शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

‘म्हैसाळ’बाबत मुख्यमंत्र्यांना विसर

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

सुमनताई पाटील : बेमुदत उपोषण करण्याचा इशारा; आठवड्याची मुदत

कवठेमहांकाळ : नागपूर अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासमोर दिलेल्या आश्वासनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विसर पडला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेली म्हैसाळ योजना सुरू करण्याबाबत शासन चालढकल करीत आहे. सात दिवसात म्हैसाळ योजना सुरू करावी, अन्यथा शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा आमदार सुमनताई पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. आ. सुमनताईनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पाणी योजनांची थकबाकी सात-बारावर बोजा म्हणून न चढविता ती माफ व्हावी, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन टंचाई निधीतून वीज बिलांची तरतूद करावी, म्हैसाळ योजना तात्काळ सुरू करण्याची आमची मागणी आहे. यासाठी मंगळवार दि. १५ डिसेंबर रोजी आमदार गणपतराव देशमुख, आ. जयंतराव पाटील, आ. विद्या चव्हाण, आ. दीपिका चव्हाण, आ. ज्योती कलाणी, आ. कपिल पाटील यांच्यासह विधानभवनच्या पायरीवर उपोषणाला बसलो होतो.हे उपोषण मागे घेण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तात्काळ उपोषणस्थळी पाठवले होते. त्यानुसार बुधवारी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीला अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूल तथा मदत आणि पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय बापू शिवतारे, अजितदादा पवार, पतंगराव कदम, आ. गणपतराव देशमुख, आ. विलासराव जगताप, आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, आ. सुरेश खाडे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता उपासे, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता हेमंत उनाले यांच्यासह पाटबंधारे, ऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत मदत व पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळी भागातील बळिराजाला वाचविण्यासाठी योजना चालू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांनीही वीज बिलात सूट देण्याचे आश्वासन दिले. या बैठकीनंतर अजितदादा पवार, जयंतराव पाटील यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक झाली. अधिवेशन झाल्यानंतर आठ दिवसांत बैठक घेऊन योजना चालू करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. पण त्यांना आश्वासनाचा विसर पडला. अधिवेशन होऊन दहा दिवस झाले तरी योजना सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलली नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पण या परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. (वार्ताहर)जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, ही माझी जबाबदारी आहे. ती झटकणार नाही. योग्य ती कार्यवाही करून सात दिवसांत योजना चालू करावी अशी मागणी गुरुवारी परत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. ती पूर्ण झाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा सुमनतार्इंनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.