शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

फुकटात पाणी मागण्याची मानसिकता बदला

By admin | Updated: March 17, 2016 00:27 IST

शेखर गायकवाड : जल जागृती सप्ताहास उत्साहात प्रारंभ

सांगली : पाण्याच्या अमर्याद वापरामुळे आपण नव्या पिढीच्या हातात ओसाड, क्षारपड जमीन आणि कोरड्या नद्या देणार आहोत का?, याचे आत्मचिंतन प्रत्येकाने करण्याची गरज आहे. भविष्यात पाणी संकटामुळे महायुद्ध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह शहरी नागरिकांनीही फुकट पाणी मिळावे, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले.जलसंपदा विभागाच्यावतीने आयोजित जल जागृती सप्ताहाच्या प्रारंभप्रसंगी जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, महापालिका आयुक्त अजिज कारचे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, कृष्णा कोयना उपसा सिंंचन प्रकल्प मंडळ सांगलीचे अधीक्षक अभियंता एच. टी. धुमाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गायकवाड पुढे म्हणाले की, केवळ भित्तीपत्रके, घोषणा करून जल जागृती होणार नाही. प्रत्यक्ष गावे, शहरे आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना पाण्याचे महत्त्व अधिकाऱ्यांनी पटवून दिले पाहिजे. शहरे आणि महानगरांमध्ये पाण्याच्या अमर्याद वापरामुळे कालव्यातील पाणी संपू लागले आहे. परिणामी शेतीला पाणी मिळत नाही. आपण दैनंदिन जीवनात पाण्याचा अनावश्यक वापर करतो. घरी आलेल्या पाहुण्यांना ग्लास भरून दिलेले पाणी ते पितातच असे नाही. चार कोटी लोकांच्या घरात रोज दोन ग्लास पाणी वाया जाणे परवडणारे नाही. हा विचार लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. दुसरीकडे मुबलक पाणी असलेल्या ठिकाणी पाण्याच्या अमर्याद वापरामुळे जमिनी क्षारपड होण्याच्या घटनाही घडताना दिसत आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात घरी व शेतीसाठी पाण्याच्या वापराबाबत सर्वांनी संवेदनशील राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.एच. व्ही. गुणाले यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये जल जागृती सप्ताहांतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी जलसंपदा विभागामार्फत तयार करण्यात आलेला जलमहत्त्व सांगणारा लघुपट प्रसारित करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. सुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी अभियंता कडूसकर यांनी आभार मानले.प्रजापिता ब्रह्माकुमारी वैशाली यांनीही पाणी बचतीचे महत्त्व सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील म्हणाले की, ठिबक सिंचनचे महत्त्व समजून घ्यावे. पाण्याची उधळपट्टी करण्याची मानसिकता बदलावी. (प्रतिनिधी)महापालिका पाणी कपात करणार : अजिज कारचे जल जागृती सप्ताहांतर्गत महानगरपालिका लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांच्यामार्फत जनजागृती करणार आहे. याचबरोबर महापालिका क्षेत्रात उन्हाळ्यात पाण्याचा नागरिकांनी काटकसरीने वापर करावा, म्हणून दिवसातून दोन वेळा पाणी सोडण्याऐवजी एकच वेळ पाणी सोडण्यात येईल. तसा ठराव येत्या महापालिका सभेत मंजूर करून घेण्यात येईल. यास महापालिका पदाधिकारी आणि नगरसेवक सहकार्य करतील, असा विश्वास महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी व्यक्त केला.भविष्यात जलमाफिया तयार होतील : फुलारीसध्या वाळूमाफिया जिल्ह्यातील एकाही ओढापात्रात वाळू शिल्लक ठेवत नाहीत. त्यांनी रात्रीचा वाळू उपसा करून नद्या व ओढे भकास केले आहेत. त्याचा पर्यावरणावरही परिणाम होत आहे. याचप्रमाणे भविष्यात जल माफियाही वाळू माफियांप्रमाणेच पाण्याची चोरी करणार आहेत. त्यामुळे आता आम्ही वाळू माफियांच्या मुसक्या आवळत आहोत. पण, भविष्यात पोलिसांची जबाबदारी वाढणार आहे. जल माफियांवरही कारवाईची मोहीम त्यांना उघडावी लागेल, असे मत सुनील फुलारी यांनी व्यक्त केले.नांदेड पॅटर्न राबविणारपाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचा अनावश्यक वापर टाळावा. निसर्गाने विपुल प्रमाणात दिलेले पाणी साठवून ठेवले पाहिजे. त्यासाठी नागरिकांच्या दृष्टिकोनात बदल होण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने जुन्या नळजोडण्यांची दुरूस्ती, तसेच गळती होणाऱ्या जलवाहिन्यांची दुरूस्ती, याबरोबरच नांदेड पॅटर्न म्हणून नावारूपास आलेले ‘मॅजिक पिट’ बसवणे, असे उपक्रम जल जागृती सप्ताहांतर्गत हाती घेतले आहेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी सांगितले.