शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
4
ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
5
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
6
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
7
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
8
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
10
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
11
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
12
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
13
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
14
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
15
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
16
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
17
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
18
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
19
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
20
Shivraj Patil Death: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या दीड मिनिटाच्या यात्रेने मिरजेत जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:41 IST

मिरज : महाजनादेश यात्रेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरजेत केवळ दीड मिनिटाची भेट दिली. मात्र या दीड मिनिटाच्या भेटीने ...

मिरज : महाजनादेश यात्रेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरजेत केवळ दीड मिनिटाची भेट दिली. मात्र या दीड मिनिटाच्या भेटीने दोन दिवस जनजीवन विस्कळीत झाले. सोमवारी दिवसभर विद्युतपुरवठा खंडित केल्याने बहुतांशी रुग्णालयांतील शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. परिणामी रुग्णांची मोठी गैरसोय झाली.महाजनादेश यात्रेतील वाहनांची उंची जास्त असल्याने वीज वितरण विभागाने अनेक ठिकाणी रस्त्यावरील विजेच्या तारा तोडल्याने अनेक रुग्णालयात तपासण्या व शस्त्रक्रिया थांबल्या. सोमवारी आठवड्याच्या पहिल्यादिवशी मिरजेतील बहुतांशी रुग्णालयात रुग्णांची गर्दी असते. मात्र यात्रेची माहिती नसल्याने परगावहून आलेल्या रुग्णांची गैरसोय झाली. मिरजेतील मिशन हॉस्पिटल, मिरज शासकीय रुग्णालय, सिध्दिविनायक कॅन्सर हॉस्पिटल, सेवासदन हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल या मोठ्या हॉस्पिटल्ससह अन्य रुग्णालये गांधी चौक व मिरज-सांगली मार्गाशेजारी आहेत. या भागातीलच विजेच्या तारा तोडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे हॉस्पिटलमधील रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. काही रुग्णालयात जनरेटर भाड्याने आणून तातडीच्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही अनेक भागात वीज तारा जोडण्याचे काम सुरू होते. सोमवारी रात्रीपर्यंत अर्धे शहर अंधारात होते.मुख्यमंत्र्यांच्या रथाची उंची अधिक असल्याने रस्त्यावरील विजेच्या तारा, झाडे तोडण्यासाठी महापालिका व महावितरण कर्मचाऱ्यांची दोन दिवस धावपळ सुरू होती. महाजनादेश यात्रेसाठी सोमवारी दुपारी एकपासून मिरज-सांगली रस्ता बंद करण्यात आल्याने या मार्गावरुन येणाºया वाहनधारकांचे हाल झाले. पंढरपूर व सांगली रस्त्यावरील विजेच्या तारांसोबत केबलच्या ताराही तोडून टाकण्यात आल्या. यामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत शहरातील केबल प्रक्षेपण बंद होते. गांधी चौकातील दुकाने सोमवारी दिवसभर बंद होती.वीज खंडित असल्याने पंढरपूर रस्ता व सांगली रस्त्यावरील राष्ट्रीयीकृत बँकेतील व्यवहार ठप्प होते. अनेक ठिकाणी झाडे तोडली. एवढे करूनही मिरजेला मुख्यमंत्र्यांनी केवळ दीड मिनिटाचा वेळ दिला. मिरजकरांशी ना संवाद साधला, ना भाजप कार्यकर्त्यांशी हितगूज केले. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.