शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’बाबत मुख्यमंत्र्यांना विसर

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

सुमनताई पाटील : बेमुदत उपोषण करण्याचा इशारा; आठवड्याची मुदत

कवठेमहांकाळ : नागपूर अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासमोर दिलेल्या आश्वासनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विसर पडला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेली म्हैसाळ योजना सुरू करण्याबाबत शासन चालढकल करीत आहे. सात दिवसात म्हैसाळ योजना सुरू करावी, अन्यथा शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा आमदार सुमनताई पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. आ. सुमनताईनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पाणी योजनांची थकबाकी सात-बारावर बोजा म्हणून न चढविता ती माफ व्हावी, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन टंचाई निधीतून वीज बिलांची तरतूद करावी, म्हैसाळ योजना तात्काळ सुरू करण्याची आमची मागणी आहे. यासाठी मंगळवार दि. १५ डिसेंबर रोजी आमदार गणपतराव देशमुख, आ. जयंतराव पाटील, आ. विद्या चव्हाण, आ. दीपिका चव्हाण, आ. ज्योती कलाणी, आ. कपिल पाटील यांच्यासह विधानभवनच्या पायरीवर उपोषणाला बसलो होतो.हे उपोषण मागे घेण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तात्काळ उपोषणस्थळी पाठवले होते. त्यानुसार बुधवारी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीला अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूल तथा मदत आणि पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय बापू शिवतारे, अजितदादा पवार, पतंगराव कदम, आ. गणपतराव देशमुख, आ. विलासराव जगताप, आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, आ. सुरेश खाडे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता उपासे, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता हेमंत उनाले यांच्यासह पाटबंधारे, ऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत मदत व पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळी भागातील बळिराजाला वाचविण्यासाठी योजना चालू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांनीही वीज बिलात सूट देण्याचे आश्वासन दिले. या बैठकीनंतर अजितदादा पवार, जयंतराव पाटील यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक झाली. अधिवेशन झाल्यानंतर आठ दिवसांत बैठक घेऊन योजना चालू करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. पण त्यांना आश्वासनाचा विसर पडला. अधिवेशन होऊन दहा दिवस झाले तरी योजना सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलली नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पण या परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. (वार्ताहर)जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, ही माझी जबाबदारी आहे. ती झटकणार नाही. योग्य ती कार्यवाही करून सात दिवसांत योजना चालू करावी अशी मागणी गुरुवारी परत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. ती पूर्ण झाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा सुमनतार्इंनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.