शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मानसिंगराव गटाच्या सत्तेला आमदारांचे आव्हान

By admin | Updated: July 6, 2016 00:15 IST

शिराळा नगरपंचायतिचे संभाव्य चित्र

विकास शहा-- शिराळा शिराळा ग्रामपंचायतीची स्थापना १२ डिसेंबर १९४० रोजी झाली. ग्रामपंचायत अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना १६ मार्च २०१६ रोजी ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासूनच शिराळा ग्रामपंचायतीवर नाईक गटाची सर्वात जास्त सत्ता होती, ती अगदी शेवटपर्यंत टिकली. ग्रामपंचायत बरखास्त होताना माजी आमदार नाईक-देशमुख यांची निर्विवाद सत्ता होती. ग्रामपंचायतीत १७ पैकी राष्ट्रवादीचे ११, काँग्रेसचे ५, तर आमदार शिवाजीराव नाईक गटाचा एकच सदस्य होता.आमदार शिवाजीराव नाईक यांनी १९९५ पासून लोकप्रतिनिधी असताना, शिराळा बायपास, पोलिस ठाणे इमारत, न्यायालय इमारत, तहसील कार्यालय सभागृहाची उभारणी केली, तर माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आमदारकीच्या काळात शिराळा शहराचा ब वर्ग पर्यटन क्षेत्रात समावेश करण्यात यश मिळविले. यामुळे मोठा निधी या शहरात आला. यातून शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण, गटारी अशी जवळपास २.२५ कोटीची कामे झाली. तसेच ७.५० कोटींची शिराळा पाणीपुरवठा योजना मार्गी लागली. एसटी बसस्थानक, प्रशासकीय इमारत, पंचायत समिती इमारत, एसटी बसस्थानक ते पंचायत समिती फूटपाथ, अंबामाता मंदिराचा संपूर्ण कायापालट केला. या चार-पाच वर्षांत शिराळा शहरात मोठा विकास झाला. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड आहे. काँग्रेसचे सत्यजित यांची साथ राष्ट्रवादीला असल्याने या ठिकाणी नाईक-देशमुख गटाची ताकद मोठी आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीत या आघाडीस शह देण्यासाठी आमदार नाईक गट (भाजप), शिवसेना, जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक गट हे गट एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विश्वास साखर कारखान्याचे संचालक रणजितसिंह नाईक गटाची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे.निधीच्या कमतरतेमुळे शिराळासारख्या मोठ्या शहरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कारभार करताना मर्यादा येत होत्या. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट, स्वच्छता अशी कामे करताना प्रशासनाची तारांबळ उडत होती. तरीही योग्य नियोजन करुन सोमवारचा बाजार झाला की, त्याचदिवशी रात्री १ ते २ वाजेपर्यंत संपूर्ण परिसराची स्वच्छता, त्या कचऱ्याची विल्हेवाट, शिराळा शहराला वेळेत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न बहुतांशी यशस्वी झाला. शिराळा नगरपंचायतीसाठी ही पहिलीच निवडणूक होत असल्याने पहिले नगरसेवक कोण, पहिला नगराध्यक्ष कोण, यासाठी मोठी चर्चा सुरू आहे. मानसिंगराव नाईक गट, देशमुख गटाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी चढाओढ आहे. इच्छुकांकडून सुरक्षित प्रभागाचा शोधआरक्षणामुळे काही उमेदवारांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे हे नेते आरक्षणाला सुरक्षित तसेच शेजारच्या प्रभागात उमेदवारी मिळते का? यासाठी प्रयत्नशील आहेत. आतापासूनच त्यासाठी नेतेमंडळींकडे पाठपुरावा करताना दिसत आहेत. पहिल्या नगरपंचायतीत आपण ‘नगरसेवक’ व्हायचेच, यासाठी अनेकांची धडपड चालू आहे.