शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मिरजेमध्ये रोखला

By admin | Updated: July 5, 2017 23:33 IST

मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मिरजेमध्ये रोखला

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव भाजपची सत्ता असलेल्या मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी रोखला. जिल्हा परिषदेने खरेदी केलेल्या सौरकंदील व भात मळणी यंत्रांच्या खरेदीत एक कोटीच्या घोटाळ्याची व टाकळी येथील बंधाऱ्याच्या नित्कृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी सदस्यांनी बुधवारी सभेत केली. पंचायत समितीची मासिक सभा सभापती जनाबाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती काकासाहेब धामणे, गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत पार पडली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव सत्ताधारी गटाचे सदस्य राहुल सकळे यांनी मांडला. यास काँग्रेसचे अशोक मोहिते, अजयसिंह चव्हाण, अनिल आमटवणे, रंगराव जाधव, कृष्णदेव कांबळे यांनी जोरदार विरोध केला. जाचक अटींमुळे कर्जमाफीस बहुसंख्य शेतकरी अपात्र असल्याचे कृष्णदेव कांबळे यांनी निदर्शनास आणले. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या कर्जमाफीऐवजी, निकष न लावता सर्व शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमाफी दिल्यानंतर अभिनंदनाचा ठराव घ्या, असे सांगत हा ठराव राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी रोखून धरला. उपसभापती धामणे यांनी ठरावाचा आग्रह धरला. मात्र विरोधी सदस्यांच्या विरोधामुळे तो बारगळला. बहुमत असतानाही भाजप सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली. जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केलेल्या एलईडी सौरकंदील व भात मळणी यंत्र खरेदी घोटाळ्याची अशोक मोहिते यांनी तक्रार केली. खरेदीची रक्कम व साहित्य दोन्हीही ठेकेदाराकडे असल्याने, यातही घोटाळा असल्याने संबंधितांची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी मोहिते यांनी केली.टाकळीतील बंधारा निकृष्ट मुख्यमंत्र्यांच्या जलशिवार योजनेअंतर्गत टाकळी येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यासाठी मातीमिश्रित वाळू व मातीचा वापर करण्यात आला असल्याने सिमेंट बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ग्रामस्थांनी विरोध करूनही ते पूर्ण करण्यात आले आहे. या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी अनिल आमटवणे यांनी केली. विविध विषयांच्या चर्चेत विक्रम पाटील, छाया हत्तीकर, दिलीपकुमार पाटील, शुभांगी सावंत यांनी सहभाग घेतला.हिंदू-मुस्लिम निरपराधांवरील खटलेही मागे घ्यामिरज दंगलप्रकरणी फक्त भाजपचे मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांवरील गुन्हेच मागे घेण्यात आले आहेत. दंगलीत अडकलेल्या सर्व हिंदू-मुस्लिम निरपराध तरूणांवरील गुन्हेही शासनाने मागे घेण्याची मागणी काँग्रेसचे अनिल आमटवणे यांनी केली. दोन्ही गटाच्या तरूणांवरील खटले मागे घेण्यासाठी प्रयत्न केल्यास आ. सुरेश खाडे यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असेही आमटवणे यांनी सांगितले.