शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

केंद्राने घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST

सांगली : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना त्यात केंद्राचीच भूमिका महत्त्वाची आहे. आरक्षणाबाबत २०१८ मध्ये केंद्राने केलेले काही बदल माहिती ...

सांगली : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना त्यात केंद्राचीच भूमिका महत्त्वाची आहे. आरक्षणाबाबत २०१८ मध्ये केंद्राने केलेले काही बदल माहिती असतानाही टिकाऊ आरक्षण देण्यात आले नव्हते. मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याची भाजपची चाल असून आता केंद्रानेच घटनादुरुस्तीनुसार मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा स्वराज्य संघ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

साळुंखे म्हणाले की, मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले असले तरी ते परत देण्याची मानसिकता असेल तर मिळू शकते. केंद्रात २०१८ मध्ये १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्याला आरक्षण देण्याविषयी कोणताही अधिकारच राहिला नाही. मात्र, तरीही महाराष्ट्राच्या निवडणुका समोर ठेवून फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. नियमबाह्य मागासवर्गीय समितीही नेमली. या समितीने आरक्षणाबाबत सकारात्मक अहवाल दिला. मात्र, सर्वेाच्च न्यायालयात तो रद्दबातल ठरविण्यात आला आहे.

त्यामुळे आता आरक्षण देण्याचा पूर्ण अधिकार केंद्र सरकारला असल्याने त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी निर्णय घ्यावा. लोकसभा व राज्यसभेतील मंजुरीनंतर राष्ट्रपतीच्या सहीने हा बदल होऊ शकतो. केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या मान्यतेने हे होत असते हे माहिती असतानाही भाजपने मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित ठेवल्याचाही आरोप त्यांनी केला. दरम्यान, कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यानंतर यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.