शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी भूमिका बदलली हेच यश

By admin | Updated: June 12, 2017 23:33 IST

मुख्यमंत्र्यांनी भूमिका बदलली हेच यश

! लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : शेतकऱ्यांना कर्जमाफी करा अशी मागणी अधिवेशनात दोनवेळा केली. पहिल्यांदा तीन दिवस काम बंद पाडले. कर्जमाफीचा शेतकऱ्यांना नव्हे तर बँकांना फायदा होतो, त्यामुळे मी कर्जमाफी देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. तर दुसऱ्यांदा अधिवेशनात आमचा आवाज दाबण्यासाठी विरोधी आमदारांना निलंबित करण्याचे अस्त्र उगारले. मग आम्ही ‘चांदा ते बांदा’ बसयात्रा काढली. त्यातच शेतकऱ्यांनीही आंदोलन सुरू केले. आणि ताठर भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. आपली भूमिका बदलावी लागली. हेच आमचे यश आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. कऱ्हाड येथे आपल्या निवासस्थानी चव्हाण माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, इंद्रजीत चव्हाण यांची उपस्थिती होती. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात कर्जमाफी करणार नाही, असे म्हणणाऱ्या भाजप सरकारने उत्तर प्रदेशात मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. साहजिकच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भावना तिव्र झाल्या. शेतकऱ्यांचा सताप पाहिल्यानंतर संवाद संपलेल्या सरकारला संवाद यात्रा काढावी लागली. मात्र, त्यातुनही त्यांच्या हाती काहीही लागले नाही. आज त्यांनी जाहिर केलेला कर्जमाफीचा निर्णय काही दिवस अगोदर जाहिर केला असता तर चार आत्महत्या कमी झाल्या असत्या, असेही ते म्हणाले. कर्जमाफीच्या निर्णयाबाबत बोलताना आमदार चव्हाण म्हणाले, कर्जमाफीची घोषणा झाली, ही बाब अतिशय महत्वपुर्ण आहे. त्याबाबत श्रेयवादाची लढाई करण्याची गरज नाही. मात्र, ही कर्जमाफीची घोषणा करायला भाग पाडण्यामागे आमची भुमिका महत्वाची ठरली हे नाकारता येणार नाही. गेली दोन वर्ष आम्ही सरकारच्या धोरणाबाबत बोलत असताना प्रस्थापित शेतकरी संघटनांचे नेते कोठे होते, हा संशोधनाचा भाग आहे. पण शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले त्याला प्रतिसाद वाढला, आणि हे शेतकऱ्यांचे आंदोलन आपल्या हातात राहणार नाही, असे जेव्हा नेत्यांना वाटले तेव्हा ते सक्रिय झाले असा टोलाही त्यांनी नाव न घेता लगावला. स्वामीनाथन आयोग लागू करावा... कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासाठी लगेचच अंमलबजावणी करायला हवी. टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर पैसे वर्ग करायला हवेत. तरच त्या शेतकऱ्याला नविन कर्ज मिळणार आहे. त्याचबरोबर स्वामिनाथन आयोग लागू करू, असे निवडणुकीपूर्वी म्हणणाऱ्या भाजपने आता स्वत:ची सत्ता असल्याने हा आयोग लागू करायला हरकत नाही, असा चिमटाही पृथ्वीराज चव्हाण काढला.