शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्हा परिषदेतील सात विभागांचा कारभार प्रभारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:31 IST

सांगली : जिल्हा परिषदेतील सात विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्या विभागांचा कारभार सध्या प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. ...

सांगली : जिल्हा परिषदेतील सात विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्या विभागांचा कारभार सध्या प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकाऱ्यांसह गटशिक्षणाधिकाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत. महत्त्वाची पदेच रिक्त असतील, तर जिल्ह्यातील शिक्षणाची गुणवत्ता कशी वाढणार, असा सवाल पालक, शिक्षकांतून उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेकडे विविध संवर्गाची अनेक पदे वर्षानुवर्ष रिक्त आहेत. त्यामुळे अनेक प्रशासकीय व विकास कामांसाठी अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, छोटे पाटबंधारेकडील कार्यकारी अभियंता, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक या खात्याला विभागप्रमुखच नाहीत. या महत्त्वाच्या विभागांचा कारभार सध्या प्रभारी अधिकारीच पाहात आहेत. यात भर म्हणून पुन्हा पाणी व स्वच्छता विभागाकडील उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांचीही बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप नियुक्ती झालेली नाही. प्राथमिक शिक्षण विभागास दोन उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे मंजूर असूनही तेथील पद रिक्त आहे. निरंतर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी हेही पद रिक्त आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांची पाच पदे तर गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहेत. प्राथमिक शिक्षकांची पाच हजार संख्या असताना त्या विभागाची सर्वच पदे रिक्त आहेत. सध्या प्राथमिक शिक्षण विभागाचा सर्व कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच चालू आहे. प्रभारीवर जिल्ह्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढणार का, असा सवाल शिक्षक आणि पालकांमधून उपस्थित होत आहे.

चौकट

लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांची गरज

जिल्हा परिषदेतील सात खातेप्रमुखांची पदे रिक्त आहेत. याशिवाय, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेसह विकास कामांवर परिणाम झाला आहे. यामुळे जि. प. लोकप्रतिनिधींसह खासदार, आमदार आणि मंत्र्यांनी रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.