शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

चाकरमानी, व्यावसायिक पुन्हा गावी परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:26 IST

कोकरुड : राज्य सरकारने बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू केल्याने नोकरी, व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी असलेले अनेकजण पुन्हा गावी परतू लागले आहेत. ...

कोकरुड : राज्य सरकारने बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू केल्याने नोकरी, व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी असलेले अनेकजण पुन्हा गावी परतू लागले आहेत. यामुळे शिराळा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.

गेल्यावर्षी आलेल्या कोरोना संकटानंतर गेल्या चार महिन्यात परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने १४ एप्रिल ते १ मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीचा नोकरी, व्यवसायावर परिणाम झाल्याने मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह परराज्यात नोकरी, व्यवसायानिमित्ताने गेलेले शिराळा तालुक्यातील ग्रामस्थ आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत.

सध्या ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असतानाच पुन्हा परगावाहून येणाऱ्या नागरिकांमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यातील गाव, वाडी-वस्तीवर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या या नागरिकांची संख्या वाढल्याने ग्रामस्थ, ग्रामपंचायत, ग्राम सुरक्षा समिती, आरोग्य विभाग यांची जबाबदारी वाढली आहे. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

चाैकट

हजारोंच्या संख्येत नागरिक दाखल

गेल्या तीन दिवसात चारचाकी, मालवाहतूक गाडी, खासगी बस यासह विविध प्रकारच्या वाहनांमधून शिराळा तालुक्यात पाच हजारपेक्षा जास्त नागरिक गावी आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यात दररोजच वाढ होत असल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.