शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

कारभाऱ्यांपुढे आव्हान बेदाणा मार्केटचे

By admin | Updated: September 2, 2015 23:39 IST

तासगाव बाजार समिती : पारदर्शी कारभाराची अपेक्षा; आश्वासन पूर्ततेसाठी लागणार कस

दत्ता पाटील- तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली. सभापतीपदी अनुभवी अविनाश पाटील यांची, तर उपसभापतीपदी सतीश झांबरे यांची एकमताने निवड झाली. मात्र नव्या कारभाऱ्यांना विस्तारित बेदाणा मार्केट उभे करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. निवडणुकीच्या काळात दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळींचा कस लागणार असून, पारदर्शी कारभाराचीही अपेक्षा व्यक्त होत आहे.तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील तालुकास्तरावरील सर्वात मोठी उलाढाल असलेली बाजार समिती म्हणून ओळखली जाते. राज्यातील सर्वात मोठे बेदाणा मार्केट येथे असल्यामुळे वर्षाला सातशे कोटींहून अधिक उलाढाल होते. त्यामुळेच या बाजार समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी निवडणुकीच्या काळात भाजप आणि राष्ट्रवादीत घमासान झाले होते. अटीतटीने झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने एकहाती वर्चस्व मिळवले. नव्या कारभाऱ्यांचीही एकमताने निवड केली. पहिल्याच टर्मसाठी अनुभवी अविनाश पाटील यांना बाजार समितीतील कामाचा अनुभव आहे, तर उपसभापती सतीश झांबरे यांनीही सहकारी संस्थांत चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने विस्तारित बेदाणा मार्केटच्या उभारणीचे काम सुरू आहे. ४५ एकरांवर विस्तारित बेदाणा मार्केट उभारण्यात येत आहे. बाजार समिती, व्यापारी आणि शासनाच्या निधीतून हे मार्केट उभारण्यात येणार आहे. मात्र प्रशासकांच्या काळात गाळे वाटप प्रक्रियेवर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी आक्षेप घेतल्याने प्रशासकांनी गाळे वाटपाची प्रक्रिया स्थगित ठेवली आहे. त्यामुळे विस्तारित मार्केटचे काम ठप्प आहे. हे मार्केट पूर्णत्वास नेण्याचे मोठे आव्हान आहे. या मार्केटला चालना मिळाली तर बाजार समिती आणि तालुक्याच्याही विकासाला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठीही कस लागणार आहे. व्यापाऱ्यांना विश्वासात घेण्याची गरज आर. आर. पाटील यांनी बेदाणा व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन विस्तारित मार्केटची पायाभरणी केली होती. विस्तारित मार्केटच्या उभारणीसाठी लागणाऱ्या निधीपैकी बहुतांश निधी व्यापाऱ्यांना गाळेवाटप केलेल्या अनामत रकमेतूनच उभारण्यात येणार होता. मात्र आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर, प्रशासकांनी गाळेवाटप करूनदेखील बहुतांश व्यापाऱ्यांनी अनामत रक्कम भरली नव्हती. व्यापाऱ्यांनाही विश्वासात घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.पारदर्शी कारभाराची अपेक्षा बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांकडून सातत्याने होत होते. चारा छावणीत केलेल्या भ्रष्टाचाराबाबत खासदार संजयकाका पाटील यांनी आरोप केले होते, तर संचालक मंडळ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील मतभेदही अनेकदा चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे सध्याच्या संचालक मंडळाकडून पारदर्शी कारभाराची अपेक्षा आहे.