शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

'सांगली महापालिका निवडणुकीत चंद्रकांतदादा पैशांचा पाऊस पाडणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 17:21 IST

शिवसेना खासदार गजाजन किर्तीकर यांच्याकडून भाजपचा समाचार

सांगली : भाजपकडे जनाधार असलेलं लोक नसल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पैशांचा पाऊस पाडतील, अशी टीका शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केली. पत्रकारांशी संवाद साधताना किर्तीकर यांनी ही टीका केली. लवकरच सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत.'शिवसेनेकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. जनता आमच्यासोबत आहे. मात्र भाजप उसन्या उमेदवारांच्या जीवावर अवसान आणलं आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडतील,' असे किर्तीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. 'आमच्याकडे जनाधार असलेले लोक आहेत. आम्ही तत्त्वानं सांगली, मिरज, कुपवाडमधील निवडणुका लढवणार आहोत. लोक आमच्यासोबत राहतील, असा विश्वास आम्हाला आहे. मात्र भाजपकडे यातील काहीच नसल्यानं पैशांचा पाऊस पडेल. चंद्रकांत पाटीलच या सर्व गोष्टी करणार आहेत. मात्र तरीही त्यांच्या पदरात फारसे काही पडणार नाही,' असं किर्तीकर यांनी म्हटलं.भाजपनं राज्यात अनेक ठिकाणी उसन्या उमेदवारांचा आधार घेऊन निवडणुका लढवल्या, अशी टीका किर्तीकरांनी केली. 'भाजपचं उसन्या उमेदवारांचं राजकारण फार काळ टिकणार नाही. आगामी महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे. आमच्यासोबत कोणी नसलं, तरी आम्हाला कधी एकाकी वाटत नाही. आम्ही लढायला सक्षम आहोत. भाजप उपोषणाचा भंपकपणा करीत आहे. अनंत गीते मंत्री असल्यामुळे भाजपच्या उपोषणावेळी उपस्थित होते. मात्र शिवसेनेचा त्यांच्या आंदोलनाला पाठींबा नाही, असंही किर्तीकरांनी म्हटलं. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, आ. अनिल बाबर, पृथ्वीराज पवार, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, नगरसेवक शेखर माने उपस्थित होते.'कधीकाळी शिवसेनेशी राजू शेट्टी यांचे चांगले संबंध होते. मात्र त्यांनी आता काँग्रेसशी सलगी केली आहे. त्यांच्यासाठी गेल्यावेळी हातकणंगले मतदारसंघात आम्ही उमेदवार उभा केला नव्हता. मात्र आता शेट्टी स्वार्थापोटी काँग्रेसच्या बाजूनं गेले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यासाठी आम्ही जागा सोडणार नाही, असं किर्तीकर यांनी स्पष्ट केलं. केडगावमधील शिवसैनिक हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. 'अहमदनगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या खून प्रकरणाच्या तपासात शासनाचं योग्य पाठबळ मिळत आहे. योग्य दिशेने तपासही सुरू आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत केलेली वाढ आणि शिवसैनिकांवरील हल्ले याचा काहीही संबंध नाही. शिवसैनिकांना कोणाचीही भीती वाटत नाही. आम्ही कोणत्याही संघर्षास सक्षम आहोत,' असं किर्तीकर यांनी म्हटलं. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील