिला आहे. महापालिकेने ४५ कोटी ३३ लाख रुपयांची भरपाई न दिल्यास १ फेब्रुवारीपासून शहरी बससेवा बंद केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधीं)आतापर्यंत सहा प्रस्ताव : महापालिकेची होणार कोंडीसांगली महापालिकेलगतच्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर या महापालिका शहरी बससेवा चालवितात. त्यामुळे सांगली महापालिकेनेही बससेवा ताब्यात घ्यावी, असा प्रस्ताव महामंडळाकडून देण्यात आला आहे. आतापर्यंत सहावेळा असा प्रस्ताव पालिकेकडे आला होता. पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांनी यापूर्वीच बससेवा चालविण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे प्रत्येकवेळी त्यावर निर्णय होऊ शकला नाही. आता महामंडळानेच बससेवा बंद करण्याचे पत्र दिल्याने पालिकेची कोंडी होणार आहे.