शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

सदाभाऊ खोत यांना ‘होम पीच’वर आव्हान

By admin | Updated: July 13, 2016 00:42 IST

मंत्रीपद : इस्लामपूर बाजार समितीचा ताळेबंद आणि विकास आराखड्यावर प्रश्नचिन्ह

अशोक पाटील -- इस्लामपूर -स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाले. शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या कृषी आणि पणन खात्याचा कार्यभार त्यांच्याकडे आला. मात्र याचवेळी भाजीपाल्याच्या नियमनमुक्तीमुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा प्रश्न उभा राहिला आहे. शिवाय खोत यांच्या ‘होम पीच’वर असणाऱ्या इस्लामपूर बाजार समितीच्या ताळेबंदाचा मेळ लागलेला नाही आणि इस्लामपूरच्या विकास आराखड्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.इस्लामपूर बाजार समितीवर आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजार समितीतील भूखंड व्यापारी नसलेल्यांनी हडप केले आहेत. तेथे टोलेजंग इमारती बांधून त्या भाड्याने दिल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीतील जनावरांचा बाजार आणि व्यापारपेठ गायब झाली आहे. जागेच्या भाडेपट्टीतून येणाऱ्या रकमेतूनच बाजार समितीचा कारभार चालवला जात आहे. त्यामुळे सध्या निधी नसल्याने, या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जयंत पाटील यांचे वर्चस्व असलेल्या संचालक मंडळाने समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु त्यांना त्यात यश आले नाही. दुय्यम आवार समित्यांतूनही म्हणावे असे उत्पन्न येत नाही. त्यामुळे बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नाहीत.वाळवा तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये येणारी कडधान्याची आवक घटली आहे. सोयाबीन व इतर भाजीपाल्याचा लिलाव होतो. परंतु या खरेदी—विक्रीतही काळाबाजार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा गेल्या १0 वर्षांपासून ताळेबंदच केला नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे आता कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना राज्यासह इस्लामपूर येथील बाजार समितीतही लक्ष घालावे लागणार आहे.इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक खोत यांना आव्हानाची ठरणार आहे. गेल्या ३0 वर्षाहून अधिक काळ पालिकेवर जयंत पाटील गटाचा झेंडा आहे. विरोधकांना एकत्र करण्याचा विडा खोत यांचे गुरु खासदार राजू शेट्टी यांनी उचलला आहे. त्यामुळे आगामी पालिकेत विरोधकांना एकत्र करुन सत्ताधारी राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी खोत सक्रिय राहणार आहेत. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला इस्लामपूर शहरातील विकास आराखडा सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाने स्वबळावर मंजूर करुन राज्य शासनालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे हा अन्यायी आराखडा रद्द करण्यासाठी सदाभाऊ खोत यांना मुख्यमंत्र्यांच्या दारात ठाण मांडून बसावे लागणार आहे. त्यांच्या भूमिकेकडे आता इस्लामपूर शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. विकास आराखडा : मुख्यमंत्र्यांच्या दरबारी इस्लामपूर शहरातील सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला विकास आराखडा सत्ताधारी राष्ट्रवादीने स्वबळावर मंजूर करुन शासनालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे हा अन्यायी आराखडा रद्द करण्यासाठी खोत यांना मुख्यमंत्र्यांच्या दारात ठाण मांडून बसावे लागणार आहे. त्यांच्या भूमिकेकडे आता इस्लामपूर शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. सदाभाऊ खोत यांच्याकडे नुकसात मंत्रीपद आले आहे. याचा त्यांना आता अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.