शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

चांदोलीचा पर्यटन विकास आराखडा रखडला

By admin | Updated: June 4, 2017 23:02 IST

चांदोलीचा पर्यटन विकास आराखडा रखडला

विकास शहा । लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : चांदोलीचा पर्यटन विकास होणार...पर्यटन विकास होणार असे १९८५ पासून सांगण्यात येते; मात्र जो पर्यटन विकास व्हायला पाहिजे, तो अद्याप झालेला नाही. त्यामुळे निसर्गाचा अनमोल ठेवा असणारे चांदोली अद्यापही पाहायला पर्यटकांना अडचणीचे होत आहे.चांदोली अभयारण्यातील हिरवीगार वनराई, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, वसंतसागर जलाशय, विविध औषधी वनस्पतींचे माहेरघर, वन्यप्राणी असे येथील निसर्गसौंदर्य. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने १९८५ मध्ये हा परिसर चांदोली अभयारण्य म्हणून घोषित केला; मात्र तब्बल ३२ वर्षे झाली तरीही ज्या पध्दतीने या परिसराचा पर्यटन क्षेत्र विकास व्हायला पाहिजे होता तसा झालेला नाही. दळणवळणासाठी मुख्य रस्त्याची गरज, मात्र अपुरे रस्ते, वाहनांचा तुटवडा, मनुष्यबळाची कमतरता, रखडलेले पुनर्वसन अशा विविध समस्या आजही जाणवत आहेत.जुलै २०१२ मध्ये ‘युनेस्को’ने या परिसराचा जागतिक वारसा यादीत समावेश केला. त्यामुळे हे उद्यान जगाच्या नकाशात झळकू लागले आहे. जैवविविधतेने नटलेल्या या उद्यानात पक्ष्यांच्या विविध प्रजाती, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, फुलपाखरे, प्राण्यांच्या विविध प्रजाती आढळतात. औषधी वनस्पतींचे माहेरघर म्हणून या उद्यानाची ओळख आहे.सोमवारी येथे पर्यटनाचा सुटीचा दिवस असतो. मंगळवार ते रविवार या सहा दिवसांत पर्यटकांना उद्यानात सोडले जाते. माणसी ३० रुपये, चारचाकी वाहनांचे १५० रुपये व गाईडचे ३०० रुपये पर्यटकांना मोजावे लागतात. बिबटे, गवे, अस्वल, रानडुक्कर, सांबर, भेकर, गेंडा, साळींदर, वानर, माकड, उदमांजर, शेकरू, ससा, खवले मांजर, मुंगूस तसेच वाघाचेही येथे अस्तित्व आहे. या प्राण्यांचे दर्शन व्हावे म्हणून पर्यटक येतात; मात्र पर्यटकांना दर्शन होत नाही. याचे कारण अभयारण्याचे मोठ्या प्रमाणात असणारे विस्तारित क्षेत्र, फार कमी वेळ उद्यानात थांबण्याचा वनविभागाने दिलेला परवाना, याचबरोबर वन्यप्राणी सायंकाळी बाहेर पडतात, त्याचवेळी पर्यटकांनाही अभयारण्याबाहेर जावे लागते. वन्य विभागाकडून कोणत्याही वाहनाची सोय होत नाही. त्याचबरोबर दुचाकी वाहनांना उद्यानात प्रवेश नसल्याने पर्यटकांना अभयारण्य न पाहताच परतावे लागते.तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी चांदोली धरणाच्या जलाशयता नौकाविहार, वनक्षेत्रात वन सफारीची योजना राबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार विजया यादव यांची यासाठी नेमणूकही केली होती. मात्र कुशवाह यांची बदली झाली आणि हे काम थांबले. सध्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड हे सकारात्मक आहेत. चांदोली विश्रामगृहावर सर्व खात्यांची बैठक घेऊन नौकाविहाराची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यापुढे काही नाही घडले. पर्यटन विकास महामंडळाची फार मोठी जबाबदारी येथे गरजेची आहे. पर्यटकांना राहणे, भोजन, संरक्षण व्यवस्था याबाबत सोयी होणे गरजेचे आहे.विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, विधानपरिषद माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख यांनी वारंवार पाठपुरावा करून, अभयारण्याभोवती संरक्षक भिंत उभी करावी, ताडोबाच्या धर्तीवर जीप सफारी व्यवस्था व्हावी, नौकाविहार चालू करावा, चांदोली धरणाच्या पुढील मोकळ्या भागात पैठणच्या धर्तीवर उद्यान व्हावे, गुढे-पाचगणी पठार विकास, पर्यटन विकास व तात्पुरते रोजगार विकास यासाठी ते आग्रही राहिले आहेत. मात्र शासनाकडून वेगाने याबाबत हालचाली होताना दिसत नाहीत.धनधांडग्यांनी जमिनी घेतल्यायाठिकाणी पर्यटनस्थळ होईल, यामुळे धनधांडग्यांनी अल्प दरात जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. याठिकाणी तातडीने पर्यटनस्थळ शासनाने विकसित करावे, त्यासाठी निधी, तसेच येथील नागरिकांसाठी विकासाचे दालन उघडावे, अशी मागणी होत आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी जलाशयात नौकाविहार, वन सफारीची योजना राबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार विजया यादव यांची यासाठी नेमणूकही केली होती. मात्र कुशवाह यांची बदली झाली आणि हे काम थांबले.