शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने कारखान्यांना टनामागे ५०० रुपये अनुदान द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : साखर आयात-निर्यातीबाबत केंद्र शासनाचे धोरण, मागणी व साखरेचा उठाव आणि शेतकऱ्यांची जादा दराची मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाळवा : साखर आयात-निर्यातीबाबत केंद्र शासनाचे धोरण, मागणी व साखरेचा उठाव आणि शेतकऱ्यांची जादा दराची मागणी यात मेळ घालणे कठीण बनले आहे. याचा विचार करून साखर कारखान्यांनी हजारो कोटी रुपये भरलेल्या करातून शासनाने प्रतिटनास ५०० रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केली.

येथील हुतात्मा कारखान्याच्या ४०व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. उपाध्यक्ष बाबूराव बोरगावकर, यशवंत बाबर, राजाराम वाजे, भगवान पाटील, वीरधवल नायकवडी, अण्णा मगदूम, शिवाजी अहिर, डाॅ. संताजी घोरपडे, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, एस. बी. बोराटे प्रमुख उपस्थित होते.

नायकवडी म्हणाले, खासगी कारखान्यांशी असलेल्या तीव्र स्पर्धेमुळे सहकारी साखर कारखान्यांवर गंभीर परिणाम झाले आहेत. सहकारी कारखान्यांना एफआरपी रक्कम देणे अवघड झाले आहे. सध्या एमएसपी ३१०० रुपयांऐवजी ३६०० रुपये पाहिजे. बाजारपेठेत साखरेचा दर तीन हजार रुपये आहे. त्यामुळे अनेक कारखाने अल्प नफ्यात आहेत.

कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी प्रास्ताविक केले. ऑनलाईन सभेत चंद्रशेखर शेळके, नंदकुमार शेळके यांनी काही प्रश्न उपस्थित केले, त्यांची उत्तरे अध्यक्ष नायकवडी यांनी दिली; पण त्या उत्तरांतून सभासदांचे समाधान झाल्याचे दिसले नाही.

चाैकट

विविध प्रकल्प मंजूर

वैभव नायकवडी म्हणाले, हुतात्मा कारखान्याला २४ मेगावॅट क्षमतेच्या सहवीज प्रकल्पास आणि दैनंदिन गाळप क्षमता पाच हजार टन उभारणीस परवानगी दिली आहे. दैनंदिन एक लाख इथेनाॅल प्रकल्पाची क्षमता करण्यासाठीही परवानगी मिळाली आहे.