शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

परिवर्तनवादी चळवळीने ऐक्याची भूमिका घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 23:36 IST

सांगली : प्रवाहाच्या विरोधात जाऊन काही करणाऱ्यांना आजच्या घडीला प्रतिकूल परिस्थितीचा अनुभव येत आहे. महिन्याभरापासून तर संभ्रमावस्था वाढतच चालली ...

सांगली : प्रवाहाच्या विरोधात जाऊन काही करणाऱ्यांना आजच्या घडीला प्रतिकूल परिस्थितीचा अनुभव येत आहे. महिन्याभरापासून तर संभ्रमावस्था वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीत न हारता, निराश न होता दुप्पट जोमाने विचारांची बांधणी व्हावी, मूल्यांच्या रुजवणुकीबरोबरच परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी नाउमेद न होता विवेकनिष्ठा जपत ऐक्याने काम करावे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी रविवारी सांगलीत केले.सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात आयोजित सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी, डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांची प्रमुख उपस्थित होती.डॉ. साळुंखे म्हणाले, समाजातील परिस्थिती प्रतिकूल बनत चालली आहे. यातून आपण हारलो आहोत का? असा काळजीचा सूर सर्वत्र दिसून येत आहे. मात्र, नैराश्येचा सूर न काढता दुप्पट जोमाने विवेकनिष्ठा जपत काम केल्यास, आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे शक्य आहे. शोषकांकडून होणाºया अन्यायावर केवळ निषेध करत थांबून चालणार आहे का? त्यासाठी आपल्याला शोषण करणाऱ्यांपेक्षा ताकदवान बनावे लागणार आहे. किरकोळ मतभेद असणाºया, परंतु एकाच उद्दिष्ट, ध्येयाकडे जाणाºया कार्यकर्त्यांना वेगळी वागणूक न देता मतभेदासह चर्चा करत व्यवस्था बदलण्यासाठी त्यांच्यात ऐक्य निर्माण करायला पाहिजे. जे सैन्य आपापसात भांडत राहते, ते शत्रूचा पराभव करू शकत नाही, हे विसरता कामा नये.देशामध्ये अविश्वास, तिरस्काराचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी सर्वांनी एक झाल्याशिवाय बलवान होऊन शोषण करणाºया प्रवृत्तीविरोधात आवाज उठविता येणार नाही. काळ वेगाने बदलत असल्याने आपणही धैर्याने उभे राहत संघर्षाची भूमिका घ्यायला हवी. मनाने गुलाम न होता, दडपणे कितीही असूदेत, त्यातून बाहेर आले की संघर्ष करता येतो.यावेळी साळुंखे यांना मराठी व मोडी लिपीतील मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मानपत्राचे वाचन डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गौतम काटकर यांनी केले, तर प्रस्तावना धनाजी गुरव यांनी केली. सत्कार समितीचे अध्यक्ष व्ही. वाय. (आबा) पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. भारत पाटणकर, हौसाबाई पाटील, शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे गौतम पाटील व मान्यवर उपस्थित होते.वैशिष्ट्यपूर्ण सत्काराचे स्वरूपडॉ. आ. ह. साळुंखे अमृतमहोत्सवी सत्कार समितीच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांच्याहस्ते करण्यात आला. मराठी व मोडी लिपीतील मानपत्र, फुले पगडी, काठी आणि घोंगडे, सांगलीची जगप्रसिध्द हळद, गुळाची ढेप, बेदाणा, सतार देऊन हा सत्कार करण्यात आला. सत्कार समितीने गेल्या महिन्याभरापासून केलेल्या प्रयत्नामुळे, कार्यक्रमाच्या नेटक्या संयोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले.सांगलीकरांच्या सत्कारात आईचे वात्सल्यसत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. आ. ह. साळुंखे भावूक झाले होते. ते म्हणाले, भावनात्मक कल्लोळ उठविणारा हा सत्कार आहे. सत्कार हा निमित्तमात्र असला तरी, विचारमंथन घडावे हा त्यामागील हेतू आहे. कुटुंबीयांच्या निधनानंतर आलेली पोरकेपणाची जाणीव चाहत्यांनी, वाचकांनी, विद्यार्थ्यांनी बळ दिल्याने नाहीशी झाली आहे. जन्म सांगलीच्या मातीत झाला. मातीचा गंध आणि निसर्गाच्या स्पर्शाचे अस्तित्व आजही विसरू शकत नाही. सांगलीकरांनी केलेला हा सत्कार म्हणजे आईच्या कुशीत असल्याचा आनंद होत आहे. सांगलीकरांच्या सत्कारात आईच्या वात्सल्याची जाणीव होत आहे.