सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक घटकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा वापर केल्यास संसर्ग टाळता येणे शक्य आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेला चित्ररथ जिल्ह्यात प्रभावी कामगिरी बजावेल. कोरोना लस ही सुरक्षित असून कोणीही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.
माहिती आणि प्रसारण कार्यालयातर्फ कोरोना लसीकरणाच्या जनजागृतीसाठी मोबाईल व्हॅन तसेच कलापथक मोहिमेच्या प्रारंभावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, हंसराज राऊत, प्रमोद खंडागळे, रणजित पवार उपस्थित होते.