शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

केंद्राने घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST

सांगली : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना त्यात केंद्राचीच भूमिका महत्त्वाची आहे. आरक्षणाबाबत २०१८ मध्ये केंद्राने केलेले काही बदल माहिती ...

सांगली : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना त्यात केंद्राचीच भूमिका महत्त्वाची आहे. आरक्षणाबाबत २०१८ मध्ये केंद्राने केलेले काही बदल माहिती असतानाही टिकाऊ आरक्षण देण्यात आले नव्हते. मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याची भाजपची चाल असून आता केंद्रानेच घटनादुरुस्तीनुसार मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा स्वराज्य संघ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

साळुंखे म्हणाले की, मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले असले तरी ते परत देण्याची मानसिकता असेल तर मिळू शकते. केंद्रात २०१८ मध्ये १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्याला आरक्षण देण्याविषयी कोणताही अधिकारच राहिला नाही. मात्र, तरीही महाराष्ट्राच्या निवडणुका समोर ठेवून फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. नियमबाह्य मागासवर्गीय समितीही नेमली. या समितीने आरक्षणाबाबत सकारात्मक अहवाल दिला. मात्र, सर्वेाच्च न्यायालयात तो रद्दबातल ठरविण्यात आला आहे.

त्यामुळे आता आरक्षण देण्याचा पूर्ण अधिकार केंद्र सरकारला असल्याने त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी निर्णय घ्यावा. लोकसभा व राज्यसभेतील मंजुरीनंतर राष्ट्रपतीच्या सहीने हा बदल होऊ शकतो. केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या मान्यतेने हे होत असते हे माहिती असतानाही भाजपने मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित ठेवल्याचाही आरोप त्यांनी केला. दरम्यान, कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यानंतर यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.