शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

चंद्र्रकांत पाटलांनाच ईव्हीएम का आठवले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 23:55 IST

सांगली : आम्ही ईव्हीएमचा विषयसुद्धा काढला नव्हता, तेवढ्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच ईव्हीएम कसे आठवले, असा सवाल राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. आमचा पराभव भाजपमुळे नव्हे, तर बंडखोरांमुळे झाला असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.ते म्हणाले की, आम्ही पैशाचा विषय न काढताच चंद्रकांत पाटील यांनी ...

सांगली : आम्ही ईव्हीएमचा विषयसुद्धा काढला नव्हता, तेवढ्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच ईव्हीएम कसे आठवले, असा सवाल राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. आमचा पराभव भाजपमुळे नव्हे, तर बंडखोरांमुळे झाला असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.ते म्हणाले की, आम्ही पैशाचा विषय न काढताच चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीपूर्वीच भेटवस्तू वाटपाचा विषय जाहीर सभेत काढला. महापालिका निवडणुकीत आम्ही बॅगा भरून येणार असल्याचे त्यांनीच स्पष्टपणे सांगितले होते. आम्ही निकालानंतर कोणतेही भाष्य केले नव्हते, तोपर्यंत त्यांनीच ईव्हीएमबद्दलची शंका उपस्थित करणारे विधान केले. आता चंद्रकांत पाटील यांनाच अशा गोष्टी का आठवतात, हे काही कळत नाही. त्यामुळे त्यांनी हे प्रश्न स्वत:लाच विचारावेत. निवडणुकीत केवळ ३४ टक्के मते मिळवून कॉँग्रेसमुक्तीचे स्वप्न त्यांनी पाहू नये. विजयाने हुरळून न जाता येथील जनतेला जी आश्वासने त्यांनी दिली आहेत, ती कशी पूर्ण होतील, याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी दिलेला कौल व आमचा पराभव आम्ही मान्यच करतो, मात्र हा पराभव आमच्यातील बंडखोरांमुळेच झाला आहे. अनेक जागांवर कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला. बंडखोरांच्या आमच्यातील मतांची बेरीज केली तर ती भाजपच्या विजयी उमेदवारांपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे आमचा पराभव भाजपने नव्हे, तर आमच्याच बंडखोरांनी केला आहे. आकडेवारी पाहिली तर भाजपला केवळ ३४ टक्के मते मिळाली आहेत. याचाच अर्थ ६६ टक्के लोकांनी त्यांना स्पष्टपणे नाकारले आहे. त्यामुळे जनतेचा कौल त्यांच्या बाजूने नाही, हे त्यांनी समजून घ्यावे. कॉँग्रेसच्या बंडखोरांना ५० हजार, तर राष्टÑवादी बंडखोरांना ६४ हजार मते मिळाली आहेत. हा आकडा मोठा आहे. त्यामुळे बंडखोरांना थोपविण्यात यश मिळाले असते तर, कदाचित निकाल वेगळा लागला असता.महापालिकेत आमचा पराभव झाला म्हणून आम्ही व आमचे उमेदवार नाउमेद होणार नाहीत. खच्चीकरण होऊ न देता ताकदीने आम्ही येथील जनतेसाठी लढत राहणार आहोत. आघाडीच्या धोरणावरही या निकालाचा परिणाम होणार आहे. महापालिका निवडणुकीत आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेऊ.घोटाळ््यांची चौकशी कराच!महापालिकेतील गेल्या काही वर्षातील घोटाळ््यांची चौकशी चंद्रकांत पाटील यांनी जरूर करावी. यात जे सापडतील त्यांचे सदस्यत्वही रद्द करावे. असे केल्यास महापालिकेत ते पुन्हा अल्पसंख्याक झाल्याची जाणीव त्यांना होईल. भाजपचे लोक आलेत म्हणून त्यांनी चौकशी थांबवू नये. यापूर्वीही राज्यात सत्ता मिळविल्यानंतर त्यांच्या सरकारने अशीच घोषणा केली होती. गेल्या चार वर्षांत एकही घोटाळा ते शोधू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी खुशाल महापालिकेतील प्रकरणांची चौकशी करावी, असे जयंत पाटील म्हणाले.३४ टक्केवाल्यांनी कॉँग्रेसमुक्तीचे स्वप्न पाहू नये!चंद्रकांत पाटील व त्यांच्या भाजपवाल्यांनी केवळ ३४ टक्के मते मिळवून कॉँग्रेसमुक्तीचे स्वप्न पाहू नये. टक्केवारीचाच विचार केला, तर आघाडीला मिळालेली मते ३७ टक्क्यांच्या घरात जातात. म्हणजे आम्हाला मिळालेले मतांचे पाठबळ हे त्यांच्यापेक्षा जास्त आहे, असे जयंत पाटील म्हणाले.पेढा लोकसभेचा की विधानसभेचा?भाजपचे लोक स्पष्ट काही कोणाला सांगत नसतात. खासदार संजयकाकांना चंद्रकांत पाटील यांनी जो पेढा भरविला तो लोकसभेसाठी होता की विधानसभेसाठी हेसुद्धा बऱ्याचजणांना कळाले नाही. त्यांची ती पद्धतच आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.