शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

ऊस मजुरांच्या मतदानाचे आव्हान...

By admin | Updated: February 12, 2017 23:11 IST

टक्का घटणार : मते मिळविण्यासाठी उमेदवारांना करावी लागणार कसरत

 गजानन पाटील ल्ल संखभीषण दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी जत तालुक्यातील ४० हजार ऊसतोडणी मजूर स्थलांतरित झाले आहेत. सध्या गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. पण तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने, गावाकडे पाण्याअभावी शेतीची कामे बंद असल्याने ऊसतोडणी मजूर नदीलगतच्या भागामध्ये कामासाठी थांबणार आहेत. याचा परिणाम आगामी २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक टक्केवारीवर होणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मते मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.जिल्ह्यामध्ये विस्ताराने सर्वात मोठा असणारा जत तालुका निसर्गाच्या अवकृपेने १९७२ पासून दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिरायत क्षेत्र अधिक आहे. तालुक्यात जिरायत क्षेत्र ६१ हजार २९९ हेक्टर, तर बागायत क्षेत्र २२ हजार ७५ हेक्टर आहे. शेतीचे लागवडीखालील क्षेत्र कमी असल्यामुळे सहा महिने जगायचे कसे? असा प्रश्न या भागातील जनतेला कायम भेडसावत आहे. त्यातूनच ऊस तोडणीसाठी येथील मजूर मोठ्या संख्येने कृष्णा-वारणा काठच्या गावांमध्ये स्थलांतरित होत आहेत. शेतीमधून उत्पादित झालेल्या अन्नधान्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. नैसर्गिक संकटाचीही सामना करावा लागत आहे. डाळिंबावर झालेल्या बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव, कमी झालेली पाण्याची पातळी यामुळे द्राक्षे, फळबागा शेतकऱ्यांनी काढून टाकल्या आहेत. म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्याचा प्रश्न ३० वर्षांपासून मार्गी लागलेला नाही. शेतीला पाणी नसल्याने शेती व्यवसाय धोक्यात झालेला आहे. त्यामुळे हजारो बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली नाही. ऊस तोडणीशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.तालुक्यामध्ये २००९ पासून मान्सून पावसाने दांडी दिलेली आहे. दरवर्षी पाऊस कमी होऊ लागला आहे. गेल्या दोन वर्षांपासून खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम वाया गेलेले आहेत. सध्या तालुक्यात भीषण अशी दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चारा हा प्रश्न गंभीर आहे. गावाकडे राहून काय करायचे? काय खायचे? या विवंचनेतून यावर्षी तालुक्यातून सर्वाधिक ४० हजार ऊस तोडणी मजूर कृष्णाकाठच्या गावांमध्ये स्थलांतरित झाले आहेत.यावर्षी ऊसक्षेत्रात मोठी घट झाली आहे. अनेक कारखानेही बंद झाले आहेत. हंगाम आवरला असला तरीसुध्दा ऊसतोडणी मजूर गावाकडे परतणार नाहीत. शेतीची किंवा वीटभट्टीची कामे करीत कृष्णा नदीलगतच्या भागात काही दिवस राहणार आहेत. यामुळे याचा थेट परिणाम आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे थेट आव्हान उमेदवारांना असणार आहे. आर्थिक कसरतयावर्षी ऊसतोडणी मजूर मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाल्याने जि. प. व पं. स. समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांना लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. २०१२ च्या निवडणुकीत उमेदवारांना ऊसतोडणी मजुरांवर लाखो रुपये खर्च करावे लागले होेते. त्यामुळे त्यांचा खर्च २० ते ३० लाखांपर्यंत झाला होता. याही निवडणुकीमध्ये मतदानाला मजुरांना आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. जो जास्त मतदार आपल्या बाजून खेचतो, त्याचा विजय होणार, हे सत्य आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठी आर्थिक कसरत करावी लागणार आहे.