शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘त्याच्या’ स्वप्नांनाच बेड्या...

By admin | Updated: November 26, 2015 00:29 IST

शाळेत जाऊ नये म्हणून भोंदूबुवाच्या सल्ल्याने पित्याचे कृत्य

मिरज : शाळेत जाऊ नये, यासाठी सागर शंकर हेरवाडे या १२ वर्षांच्या बालकाच्या पायात सुमारे दोन किलो वजनाच्या लोखंडी बेड्या घालून जन्मदात्या पित्यानेच त्याला शिक्षा दिली. मिरज तालुक्यातील आरग येथे हा प्रकार घडला. ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांनी बुधवारी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने त्याची सुटका केली. अथणी तालुक्यातील केंपवाड येथील हेरवाडे कुटुंबीय मजुरीसाठी आरग येथे वास्तव्यास आहेत. सागरचे वडील शंकर हेरवाडे यांनी, सागर ऊसतोडणीच्या कामासाठी सोबत येत नाही. वारंवार शाळेला जाण्याचा हट्ट करीत असल्याबद्दल कर्नाटकातील एका भोंदूबुवाची भेट घेतली. भोंदूबुवाच्या सांगण्यावरून सागरच्या पायात जाड लोखंडी बेड्या घालण्यात आल्या. जड बेड्यांमुळे सागरला चालणे-फिरणे अवघड झाले होते. यामुळे शाळेला न जाता सागर लंगडत कसाबसा फिरत होता. शाळेला जाण्यासाठी त्याचा आक्रोश सुरू होता; मात्र पित्याला त्याची दया आली नाही. त्याचा शाळेला जाण्याचा हट्ट म्हणजे कशाची तरी बाधा झाल्याचे समजून त्याच्या पायात अतिरेक्यांप्रमाणे बेड्या घालून चार दिवस उपाशी ठेवण्यात आले होते. ऊसतोडणीच्या कामासाठी सोबत येण्यासाठी वडिलांनी त्याला शिक्षा दिली होती. सागर हा बुधवारी आरग ते शिंदेवाडीदरम्यान ‘रिपाइं’चे कार्यकर्ते लक्ष्मण नाईक यांना दिसला. पायातील बेड्यांमुळे रडकुंडीला आलेल्या सागरची त्यांनी विचारपूस केल्यानंतर वडिलांनी बेड्या घातल्याचे त्याने सांगितले. त्याला मिरजेत आणून ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, हुसेन शेख, सतीश जाधव, पोपट कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्याकडे नेले. उपअधीक्षक पाटील यांनी या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. खेळण्या-बागडण्याच्या वयात लहान बालकाच्या पायात बेड्या घालण्याच्या पित्याच्या अघोरी कृत्यामुळे खळबळ उडाली होती. वर्षभर बेड्या घातल्याची तक्रारसागर याचे पाचवीपर्यंतचे शिक्षण कन्नड माध्यमात झाले आहे. सहावीत मराठी शाळेत जाणाऱ्या सागरला शाळा बंद करून शेतात कामाला जाण्याची पित्याने सक्ती केली होती. मात्र, शाळेला जाण्याच्या हट्टामुळे गेले वर्षभर पित्याने पायात लोखंडी बेड्या घालून ठेवल्याची माहिती सागर याने पोलिसांना दिली. या प्रकरणी दिलीप नाईक यांच्या तक्रारीवरून पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू होत्या.सांगलीतील घटनेची आठवण...काही वर्षांपूर्वी सांगलीच्या जामवाडी येथील एका मतिमंद मुलीला तिच्या पित्यानेच साखळदंडाने बांधून ठेवल्याची घटना घडली होती. मतिमंद असल्याने ती कोठे जाऊ नये, म्हणून साखळदंडाने बांधून तो व्यवसायासाठी निघून जायचा. प्रकरण उघड झाल्यानंतर एका सामाजिक संस्थेने त्या मुलीची जबाबदारी स्वीकारली. आरग येथे मात्र मुलाने चांगले स्वप्न बघूनही त्याला त्याच्या क्रूर पित्याने अशी शिक्षा दिल्याने हळहळ व्यक्त होत आहे.