शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मिरजेमध्ये रोखला

By admin | Updated: July 5, 2017 23:33 IST

मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मिरजेमध्ये रोखला

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव भाजपची सत्ता असलेल्या मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी रोखला. जिल्हा परिषदेने खरेदी केलेल्या सौरकंदील व भात मळणी यंत्रांच्या खरेदीत एक कोटीच्या घोटाळ्याची व टाकळी येथील बंधाऱ्याच्या नित्कृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी सदस्यांनी बुधवारी सभेत केली. पंचायत समितीची मासिक सभा सभापती जनाबाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती काकासाहेब धामणे, गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत पार पडली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव सत्ताधारी गटाचे सदस्य राहुल सकळे यांनी मांडला. यास काँग्रेसचे अशोक मोहिते, अजयसिंह चव्हाण, अनिल आमटवणे, रंगराव जाधव, कृष्णदेव कांबळे यांनी जोरदार विरोध केला. जाचक अटींमुळे कर्जमाफीस बहुसंख्य शेतकरी अपात्र असल्याचे कृष्णदेव कांबळे यांनी निदर्शनास आणले. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या कर्जमाफीऐवजी, निकष न लावता सर्व शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमाफी दिल्यानंतर अभिनंदनाचा ठराव घ्या, असे सांगत हा ठराव राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी रोखून धरला. उपसभापती धामणे यांनी ठरावाचा आग्रह धरला. मात्र विरोधी सदस्यांच्या विरोधामुळे तो बारगळला. बहुमत असतानाही भाजप सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली. जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केलेल्या एलईडी सौरकंदील व भात मळणी यंत्र खरेदी घोटाळ्याची अशोक मोहिते यांनी तक्रार केली. खरेदीची रक्कम व साहित्य दोन्हीही ठेकेदाराकडे असल्याने, यातही घोटाळा असल्याने संबंधितांची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी मोहिते यांनी केली.टाकळीतील बंधारा निकृष्ट मुख्यमंत्र्यांच्या जलशिवार योजनेअंतर्गत टाकळी येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यासाठी मातीमिश्रित वाळू व मातीचा वापर करण्यात आला असल्याने सिमेंट बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ग्रामस्थांनी विरोध करूनही ते पूर्ण करण्यात आले आहे. या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी अनिल आमटवणे यांनी केली. विविध विषयांच्या चर्चेत विक्रम पाटील, छाया हत्तीकर, दिलीपकुमार पाटील, शुभांगी सावंत यांनी सहभाग घेतला.हिंदू-मुस्लिम निरपराधांवरील खटलेही मागे घ्यामिरज दंगलप्रकरणी फक्त भाजपचे मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांवरील गुन्हेच मागे घेण्यात आले आहेत. दंगलीत अडकलेल्या सर्व हिंदू-मुस्लिम निरपराध तरूणांवरील गुन्हेही शासनाने मागे घेण्याची मागणी काँग्रेसचे अनिल आमटवणे यांनी केली. दोन्ही गटाच्या तरूणांवरील खटले मागे घेण्यासाठी प्रयत्न केल्यास आ. सुरेश खाडे यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असेही आमटवणे यांनी सांगितले.