शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

Lok Sabha Election 2019 घोटाळ्यातील पैशातूनच विखेंचे तोंड मुख्यमंत्र्यांनी बंद केले का? : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:15 IST

दहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार होते. त्यांनी असे न करता, विखेंचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे त्याच

ठळक मुद्देआणखी दहा हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढणार

सांगली : दहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार होते. त्यांनी असे न करता, विखेंचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे त्याच पैशातून त्यांनी विखेंचे तोंड बंद केले आहे का, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

ते म्हणाले की, मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत फडणवीस सरकारने बिल्डरांना एक लाख कोटीचा फायदा करून देताना दहा हजार कोटीचा सौदा केल्याचा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला होता. दहा हजार कोटींपैकी पाच हजार कोटींचा पहिला हप्ता मुख्यमंत्री कार्यालयास मिळाल्याचेही विखे-पाटील यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांना हा आरोप जिव्हारी लागला. त्यामुळे त्यांनी विखे-पाटील यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. यानंतर काही काळातच त्यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे विखे-पाटील यांचे तोंड याच पाच हजार कोटी रुपयांमधून बंद केले का, अशी शंका उपस्थित होत आहे.

कोल्हापूर येथील सभेत फडणवीस यांनी माझ्यावर, चोरांच्या कळपात गेल्याचा आरोप केला होता. मी कोणाच्या कळपात गेलो आहे हे जनतेला माहीत आहे. मात्र मुख्यमंत्री असूनही ते दरोडेखोरांच्या कळपात गेलेत, हे केव्हाच लोकांनी ओळखले आहे. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप या सरकारवर झाले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या टोळीबद्दल चिंतन करावे आणि त्यानंतर माझ्यावर आरोप करावेत. निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देताना या सरकारचे बिंगही फोडू, असा इशाराही त्यांनी दिला.बांधकाम कामगार मंडळाशी संबंधित दहा हजार कोटी रुपयांचा एक घोटाळा समोर येत आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी त्याबाबतचा पंचनामा मी करणार आहे, असे ते म्हणाले....तर काँग्रेसविरोधातही शड्डूभाजपबरोबर गेल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताविरोधात निर्णय घेण्यास सुरुवात केल्यानंतर मी सरकारमधून बाहेर पडलो. काँग्रेस पक्षाबरोबर आता आघाडी केली असली तरी, भविष्यात त्यांनीही शेतकऱ्यांविरोधात एखादी गोष्ट केली, तर त्यांच्याविरोधातही आम्ही शड्डू ठोकू. आम्ही केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी बांधील आहोत, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.चौकीदाराला चोर म्हणणारे सध्या भाजपसोबतचौकीदार चोर आहे, असे उघडपणे सांगत फिरणारे शिवसेनेचे नेते आता त्यांच्या चौकीदाराचे गोडवे गाताना दिसत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात आमची लढाई भाजप व शिवसेनेसोबत राहील. लोकशाहीसाठी धोकादायक असे हे सरकार आहे. त्यामुळे त्यांना वेळीच देशातून आणि राज्यातून हद्दपार करणे गरजेचे आहे, असेही शेट्टी म्हणाले.‘स्वाभिमानी’चा उद्या प्रचार प्रारंभस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रचार प्रारंभ येत्या २७ मार्चरोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडेमच्छिंद्र या जन्मभूमीत दुपारी दोन वाजता होणार आहे. त्यानंतर आम्ही राज्यभर प्रचारसभा घेणार आहोत, असे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक