शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

चिंचेला विक्रमी ९,६५५ रुपये दर

By admin | Updated: April 12, 2017 23:46 IST

आवक कमी : जत बाजार समितीमध्ये गतवर्षीपेक्षा क्विंटलला तीन हजार जादा भाव

गजानन पाटील ल्ल संखप्रतिकूल हवामान, कमी प्रमाणात झालेला पाऊस, वातावरणात कमी झालेले आर्द्रतेचे प्रमाण यामुळे जत तालुक्यात चिंचेच्या उत्पादनात घट झाली आहे. कमी उत्पादनामुळे बाजारात चिंचेची आवक कमी आहे. यावर्षी चिंचेला आठवडा बाजारात ७५ रुपये किलो दर मिळत आहे, तर बाजार समिती आवारात झालेल्या सौद्यात चिंचेला ९६५५ रुपये क्विंटल दर मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चिंचेला तीन हजार रुपये दर मिळत आहे.चिंचेचे उत्पादन कमी झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंच आंबटच राहणार आहे. उच्चांकी दर असूनसुध्दा शेतकऱ्यांच्या हाती काहीच मिळत नसल्याने शेतकरी उपाशीच राहिला आहे.तालुक्यातील शेतीच्या बांधावर, पाटालगत, ओढ्यालगत चिंचेच्या झाडांची संख्या निसर्गत:च वाढलेली पाहावयास मिळते. शासनाकडून व सामाजिक वनीकरण विभागाकडून रस्त्याकडेला लावण्यासाठी चिंचेच्या झाडांनाच प्राधान्य दिल्याचेही पाहावयास मिळते. मागील काही वर्षांपासून प्रयोगशील शेतकरी चिंचेची शेतीही करूलागला आहे.यावर्षी तालुक्यामध्ये जुलै महिन्यापासून सप्टेबरपर्यंत पाऊस झाला नाही. परतीच्या मान्सून पावसानेही पाठ फिरवली आहे. कमी पावसामुळे हवामान कोरडे असल्यामुळे जुलै महिन्यात चिंचेला फुलोरा आला नाही. आलेला फुलोराही प्रतिकूल हवामानामुळे गळून गेला. त्यामुळे चिंचेच्या उत्पादनात घट झाली आहे. सध्या बाजारात चिंचेच्या विक्रीला सुरुवात झालेली आहे. आवक कमी असल्याने उच्चांकी दर मिळत आहे. माडग्याळ येथील आठवडा बाजारामध्ये ७५ रुपये किलो दर मिळत आहे. काही शेतकरी चिंचेची पोती भरून बाजारपेठेत सौद्यासाठी पाठवत आहेत. तेथेही चांगला दर मिळत आहे.तासगाव ही चिंचेची पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव बाजारपेठ आहे. राज्यात तासगावशिवाय बार्शी, अहमदनगर येथेही चिंचेचे सौदे होतात. तासगाव ही जवळची बाजारपेठ असल्याने कर्नाटकातून ही चिंच तासगावात येते. दरवर्षी जानेवारी ते एप्रिल असे चार महिने चिंचेचे सौदे सुरु असतात. चिंचेचे सौदे खुले होतात. कोल्हापूर, बेळगाव, सोलापूर, निपाणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील चिंचेचे व्यापारी चिंच विक्री आणि खरेदी करण्यासाठी येतात. ३७२ पोत्यांची आवक झाली. चिंचेच्या प्रतवारीप्रमाणे दर मिळाला. ८ हजार ते ९ हजार ६५५ रुपये क्विंटल दर मिळाला. गेल्यावर्षी चिंचेला ६ हजार ५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा चिंचेला तीन हजार रुपये जादा मिळत आहेत.चिंचोक्यालाही विक्रमी दरचिंच उत्पादक शेतकरी बी. आर. सावंत म्हणाले, कापड उद्योगात खळ करण्यासाठी चिंचोक्यांचा उपयोग होतो. चिंचोके खरेदी करुन, मुंबई, सोलापूर, इचलकरंजी, मालेगाव येथील कापड उद्योगात खळ तयार करण्यासाठी पाठविले जातात. स्टार्च, खळ, पावडर, बुक्का, कुंकू यांच्या निर्मितीत चिंचोक्यांचा वापर होतो. सध्या चिंचोक्यालाही १६० रुपये क्विंटल दर मिळत आहे. गेल्यावर्षी १८ ते २० रुपये किलो दर मिळाला होता. यंदा चिंचेचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात दर चांगला आहे. पण शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. यावर्षी उत्पादन कमी झाल्यामुळे दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. असे असले तरी उत्पादनच नसल्याने शेतकऱ्यांना मात्र दरवाढीचा कोणताही फायदा होणार नाही.