शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

फुकटात पाणी मागण्याची मानसिकता बदला

By admin | Updated: March 17, 2016 00:27 IST

शेखर गायकवाड : जल जागृती सप्ताहास उत्साहात प्रारंभ

सांगली : पाण्याच्या अमर्याद वापरामुळे आपण नव्या पिढीच्या हातात ओसाड, क्षारपड जमीन आणि कोरड्या नद्या देणार आहोत का?, याचे आत्मचिंतन प्रत्येकाने करण्याची गरज आहे. भविष्यात पाणी संकटामुळे महायुद्ध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह शहरी नागरिकांनीही फुकट पाणी मिळावे, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले.जलसंपदा विभागाच्यावतीने आयोजित जल जागृती सप्ताहाच्या प्रारंभप्रसंगी जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, महापालिका आयुक्त अजिज कारचे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, कृष्णा कोयना उपसा सिंंचन प्रकल्प मंडळ सांगलीचे अधीक्षक अभियंता एच. टी. धुमाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गायकवाड पुढे म्हणाले की, केवळ भित्तीपत्रके, घोषणा करून जल जागृती होणार नाही. प्रत्यक्ष गावे, शहरे आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना पाण्याचे महत्त्व अधिकाऱ्यांनी पटवून दिले पाहिजे. शहरे आणि महानगरांमध्ये पाण्याच्या अमर्याद वापरामुळे कालव्यातील पाणी संपू लागले आहे. परिणामी शेतीला पाणी मिळत नाही. आपण दैनंदिन जीवनात पाण्याचा अनावश्यक वापर करतो. घरी आलेल्या पाहुण्यांना ग्लास भरून दिलेले पाणी ते पितातच असे नाही. चार कोटी लोकांच्या घरात रोज दोन ग्लास पाणी वाया जाणे परवडणारे नाही. हा विचार लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. दुसरीकडे मुबलक पाणी असलेल्या ठिकाणी पाण्याच्या अमर्याद वापरामुळे जमिनी क्षारपड होण्याच्या घटनाही घडताना दिसत आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात घरी व शेतीसाठी पाण्याच्या वापराबाबत सर्वांनी संवेदनशील राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.एच. व्ही. गुणाले यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये जल जागृती सप्ताहांतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी जलसंपदा विभागामार्फत तयार करण्यात आलेला जलमहत्त्व सांगणारा लघुपट प्रसारित करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. सुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी अभियंता कडूसकर यांनी आभार मानले.प्रजापिता ब्रह्माकुमारी वैशाली यांनीही पाणी बचतीचे महत्त्व सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील म्हणाले की, ठिबक सिंचनचे महत्त्व समजून घ्यावे. पाण्याची उधळपट्टी करण्याची मानसिकता बदलावी. (प्रतिनिधी)महापालिका पाणी कपात करणार : अजिज कारचे जल जागृती सप्ताहांतर्गत महानगरपालिका लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांच्यामार्फत जनजागृती करणार आहे. याचबरोबर महापालिका क्षेत्रात उन्हाळ्यात पाण्याचा नागरिकांनी काटकसरीने वापर करावा, म्हणून दिवसातून दोन वेळा पाणी सोडण्याऐवजी एकच वेळ पाणी सोडण्यात येईल. तसा ठराव येत्या महापालिका सभेत मंजूर करून घेण्यात येईल. यास महापालिका पदाधिकारी आणि नगरसेवक सहकार्य करतील, असा विश्वास महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी व्यक्त केला.भविष्यात जलमाफिया तयार होतील : फुलारीसध्या वाळूमाफिया जिल्ह्यातील एकाही ओढापात्रात वाळू शिल्लक ठेवत नाहीत. त्यांनी रात्रीचा वाळू उपसा करून नद्या व ओढे भकास केले आहेत. त्याचा पर्यावरणावरही परिणाम होत आहे. याचप्रमाणे भविष्यात जल माफियाही वाळू माफियांप्रमाणेच पाण्याची चोरी करणार आहेत. त्यामुळे आता आम्ही वाळू माफियांच्या मुसक्या आवळत आहोत. पण, भविष्यात पोलिसांची जबाबदारी वाढणार आहे. जल माफियांवरही कारवाईची मोहीम त्यांना उघडावी लागेल, असे मत सुनील फुलारी यांनी व्यक्त केले.नांदेड पॅटर्न राबविणारपाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचा अनावश्यक वापर टाळावा. निसर्गाने विपुल प्रमाणात दिलेले पाणी साठवून ठेवले पाहिजे. त्यासाठी नागरिकांच्या दृष्टिकोनात बदल होण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने जुन्या नळजोडण्यांची दुरूस्ती, तसेच गळती होणाऱ्या जलवाहिन्यांची दुरूस्ती, याबरोबरच नांदेड पॅटर्न म्हणून नावारूपास आलेले ‘मॅजिक पिट’ बसवणे, असे उपक्रम जल जागृती सप्ताहांतर्गत हाती घेतले आहेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी सांगितले.