शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

घड्याळाची ‘भानगड’ मुख्यमंत्र्यांच्या कानी

By admin | Updated: February 8, 2016 01:18 IST

महापौर निवड : जिल्हाधिकारी, नगरसचिवांविरोधात स्वरदा केळकर, युवराज बावडेकरांची तक्रार

सांगली : महापौर व उपमहापौर पदाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करतेवेळी घड्याळाचे काटे फिरवून केलेली भानगड आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे. नगरसेविका स्वरदा केळकर आणि युवराज बावडेकर यांनी यासंदर्भात रविवारी कोल्हापूर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तशी तक्रार केली. पुराव्यासह लेखी तक्रार केल्यास याप्रकरणी चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले. केळकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, काँग्रेसचे महापौर पदाचे उमेदवार हारूण शिकलगार व उपमहापौर पदाचे उमेदवार विजय घाडगे यांनी त्यांचे अर्ज वेळेत दाखल केलेले नव्हते. त्यांच्या समर्थकांनी घड्याळाचे काटे फिरवून वेळेत बदल केला असल्याने, त्यांचे अर्ज रद्दबातल ठरविणे गरजेचे होते. याबाबत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीसोबत अर्ज दाखल करतेवेळीची व्हिडीओ क्लीपही सादर करण्यात आली होती. तरीही त्याची दखल घेतली गेली नाही. पुराव्यांकडे दुर्लक्ष करून तक्रारदारांच्या विरोधातच निर्णय देण्यात आला. महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. शिकलगार व घाडगे यांनी सव्वापाच वाजता अर्ज दाखल केले आहेत. याबाबतची व्हिडीओ क्लीप आहे. त्यात स्पष्टपणे नगरसेविकापुत्र मंगेश चव्हाण घड्याळाचे काटे फिरवित असल्याचे दिसून येत आहे. घड्याळाचे काटे फिरवून पुन्हा ते भिंतीवर लावण्यात आले.शासकीय इमारतीत येऊन निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप झाला आहे, त्यामुळे या दोघांचेही अर्ज रद्द करावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. इतका मोठा पुरावा सादर करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने, रविवारी केळकर यांनी कोल्हापुरात जाऊन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यांच्याकडेच नगरविकास खाते असल्याने त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश द्यावेत, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप खपवून घेतल्याप्रकरणी नगरसचिव चंद्रकांत आडके यांना निलंबित करावे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांचीही याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी गाजण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)निवडीला वादाचे ग्रहणमहापौर निवडीला आता वादाचे ग्रहण लागले आहे. पक्षांतर्गत वाद, राजकीय संघर्ष आणि कुरघोड्यांचे राजकारण थांबल्यानंतर आता बेकायदेशीर प्रक्रियेचा वाद थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात गेला आहे. महापौर, उपमहापौर निवडी रद्द करण्याची मागणी नगरविकास खात्यापर्यंत पोहोचली असल्यामुळे, हे ग्रहण आता लवकर सुटण्याची चिन्हे नाहीत. ‘स्वाभिमानी’चा एकाकी लढास्वाभिमानी आघाडीने निवड प्रक्रियेविरोधात चालविलेला लढा एकाकी ठरत आहे. राष्ट्रवादीने यासंदर्भात कोणतीही तक्रार केलेली नाही. कोणी सोबत आले नाही तरी, हा प्रश्न तडीस नेण्याचा निर्धार स्वाभिमानी आघाडीच्या नगरसेवकांनी केला आहे. जनहित याचिकाहीमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतरही याप्रकरणी आपण जनहित याचिका दाखल करणार असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले. कायदा पायदळी तुडविणाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे त्या म्हणाल्या. याप्रकरणी केळकर यांना पुराव्यासह तक्रार सादर करण्याची सूचना दिली. तक्रार प्राप्त होताच तातडीने चौकशीचे आदेश देण्यात येतील व वस्तुस्थिती तपासून कारवाईबाबत पावले उचलली जातील, असेही ते म्हणाले.