शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Lok Sabha Election 2019 घोटाळ्यातील पैशातूनच विखेंचे तोंड मुख्यमंत्र्यांनी बंद केले का? : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:15 IST

दहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार होते. त्यांनी असे न करता, विखेंचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे त्याच

ठळक मुद्देआणखी दहा हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढणार

सांगली : दहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार होते. त्यांनी असे न करता, विखेंचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे त्याच पैशातून त्यांनी विखेंचे तोंड बंद केले आहे का, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

ते म्हणाले की, मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत फडणवीस सरकारने बिल्डरांना एक लाख कोटीचा फायदा करून देताना दहा हजार कोटीचा सौदा केल्याचा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला होता. दहा हजार कोटींपैकी पाच हजार कोटींचा पहिला हप्ता मुख्यमंत्री कार्यालयास मिळाल्याचेही विखे-पाटील यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांना हा आरोप जिव्हारी लागला. त्यामुळे त्यांनी विखे-पाटील यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. यानंतर काही काळातच त्यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे विखे-पाटील यांचे तोंड याच पाच हजार कोटी रुपयांमधून बंद केले का, अशी शंका उपस्थित होत आहे.

कोल्हापूर येथील सभेत फडणवीस यांनी माझ्यावर, चोरांच्या कळपात गेल्याचा आरोप केला होता. मी कोणाच्या कळपात गेलो आहे हे जनतेला माहीत आहे. मात्र मुख्यमंत्री असूनही ते दरोडेखोरांच्या कळपात गेलेत, हे केव्हाच लोकांनी ओळखले आहे. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप या सरकारवर झाले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या टोळीबद्दल चिंतन करावे आणि त्यानंतर माझ्यावर आरोप करावेत. निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देताना या सरकारचे बिंगही फोडू, असा इशाराही त्यांनी दिला.बांधकाम कामगार मंडळाशी संबंधित दहा हजार कोटी रुपयांचा एक घोटाळा समोर येत आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी त्याबाबतचा पंचनामा मी करणार आहे, असे ते म्हणाले....तर काँग्रेसविरोधातही शड्डूभाजपबरोबर गेल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताविरोधात निर्णय घेण्यास सुरुवात केल्यानंतर मी सरकारमधून बाहेर पडलो. काँग्रेस पक्षाबरोबर आता आघाडी केली असली तरी, भविष्यात त्यांनीही शेतकऱ्यांविरोधात एखादी गोष्ट केली, तर त्यांच्याविरोधातही आम्ही शड्डू ठोकू. आम्ही केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी बांधील आहोत, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.चौकीदाराला चोर म्हणणारे सध्या भाजपसोबतचौकीदार चोर आहे, असे उघडपणे सांगत फिरणारे शिवसेनेचे नेते आता त्यांच्या चौकीदाराचे गोडवे गाताना दिसत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात आमची लढाई भाजप व शिवसेनेसोबत राहील. लोकशाहीसाठी धोकादायक असे हे सरकार आहे. त्यामुळे त्यांना वेळीच देशातून आणि राज्यातून हद्दपार करणे गरजेचे आहे, असेही शेट्टी म्हणाले.‘स्वाभिमानी’चा उद्या प्रचार प्रारंभस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रचार प्रारंभ येत्या २७ मार्चरोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडेमच्छिंद्र या जन्मभूमीत दुपारी दोन वाजता होणार आहे. त्यानंतर आम्ही राज्यभर प्रचारसभा घेणार आहोत, असे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक