शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

इस्लामपुरात पालिका निवडणुकीसाठी पुनर्बांधणीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST

अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : नगरपालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकल्यानंतर विकास आघाडीतील नेत्यांत चार वर्षांतच बिघाडी झाली ...

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : नगरपालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकल्यानंतर विकास आघाडीतील नेत्यांत चार वर्षांतच बिघाडी झाली आहे. त्यामुळे पुन्हा आघाडी करण्याचे आव्हान आहे. राष्ट्रवादीची बिघडलेली घडी बसविण्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यापुढेही आव्हान आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही गटात पुनर्बांधणी करण्याचे आव्हान नेत्यांपुढे राहणार आहे.

मागील निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि तत्कालीन राज्यमंत्री सदाभाऊ खोत एकत्र होते. दिवंगत नानासाहेब महाडिक आणि तत्कालीन आमदार शिवाजीराव नाईक यांची समझोता एक्सप्रेस एकाच रुळावर धावत होती. त्यातच निशिकांत पाटील राष्ट्रवादीतून विकास आघाडीच्या झेंड्याखाली आले. या सर्वांनी राष्ट्रवादीचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरणे बदलली. सदाभाऊ खोत आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात बेबनाव झाला. तेव्हापासून विकास आघाडीत बिघाडी झाली. ती आजही तशीच आहे. त्यानंतर खोत आणि महाडिक गट वाळवा-शिराळ्यात एकत्र आले. मात्र सध्या इस्लामपुरात भाजपच्या तीन नेत्यांचे तोंड तीन दिशांना आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांची भूमिका तळ्यात-मळ्यात आहे. विधानपरिषदेवर जाण्यासाठी ते राष्ट्रवादीशी सलगी करून आहेत. सदाभाऊ खोत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानतात, पण दुसरीकडे रयत संघटनेचा झेंडा फडकवत आहेत. महाडिक गटाचे राहुल महाडिक इस्लामपुरात राष्ट्रवादीविरोधी नेतृत्व उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर सम्राट महाडिक यांनी शिराळा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. या सर्वांना एकत्र आणण्याचे वरिष्ठ नेत्यांपुढे आव्हान आहे. विजयभाऊ पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमधील पोकळी भरून निघालेली नाही. त्यामुळे जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक यांच्याकडे शहरातील नेतृत्व जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीसाठी दोन्ही गटांची मोर्चेबांधणी करण्याचे आव्हान नेत्यांपुढे आहे.

चौकट

नवीन प्रभाग रचनेनंतर गती

पालिका सभागृहाची मुदत डिसेंबरमध्ये संपणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राहिला तर निवडणूक पुढे जाईल. निवडणूक पुढे गेल्यास पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती जाण्याची शक्यता आहे. ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान नवीन प्रभाग रचना केल्यानंतर पालिका निवडणुकीला गती येईल.