शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

चांदोलीचा पर्यटन विकास आराखडा रखडला

By admin | Updated: June 4, 2017 23:02 IST

चांदोलीचा पर्यटन विकास आराखडा रखडला

विकास शहा । लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : चांदोलीचा पर्यटन विकास होणार...पर्यटन विकास होणार असे १९८५ पासून सांगण्यात येते; मात्र जो पर्यटन विकास व्हायला पाहिजे, तो अद्याप झालेला नाही. त्यामुळे निसर्गाचा अनमोल ठेवा असणारे चांदोली अद्यापही पाहायला पर्यटकांना अडचणीचे होत आहे.चांदोली अभयारण्यातील हिरवीगार वनराई, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, वसंतसागर जलाशय, विविध औषधी वनस्पतींचे माहेरघर, वन्यप्राणी असे येथील निसर्गसौंदर्य. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने १९८५ मध्ये हा परिसर चांदोली अभयारण्य म्हणून घोषित केला; मात्र तब्बल ३२ वर्षे झाली तरीही ज्या पध्दतीने या परिसराचा पर्यटन क्षेत्र विकास व्हायला पाहिजे होता तसा झालेला नाही. दळणवळणासाठी मुख्य रस्त्याची गरज, मात्र अपुरे रस्ते, वाहनांचा तुटवडा, मनुष्यबळाची कमतरता, रखडलेले पुनर्वसन अशा विविध समस्या आजही जाणवत आहेत.जुलै २०१२ मध्ये ‘युनेस्को’ने या परिसराचा जागतिक वारसा यादीत समावेश केला. त्यामुळे हे उद्यान जगाच्या नकाशात झळकू लागले आहे. जैवविविधतेने नटलेल्या या उद्यानात पक्ष्यांच्या विविध प्रजाती, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, फुलपाखरे, प्राण्यांच्या विविध प्रजाती आढळतात. औषधी वनस्पतींचे माहेरघर म्हणून या उद्यानाची ओळख आहे.सोमवारी येथे पर्यटनाचा सुटीचा दिवस असतो. मंगळवार ते रविवार या सहा दिवसांत पर्यटकांना उद्यानात सोडले जाते. माणसी ३० रुपये, चारचाकी वाहनांचे १५० रुपये व गाईडचे ३०० रुपये पर्यटकांना मोजावे लागतात. बिबटे, गवे, अस्वल, रानडुक्कर, सांबर, भेकर, गेंडा, साळींदर, वानर, माकड, उदमांजर, शेकरू, ससा, खवले मांजर, मुंगूस तसेच वाघाचेही येथे अस्तित्व आहे. या प्राण्यांचे दर्शन व्हावे म्हणून पर्यटक येतात; मात्र पर्यटकांना दर्शन होत नाही. याचे कारण अभयारण्याचे मोठ्या प्रमाणात असणारे विस्तारित क्षेत्र, फार कमी वेळ उद्यानात थांबण्याचा वनविभागाने दिलेला परवाना, याचबरोबर वन्यप्राणी सायंकाळी बाहेर पडतात, त्याचवेळी पर्यटकांनाही अभयारण्याबाहेर जावे लागते. वन्य विभागाकडून कोणत्याही वाहनाची सोय होत नाही. त्याचबरोबर दुचाकी वाहनांना उद्यानात प्रवेश नसल्याने पर्यटकांना अभयारण्य न पाहताच परतावे लागते.तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी चांदोली धरणाच्या जलाशयता नौकाविहार, वनक्षेत्रात वन सफारीची योजना राबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार विजया यादव यांची यासाठी नेमणूकही केली होती. मात्र कुशवाह यांची बदली झाली आणि हे काम थांबले. सध्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड हे सकारात्मक आहेत. चांदोली विश्रामगृहावर सर्व खात्यांची बैठक घेऊन नौकाविहाराची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यापुढे काही नाही घडले. पर्यटन विकास महामंडळाची फार मोठी जबाबदारी येथे गरजेची आहे. पर्यटकांना राहणे, भोजन, संरक्षण व्यवस्था याबाबत सोयी होणे गरजेचे आहे.विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, विधानपरिषद माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख यांनी वारंवार पाठपुरावा करून, अभयारण्याभोवती संरक्षक भिंत उभी करावी, ताडोबाच्या धर्तीवर जीप सफारी व्यवस्था व्हावी, नौकाविहार चालू करावा, चांदोली धरणाच्या पुढील मोकळ्या भागात पैठणच्या धर्तीवर उद्यान व्हावे, गुढे-पाचगणी पठार विकास, पर्यटन विकास व तात्पुरते रोजगार विकास यासाठी ते आग्रही राहिले आहेत. मात्र शासनाकडून वेगाने याबाबत हालचाली होताना दिसत नाहीत.धनधांडग्यांनी जमिनी घेतल्यायाठिकाणी पर्यटनस्थळ होईल, यामुळे धनधांडग्यांनी अल्प दरात जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. याठिकाणी तातडीने पर्यटनस्थळ शासनाने विकसित करावे, त्यासाठी निधी, तसेच येथील नागरिकांसाठी विकासाचे दालन उघडावे, अशी मागणी होत आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी जलाशयात नौकाविहार, वन सफारीची योजना राबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार विजया यादव यांची यासाठी नेमणूकही केली होती. मात्र कुशवाह यांची बदली झाली आणि हे काम थांबले.