शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

इस्लामपुरात पालिका निवडणुकीसाठी पुनर्बांधणीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST

अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : नगरपालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकल्यानंतर विकास आघाडीतील नेत्यांत चार वर्षांतच बिघाडी झाली ...

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : नगरपालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकल्यानंतर विकास आघाडीतील नेत्यांत चार वर्षांतच बिघाडी झाली आहे. त्यामुळे पुन्हा आघाडी करण्याचे आव्हान आहे. राष्ट्रवादीची बिघडलेली घडी बसविण्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यापुढेही आव्हान आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही गटात पुनर्बांधणी करण्याचे आव्हान नेत्यांपुढे राहणार आहे.

मागील निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि तत्कालीन राज्यमंत्री सदाभाऊ खोत एकत्र होते. दिवंगत नानासाहेब महाडिक आणि तत्कालीन आमदार शिवाजीराव नाईक यांची समझोता एक्सप्रेस एकाच रुळावर धावत होती. त्यातच निशिकांत पाटील राष्ट्रवादीतून विकास आघाडीच्या झेंड्याखाली आले. या सर्वांनी राष्ट्रवादीचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरणे बदलली. सदाभाऊ खोत आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात बेबनाव झाला. तेव्हापासून विकास आघाडीत बिघाडी झाली. ती आजही तशीच आहे. त्यानंतर खोत आणि महाडिक गट वाळवा-शिराळ्यात एकत्र आले. मात्र सध्या इस्लामपुरात भाजपच्या तीन नेत्यांचे तोंड तीन दिशांना आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांची भूमिका तळ्यात-मळ्यात आहे. विधानपरिषदेवर जाण्यासाठी ते राष्ट्रवादीशी सलगी करून आहेत. सदाभाऊ खोत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानतात, पण दुसरीकडे रयत संघटनेचा झेंडा फडकवत आहेत. महाडिक गटाचे राहुल महाडिक इस्लामपुरात राष्ट्रवादीविरोधी नेतृत्व उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर सम्राट महाडिक यांनी शिराळा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. या सर्वांना एकत्र आणण्याचे वरिष्ठ नेत्यांपुढे आव्हान आहे. विजयभाऊ पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमधील पोकळी भरून निघालेली नाही. त्यामुळे जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक यांच्याकडे शहरातील नेतृत्व जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीसाठी दोन्ही गटांची मोर्चेबांधणी करण्याचे आव्हान नेत्यांपुढे आहे.

चौकट

नवीन प्रभाग रचनेनंतर गती

पालिका सभागृहाची मुदत डिसेंबरमध्ये संपणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राहिला तर निवडणूक पुढे जाईल. निवडणूक पुढे गेल्यास पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती जाण्याची शक्यता आहे. ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान नवीन प्रभाग रचना केल्यानंतर पालिका निवडणुकीला गती येईल.