शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अभ्यासाच्या नावाखाली मुलांचे नको ते उद्योग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:24 IST

गेल्या दीड वर्षापासून अपवाद वगळता शाळा पूर्ण बंद आहेत. त्यामुळे घरकोंबडा झालेल्या मुलांना मोबाइलच सर्वात जवळचा मित्र वाटू लागला ...

गेल्या दीड वर्षापासून अपवाद वगळता शाळा पूर्ण बंद आहेत. त्यामुळे घरकोंबडा झालेल्या मुलांना मोबाइलच सर्वात जवळचा मित्र वाटू लागला आहे. ऑनलाइन क्लास आणि शाळांमुळे पालकही मुलांच्या हाती मोबाइल सोपवत आहेत. अनेक कुटुंबांमध्ये मुलांसाठी वेगळा स्मार्टफोनही घेण्यात आला आहे. मुळात स्मार्टफोनची ओळखच दुधारी तलवार अशी केली जाते. त्याचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटेही असल्याने मुलांच्या सवयी, घरातील ज्येष्ठांशी, शेजाऱ्यांशी वागणे, बोलणे पूर्ण बदलले आहे. पालक आणि मुलांमधील सुसंवाद कायम राहावा यासाठी काम करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञांकडे याच तक्रारी वाढत आहेत.

सायबरकडे प्राप्त तक्रारींचा आढावा घेतला तर लॉकडाऊन असतानाही अनेक तक्रारी येत असल्याचे समोर आले आहे. त्यातही पालकांच्या सोशल मीडिया अकांऊटवरून अयोग्य संदेश पाठविणे, फोटो पाठविणे असले प्रकार समोर आले आहेत. सोशल मीडियावर एखादी ‘थ्रीलर’ कथा पाहून तसेच घरातही करण्याचे प्रकार वाढले आहेत. असा नको तो प्रकार घडल्यानंतर याबाबत तक्रार केली जाते, मात्र, घरातीलच मुलांकडून असा प्रकार घडल्याचे समोर आल्यानंतर पालकही अस्वस्थ होत आहेत.

ज्या वयात केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे अशा पौगंडावस्थेत रात्र रात्र जागून मुले गेमची ‘लेवल’ पूर्ण करत आहेत किंवा संकेतस्थळावर अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचे समोर आल्याने मुलांचा ‘बुक टाइम’ऐवजी ‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने पालकांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

चौकट

‘मोबाइल ॲडिक्शन’ घातकच

मानसोपचारतज्ज्ञ पूनम गायकवाड यांनी सांगितले की, वर्षभरात अशा अनेक केसेस येत आहेत. मुलांशी खेळायला कोणी नसल्याने आहे त्या वस्तूमध्येच ते आपला विरंगुळा शोधू लागतात आणि त्याची पुन्हा सवय हाेऊन जाते. यातून मुलांची चिडचिड, आक्रमकपणा वाढतो. त्यामुळे त्यांची ही मोबाइलची सवय एकदम बंद केल्यास ते अजून बैचेन होतात. त्यामुळे हळूहळू ही सवय कमी करायला हवी. पालकांनी वेळीच याकडे लक्ष न दिल्यास अजाणत्या वयात मुलांकडून चुका घडू शकतात.

- शरद जाधव