शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

अन्नाचे ताट बदलले तर पृथ्वीचे आरोग्य सुधारेल : प्रियंका पाटील

By अविनाश कोळी | Updated: May 19, 2024 13:49 IST

सांगलीत ‘पुनरुत्पादक जीवनशैली’ विषयावर व्याख्यान

सांगली : पूर्वीच्या काळात अन्न औषधी होते. सध्याचा समाज अन्नाकडे उत्पादन म्हणूनच पाहतो. अन्नाचे आरोग्य बिघडल्यामुळे अनेक समस्यांचा जन्म झाला आहे. अन्नाचे ताट बदलले तर पृथ्वीचे आरोग्य सुधारेल, असे मत पुनरुत्पादक कृषी अभियानाच्या संशोधक प्रियंका पाटील यांनी व्यक्त केले.सांगलीतील लठ्ठे एज्युकेशन सोसायटी व अमेरिकेतील दिवाणबहाद्दूर लठ्ठे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीत ‘पुनरुत्पादक जीवनशैली’ या विषयावर प्रियंका पाटील यांनी मार्गदर्शन व प्रोजेक्टरद्वारे सादरीकरण केले. त्या म्हणाल्या की, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, बेरोजगारी, भूकबळी अशा सर्व समस्यांचे मूळ अन्न प्रक्रियेत आहे. अनेक आजारांनी जसे माणसांना ग्रासले आहे, तसेच पर्यावरणालाही आजाराने जखडले आहे. आपल्या भोवतालचे हे प्रश्न संपवायचे असतील तर पुनरुत्पादक जीवनशैलीचा अंगीकार केला पाहिजे. त्यासाठी अन्नप्रक्रिया सुधारली पाहिजे. पूर्वीप्रमाणे अन्न औषधी बनायला हवे.

अन्नाबाबत आपण जागरुक नाही. जगातील उत्पादीत अन्नापैकी ६० टक्के अन्न वाया जाते. दुसरीकडे कोट्यवधी लोक अन्नापासून वंचित असतात. हा विरोधाभास दूर झाला पाहिजे. संशोधन करताना आम्हाला लक्षात आले की जगात सर्वाधिक नकारात्मक परिणाम हे अन्नावर झालेले आहेत. त्यामुळे अन्नप्रक्रियेवरील नकारात्मकता दूर करायला हवी. बियाणांच्या सक्षमीकरणातून त्याची सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी आम्ही बीजमहोत्सवाची परंपरा सुरु केली आहे. पृथ्वीतलावरची जैवविविधता व सेंद्रियता टिकली पाहिजे. याकामी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सोसायटीच्या व्यवस्थापकीय परिषदेचे अध्यक्ष शांतीनाथ कांते, मानद सचिव सुहास पाटील, भरत लठ्ठे, मौसमी चौगुले, उदय पाटील, प्रमोद चौगुले, गजानन माणगावे, डॉ. एस. व्ही. रानडे, सांगलीचे प्रा. एम. एस रजपूत आदी उपस्थित होते.