शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील ४३ कोटीच्या सोने तस्करीप्रकरणी ११ जणांवर आरोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST

सांगली : दिल्ली रेल्वे स्थानकातील ४३ कोटी रुपयांच्या ८३.६२१ किलो वजनाच्या सोने तस्करीप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थांनी ११ संशयितांवर आरोपपत्र ...

सांगली : दिल्ली रेल्वे स्थानकातील ४३ कोटी रुपयांच्या ८३.६२१ किलो वजनाच्या सोने तस्करीप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थांनी ११ संशयितांवर आरोपपत्र दाखल केले आहे, पैकी १० संशयित सांगलीचे, तर एकजण सोलापूर जिल्ह्यातील आहे.

त्यांची नावे अशी : रवीकिरण बाळासाहेब गायकवाड, पवनकुमार मोहन गायकवाड, सचिन आप्पासाहेब हसबे, योगेश हणमंत रुपनर, अभिजित नंदकुमार बाबर, अवधूत अरुण विभूते, दिलीप लक्ष्मण पाटील, समाधान शिवाजी जगताप, अक्षय रामचंद्र जाधव आणि विशाल महादेव शिंदे (सर्व रा. सांगली जिल्हा), सद्दाम रमजान पटेल (सोलापूर).

दिल्ली रेल्वे स्थानकावर १६ सप्टेंबर २०२० रोजी ८३.६२१ किलो वजनाच्या ५०४ सोन्याच्या विटा पकडल्या होत्या. या तस्करीप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपास संस्थांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रेल्वे स्थानकावर ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. झाडाझडतीमध्ये त्यांच्याकडे सोन्याच्या विटा सापडल्या. त्यांची किंमत तत्कालीन बाजारभावानुसार ४३ कोटी रुपये होती. या सोन्याविषयी कायदेशीर कागदपत्रे ते सादर करू शकले नाहीत, त्यामुळे तपासाधिकाऱ्यांनी सोने जप्त केले. तपासाअंती ते तस्करीचे असल्याचे निष्पन्न झाले.

गेले नऊ महिने तस्करीचा तपास सुरू होता. चोरट्या सोन्याचे धागेदोरे सांगलीपर्यंत येऊन पोहोचले, त्यानुसार एनआयएच्या पथकांनी काहीवेळा सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी छापेही मारले. संशयितांच्या घरात शोध मोहीम राबविली. त्यानंतर आरोपपत्र तयार केले. दिल्ली न्यायालयात नुकतेच ते दाखल केले असून आता नियमित सुनावणी चालेल.

हे सर्व संशयित सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या रॅकेटचा एक भाग असल्याचा ठपका ‘एनआयए’ने ठेवला आहे. त्यांनी कट रचून सोन्याची तस्करी केली. परदेशातून भारतात तस्करीच्या मार्गाने सोने आणण्यात सहभागी झाले, असा आरोप ठेवला आहे. परदेशातून हवाईमार्गे सोने गुवाहाटीमध्ये आणले गेले, तेथून दिल्लीमध्ये विविध तस्करांना देण्यात येणार होते. रेल्वेने दिल्लीत घेऊन आल्यानंतर शहरात शिरण्यापूर्वीच ‘एनआयए’ने त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याविरोधात पुरावा नष्ट करणे, बनावट दस्ताऐवज बनविणे असे आरोप ठेवले आहेत.

चौकट

तिघे फरारी, आठजण कारागृहात

गुन्ह्यातील तिघे संशयित अद्याप फरारी आहेत, उर्वरित आठजण कारागृहात आहेत. दहा संशयित सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, तासगाव तालुक्यांतील आहेत, तर सद्दाम पटेल सोलापूर जिल्ह्यातील आहे.