शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कडेगावमध्ये शिल्लक उसाचे आव्हान

By admin | Updated: April 3, 2015 00:36 IST

कारखान्यांची दमछाक : गळीत हंगाम अंतिम टप्प्यात

प्रताप महाडिक - कडेगाव -कायम दुष्काळी कडेगाव तालुक्यात ताकारी आणि टेंभू योजनांचे पाणी आले आणि उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली. दहा हजार हेक्टर क्षेत्रात अंदाजे दहा लाख टन उत्पादन एकट्या कडेगाव तालुक्यात होऊ लागले. तालुक्यातील सोनहिरा, केन अ‍ॅग्रोसह लगतच्या तालुक्यांतील कृष्णा, सह्याद्री, ग्रीन पॉवर शुगर्स, उदगिरी शुगर्स, क्रांती अशा तब्बल सात कारखान्यांना तालुक्यातील ऊस गाळपासाठी जातो. येथील शेतकरी या कारखान्यांचे सभासदही आहेत. आता ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे, तरीही तालुक्यात एक हजार हेक्टरहून अधिक ऊस शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी नोंद केलेल्या क्षेत्रातील ऊस तोडून गाळपासाठी नेण्याचे कारखान्यांसमोर आव्हान आहे. आगाऊ घेतलेली रक्कम परतफेड झाल्याने कित्येक ऊसतोड कामगारांनाही परतीचे वेध लागले आहेत.कडेगाव तालुक्यातील २३ गावांमध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. परंतु या कारखान्याने चालूवर्षी पुरेशी तोडणी व वाहतूक यंत्रणा घाटमाथ्यावर दिली नाही. यामुळे अनेक सभासदांना अन्य कारखान्याला ऊस घालावा लागला. या कारखान्याची प्रत्येक गावात केवळ एकच टोळी कार्यरत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची सोनहिरा, केन अ‍ॅग्रो, क्रांती या कारखान्यांवरही भिस्त आहे. या कारखान्यांनी नोंदीच्या तारखेप्रमाणे तोडणी कार्यक्रम राबविला. परंतु अद्याप एक हजार हेक्टरहून अधिक ऊस शिल्लक आहे. ऊसतोड कामगारांनी घेतलेली उचल परतफेड केल्यामुळे आणि उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे कामगार पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. यापूर्वी तीन ते चार टन गाडी आणणारे ऊसतोड कामगार आता दीड ते दोन टनाची गाडी आणत आहेत. शिवाय शेतकऱ्यांकडून २०० रुपये घेतल्याशिवाय ऊसतोड करीत नाहीत. ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे, याची जाणीव असलेले शेतकरी कारखान्यांच्या गट कार्यालयाकडे हेलपाटे घालत आहेत. काही कारखान्यांनी गळीत हंगामाच्या सुरुवातीला कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणण्यावर जोर दिला. परंतु आता कार्यक्षेत्रात नोंद असलेला शिल्लक ऊस तोडण्याचे आव्हान उभे आहे. यामुळे तोडणी यंत्रणा कार्यक्षेत्रातच कामाला लावली आहे. ऊसतोड कामगारांना परतीचे वेध लागले आहेत. उन्हाची तीव्रता जास्त आहे. यामुळे ऊसतोडीचे कामही उरकत नाही. काही कारखाने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंद होत आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने आणि जमिनीतील पाणीपातळी खालावल्याने उभ्या ऊस पिकासाठी पुरेसे पाणी नाही. यामुळे शेतकरी तात्काळ ऊसतोड मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. साखरेचे दर घसरल्याने कारखानदारी अडचणीत आहे. यामुळे नोंद असलेला ऊस तोडून हंगाम सांगता कारण्याच्या मन:स्थितीत कारखानदार आहेत.शेती विभागाचे तोडणी कार्यक्रमाकडे बोट ऊसतोड मिळावी यासाठी अनेक शेतकरी संबंधित कारखान्यांच्या गट कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. परंतु संबंधित कर्मचारी तोडणी कार्यक्रमाकडे बोट दाखवून थांबण्यास सांगत आहेत. काही शेतकऱ्यांनी खोट्या नोंदी घालून कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ऊस तोडून घेतल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे मात्र कार्यक्षेत्रातील नोंद असलेला संपूर्ण ऊस तोडल्याशिवाय गळीत हंगाम सांगता होणार नाही, अशी ग्वाही संबंधित कारखान्याचे पदाधिकारी देत आहेत.