शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

पाणी साचलंय कुठे, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवावे!

By admin | Updated: October 30, 2015 23:16 IST

जयंत पाटील : २४ टीएमसी म्हणजे किती पाणी, हे त्यांना कळते का? राष्ट्रवादीचा आटपाडी तहसीलवर मोर्चा

आटपाडी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात आले, ते जलयुक्त शिवार योजनेमुळं पाणी कुठं-कुठं अडलंय हे पाहायला. त्यांचा दावा आहे की या खड्ड्यांमध्ये राज्यात २४ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला. ही नुसती धूळफेक आहे. २४ टीएमसी म्हणजे किती पाणी, हे त्यांना कळते का? मराठवाड्यात पाऊस झाला नाही, तिथे पाणी कसे साचेल? कुठल्या जिल्ह्यात आणि कुठल्या तालुक्यात पाणी साचले आहे, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवावे, असे आव्हान माजी ग्रामीण विकासमंत्री तथा आ. जयंत पाटील यांनी येथे दिले.राष्ट्रवादीच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. बस स्थानकापासून मुख्य व्यापारी पेठेतून घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तिथे आंदोलकांसमोर बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले की, लोकांनी हौसेने निवडून दिलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या शासनाने वर्षभरात सामान्यांचे संसार मोडायला सुरुवात केली आहे. प्रसारमाध्यमांना सांगण्यासाठी मुद्दे सरकारकडे नाहीत. ग्रामीण भागाला, दुष्काळी भागाला दिलासा देणारे हे सरकार नाही. आमच्या १५ वर्षांच्या कालावधित आम्ही टेंभू आणि म्हैसाळ योजनेला पैसे देताना कधी मोजदाद केली नाही. जोपर्यंत या योजना पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मुबलक मोफत पाणी दिले. टंचाईतून वीजबिल भरत होतो. आता म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी, ज्या शेतकऱ्यांनी पाणी वापरलं नाही, त्यांच्याही सात-बारावर चढविण्याचे काम सुरू आहे.आमची सत्ता गेली, याचं दु:ख नाही. जनतेला या शासनाकडून ज्या आशा-अपेक्षा होत्या, त्यांचा चुराडा झाला, याचं दु:ख आहे. राज्यातील तीन विचारवंतांच्या हत्या झाल्या. समीर गायकवाडला अटक करताच मास्टर मार्इंड रुद्रगौडाला अटक करण्यात राज्य आणि केंद्राच्या पोलिसांना अपयश आले. रुद्रगौडाला तात्काळ अटक झाली असती, तर सनातन अथवा खुन्यांच्या पाठीमागे असलेला राजकीय पक्ष उघड झाला असता. आता ते होणार नाही. केंद्र शासनाने तुरीची आधारभूत किंमत वाढविली असती, तर तुरडाळ महाग झाली नसती. परवा मुख्यमंत्री फडणवीस पडळकरवाडीला आले. तेव्हा प्रत्येक अर्थसंकल्पानंतर पश्चिम महाराष्ट्रात निधी नेला, म्हणून ते ओरडायचे. अनुशेषावर दोन शब्दही ते बोलत नाहीत. योजना रखडल्याचे पाप त्यांचेच आहे. खेद व्यक्त करून आता दोन पावलं टाकतो, असे त्यांनी बोलायला पाहिजे. धनगर आरक्षणही त्यांनी दिले नाही, असे पाटील म्हणाले.माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले की, देशातील एक नंबरचा हा दुष्काळी भाग आहे. पीक निघाल्यावर पाणीपट्टी मागितली जाते. पण याच भागावर प्रयोग सुरू आहेत. आधी पाणीपट्टी द्या म्हणत आहेत. आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील सर्व तलाव वर्षातून चारवेळा भरून दिले, तर दोन्हीही तालुक्यातील इंच न् इंच जमीन ओलिताखाली येईल. परिसरातील सर्व साखर कारखान्यांची क्षमता वाढवावी लागेल. पण सध्या पाटबंधारे विभागाच टेंभू योजनेच्या कार्यक्षेत्राबद्दल संभ्रमात आहे. तलावातून बंद पाईपलाईनने पाणी नेऊन एकरी १८ ते २० हजार पाणीपट्टी द्यायला आम्ही तयार आहोत, पण पाणी द्यायला तयार नाहीत. या सरकारने सहा महिन्यांत पैसे निर्माण करून रिझल्ट द्यायला पाहिजे होते.यावेळी हणमंतराव देशमुख, माजी सभापती सुमन नागणे, सावंता पुसावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, विद्या देशपांडे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश देशमुख, बाबासाहेब मुळीक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हर्षवर्धन देशमुख, किसनराव जानकर, भगवानराव मोरे, सरपंच स्वाती सागर, भागवत माळी, दादासाहेब पाटील, बळी मोरे, भीमराव वाघमारे, नारायण चवरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. (वार्ताहर)बाबर यांना विनाशकाले विपरित बुद्धी!पडळकरवाडीला मुख्यमंत्री आले तेव्हा आ. बाबर तिथे गेले नाहीत. आ. बाबर यांना विनाशकाले विपरित बुद्धी सुचली. त्यांना आम्ही सन्मानाची वागणूक देत होतो. शिवसेनेचा कुठलाही आमदार बघितला, तर मुख्यमंत्र्यांचे मस्तक हलते. मातोश्रीवर गेले आणि आठ तास थांबल्यानंतर निरोप येतो, साहेब आज खाली येणार नाहीत. राजेंद्रअण्णांनी आता शरद पवारांना फोन करू द्या, त्यांनी नाही उचलला तर नाव बदलून ठेवा, असे आवाहन करून, काळ मोठा विपरित आला आहे, अशी खंत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली.शेतकऱ्यांची फसवणूक : मुख्यमंत्र्यांकडून धूळफेक राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यानंतर धुतल्या तांदळासारखे आणि सर्व ज्ञान असणारे जयंत पाटील हे नेते आहेत, असे कौतुक करून राजेंद्रअण्णा देशमुख यांनी, पाण्यावर पीक आले आणि हुरडा झाल्यावर शिवारफेरी असते. शिवारात काहीच नसताना मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली. कामापेक्षा अपमानावरच त्यांचे लक्ष अधिक होते. आपल्या आमदारांचा त्यांनी अपमान केला, असा आरोप केला.