शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

कर्ज पुनर्गठनाच्या प्रश्नाची चंद्रकांतदादांकडून दखल

By admin | Updated: April 21, 2016 00:02 IST

जिल्हा बँकेचे निवेदन : सांगलीत प्रश्न कळल्याचे मत

सांगली : कर्ज पुनर्गठनाच्या योजनेत शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेली जादा व्याजाची समस्या बुधवारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडली. राज्यात कुणीही ही अडचण मांडली नसल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी, यावर तातडीने निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील आणि संचालक बाळासाहेब होनमोरे यांच्यावतीने याबाबतचे निवेदन पाटील यांना देण्यात आले. होनमोर यांनी प्रत्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केली. खरीप २०१५ मधील पन्नासपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यातील ३६३ टंचाईग्रस्त गावांमधील पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देऊन कर्जाच्या पुनर्गठनाचे आदेश राज्य शासनाने दिले असले तरी, यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुनर्गठनातील व्याजाच्या अडचणींमुळे सवलतीच्या योजनेवर पाणी पडण्याची चिन्हे आहेत. योजनेत १३ हजार ९१७ दुष्काळग्रस्त शेतकरी लाभार्थी ठरले आहेत, मात्र यातील एकाही शेतकऱ्याने पुनर्गठनासाठी अर्ज केलेला नाही. कर्ज पुनर्गठन करताना व्याजाची टक्केवारी ६ वरून १३.५ टक्क्यांवर जाते. त्यामुळे यापूर्वीही गारपीट आणि दुष्काळी सवलतीचा लाभ घेण्यासाठी आणि कर्जाच्या पुनर्गठनासाठी टंचाईग्रस्त गावांमधून प्रतिसाद मिळाला नव्हता. चंद्रकांत पाटील म्हणाले की, या प्रश्नाची आपणास कोणतीही कल्पना नव्हती. राज्यभरातून याबाबत कोणीही तक्रार केली नव्हती. सांगलीत आल्यावरच हा प्रश्न समजला. हा प्रश्न गंभीर आहे. लवकरच याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हा बँकेमार्फत हाच प्रश्न मुख्यमंत्री तसेच महसूलमंत्र्यांकडेही निवेदनाद्वारे मांडण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)व्याज सरकारने सोसावेकर्जाच्या पुनर्गठनामुळे शासनाच्या व्याज सवलतीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळत नाही. वेळेत कर्ज परतफेड केल्यानंतर व्याजात मिळणारी सवलत चांगली असल्याने, पुनर्गठनाऐवजी टंचाईतही तजवीज करून शेतकरी कर्ज भरत असतात. त्यामुळे साडेतेरा टक्क्यांऐवजी सहा टक्के व्याजदर आकारून वरील व्याज शासनाने सोसावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.