शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

ऊस मजुरांच्या मतदानाचे आव्हान...

By admin | Updated: February 12, 2017 23:11 IST

टक्का घटणार : मते मिळविण्यासाठी उमेदवारांना करावी लागणार कसरत

 गजानन पाटील ल्ल संखभीषण दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी जत तालुक्यातील ४० हजार ऊसतोडणी मजूर स्थलांतरित झाले आहेत. सध्या गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. पण तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने, गावाकडे पाण्याअभावी शेतीची कामे बंद असल्याने ऊसतोडणी मजूर नदीलगतच्या भागामध्ये कामासाठी थांबणार आहेत. याचा परिणाम आगामी २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक टक्केवारीवर होणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मते मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.जिल्ह्यामध्ये विस्ताराने सर्वात मोठा असणारा जत तालुका निसर्गाच्या अवकृपेने १९७२ पासून दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिरायत क्षेत्र अधिक आहे. तालुक्यात जिरायत क्षेत्र ६१ हजार २९९ हेक्टर, तर बागायत क्षेत्र २२ हजार ७५ हेक्टर आहे. शेतीचे लागवडीखालील क्षेत्र कमी असल्यामुळे सहा महिने जगायचे कसे? असा प्रश्न या भागातील जनतेला कायम भेडसावत आहे. त्यातूनच ऊस तोडणीसाठी येथील मजूर मोठ्या संख्येने कृष्णा-वारणा काठच्या गावांमध्ये स्थलांतरित होत आहेत. शेतीमधून उत्पादित झालेल्या अन्नधान्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. नैसर्गिक संकटाचीही सामना करावा लागत आहे. डाळिंबावर झालेल्या बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव, कमी झालेली पाण्याची पातळी यामुळे द्राक्षे, फळबागा शेतकऱ्यांनी काढून टाकल्या आहेत. म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्याचा प्रश्न ३० वर्षांपासून मार्गी लागलेला नाही. शेतीला पाणी नसल्याने शेती व्यवसाय धोक्यात झालेला आहे. त्यामुळे हजारो बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली नाही. ऊस तोडणीशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.तालुक्यामध्ये २००९ पासून मान्सून पावसाने दांडी दिलेली आहे. दरवर्षी पाऊस कमी होऊ लागला आहे. गेल्या दोन वर्षांपासून खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम वाया गेलेले आहेत. सध्या तालुक्यात भीषण अशी दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चारा हा प्रश्न गंभीर आहे. गावाकडे राहून काय करायचे? काय खायचे? या विवंचनेतून यावर्षी तालुक्यातून सर्वाधिक ४० हजार ऊस तोडणी मजूर कृष्णाकाठच्या गावांमध्ये स्थलांतरित झाले आहेत.यावर्षी ऊसक्षेत्रात मोठी घट झाली आहे. अनेक कारखानेही बंद झाले आहेत. हंगाम आवरला असला तरीसुध्दा ऊसतोडणी मजूर गावाकडे परतणार नाहीत. शेतीची किंवा वीटभट्टीची कामे करीत कृष्णा नदीलगतच्या भागात काही दिवस राहणार आहेत. यामुळे याचा थेट परिणाम आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे थेट आव्हान उमेदवारांना असणार आहे. आर्थिक कसरतयावर्षी ऊसतोडणी मजूर मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाल्याने जि. प. व पं. स. समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांना लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. २०१२ च्या निवडणुकीत उमेदवारांना ऊसतोडणी मजुरांवर लाखो रुपये खर्च करावे लागले होेते. त्यामुळे त्यांचा खर्च २० ते ३० लाखांपर्यंत झाला होता. याही निवडणुकीमध्ये मतदानाला मजुरांना आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. जो जास्त मतदार आपल्या बाजून खेचतो, त्याचा विजय होणार, हे सत्य आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठी आर्थिक कसरत करावी लागणार आहे.