शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

Lok Sabha Election 2019 घोटाळ्यातील पैशातूनच विखेंचे तोंड मुख्यमंत्र्यांनी बंद केले का? : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:15 IST

दहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार होते. त्यांनी असे न करता, विखेंचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे त्याच

ठळक मुद्देआणखी दहा हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढणार

सांगली : दहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार होते. त्यांनी असे न करता, विखेंचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे त्याच पैशातून त्यांनी विखेंचे तोंड बंद केले आहे का, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

ते म्हणाले की, मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत फडणवीस सरकारने बिल्डरांना एक लाख कोटीचा फायदा करून देताना दहा हजार कोटीचा सौदा केल्याचा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला होता. दहा हजार कोटींपैकी पाच हजार कोटींचा पहिला हप्ता मुख्यमंत्री कार्यालयास मिळाल्याचेही विखे-पाटील यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांना हा आरोप जिव्हारी लागला. त्यामुळे त्यांनी विखे-पाटील यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. यानंतर काही काळातच त्यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये घेतले. त्यामुळे विखे-पाटील यांचे तोंड याच पाच हजार कोटी रुपयांमधून बंद केले का, अशी शंका उपस्थित होत आहे.

कोल्हापूर येथील सभेत फडणवीस यांनी माझ्यावर, चोरांच्या कळपात गेल्याचा आरोप केला होता. मी कोणाच्या कळपात गेलो आहे हे जनतेला माहीत आहे. मात्र मुख्यमंत्री असूनही ते दरोडेखोरांच्या कळपात गेलेत, हे केव्हाच लोकांनी ओळखले आहे. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप या सरकारवर झाले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या टोळीबद्दल चिंतन करावे आणि त्यानंतर माझ्यावर आरोप करावेत. निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देताना या सरकारचे बिंगही फोडू, असा इशाराही त्यांनी दिला.बांधकाम कामगार मंडळाशी संबंधित दहा हजार कोटी रुपयांचा एक घोटाळा समोर येत आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी त्याबाबतचा पंचनामा मी करणार आहे, असे ते म्हणाले....तर काँग्रेसविरोधातही शड्डूभाजपबरोबर गेल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताविरोधात निर्णय घेण्यास सुरुवात केल्यानंतर मी सरकारमधून बाहेर पडलो. काँग्रेस पक्षाबरोबर आता आघाडी केली असली तरी, भविष्यात त्यांनीही शेतकऱ्यांविरोधात एखादी गोष्ट केली, तर त्यांच्याविरोधातही आम्ही शड्डू ठोकू. आम्ही केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी बांधील आहोत, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.चौकीदाराला चोर म्हणणारे सध्या भाजपसोबतचौकीदार चोर आहे, असे उघडपणे सांगत फिरणारे शिवसेनेचे नेते आता त्यांच्या चौकीदाराचे गोडवे गाताना दिसत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात आमची लढाई भाजप व शिवसेनेसोबत राहील. लोकशाहीसाठी धोकादायक असे हे सरकार आहे. त्यामुळे त्यांना वेळीच देशातून आणि राज्यातून हद्दपार करणे गरजेचे आहे, असेही शेट्टी म्हणाले.‘स्वाभिमानी’चा उद्या प्रचार प्रारंभस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रचार प्रारंभ येत्या २७ मार्चरोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडेमच्छिंद्र या जन्मभूमीत दुपारी दोन वाजता होणार आहे. त्यानंतर आम्ही राज्यभर प्रचारसभा घेणार आहोत, असे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक