शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

बारावीनंतर व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी जुलैमध्ये सीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:32 IST

सांगली : बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या केंद्रीय प्रवेश परीक्षा (सीईटी) जुलैमध्ये होतील, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागेल, अशी माहिती ...

सांगली : बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या केंद्रीय प्रवेश परीक्षा (सीईटी) जुलैमध्ये होतील, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे दिली. निकाल जादा लागल्यास जागा वाढवण्याचीही तयारी आहे, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्यावतीने विविध शासकीय रुग्णालयांना १४ व्हेंटिलेटरचे वाटप सामंत यांच्या हस्ते झाले, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले की, कुलगुरुंसोबत आजच ऑनलाईन चर्चा केली. सर्व परीक्षांचे निकाल महिन्याभरात लावण्याची सूचना केली आहे. कोरोनातील मूल्यांकनामुळे विद्यार्थ्यांना नोकरीत कोणतीही समस्या येणार नाही. बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या केंद्रीय प्रवेश परीक्षा (सीईटी) जुलैमध्ये होतील, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागेल. पदविका (डिप्लोमा) अभियांत्रिकी प्रवेशासाठी पाच लाख विद्यार्थ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न आहे. त्यातून गतवर्षीपेक्षा १५ ते १७ टक्के प्रवेश वाढतील, अशी अपेक्षा आहे. डिप्लोमाचे प्रवेश दहावीच्या गुणांवरच होतील. त्यासाठी प्रवेश परीक्षा असणार नाही. व्यावसायिक संधी असणारे अभ्यासक्रमदेखील तंत्रशिक्षण परिषद सुरू करणार आहे. प्राध्यापकांच्या ३०७४ जागा रिक्त आहेत. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापर्यंत त्या भरल्या जातील.

चौकट

आचारसंहिता लागल्यावर सांगेन

सामंत म्हणाले की, कोरोनामध्ये विरोधकांकडून राजकारण सुरू आहे. पण मुख्यमंत्र्यांनी आम्हांला संयमाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर सारे काही सांगेन. कोरोनामध्ये कोणी राजकारण केले, कोणी पैसे खाल्ले याचा खुलासा करेन.

चौकट

राज्यपालांविषयी राग नाही

राज्यपालांविषयी मनात कितीही राग असला तरी तो व्यक्त करून चालणार नाही. ते घटनात्मक पद असल्याने आदर राखलाच पाहिजे. शिवसेनेची बाळासाहेबांपासून ही पंरपरा आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये धुसफूस नसून ते जिवंतपणाचे लक्षण आहे.

चौकट

केंद्रीय पथकाकडून कुणकेश्वराचे दर्शन आणि माशांवर ताव

तौक्ते वादळानंतर प्रधानमंत्र्यांनी गुजरातला हजार कोटी दिले, तसे कोकणासाठीही ५०० कोटी दिले तर समाधान मानेन. पण वादळानंतर २० दिवसांनी केंद्राचे पथक आले. कुणकेश्वराचे दर्शन घेऊन आणि नदीतल्या माशांवर ताव मारून गेेले. जखमांवर त्यांनी मीठ चोळले, असे सामंत म्हणाले.

चौकट

नाणार प्रकल्प होणार नाही

सामंत म्हणाले की, नाणार प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. याचा विश्वास वाटल्यानेच कोकणातील ७३ पैकी ७१ ग्रामपंचायतीत ग्रामस्थांनी शिवसेनेला सत्ता दिली. नाणार पटट्ट्यातील ११ ग्रामपंचायतीही मिळाल्या. प्रकल्प होऊ नये अशीच या गावांची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांनी हा विषय संपवला आहे. नारायण राणेंना टीका करण्याशिवाय काम नाही, पण दखल कोणाची घ्यायची हेदेखील ठरवले पाहिजे.

चौकट

सिव्हील हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन मशीन

सांगली, मिरज शहर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात. त्यामुळे तेथे अधिकाधिक सुविधा मिळाल्या पाहिजेत. सांगलीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन मशीन घेण्याच्या सूचना सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.

चौकट

सांगलीत सीटी स्कॅनिंगची यंत्रणा

शिवसेनेतर्फे जिल्ह्याला १४ व्हेन्टिलेटर्स देण्यात आले. इस्लामपूर व खानापूर तालुक्यातील रुग्णालयांना प्रत्येकी तीन, तासगाव, कवठेमहांकाळ, सांगली व मिरज रुग्णालयांना प्रत्येकी दोन देण्यात आले. सांगलीतील शासकीय रुग्णालयांत सीटी स्कॅनिंग यंत्रणा उपलब्ध करण्याची मागणी सामंत यांच्याकडे करण्यात आली होती. तशी सूचना त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिली. चौधरी यांनी यासंदर्भात पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करु असे सांगितले.