शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

केंद्राने घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST

सांगली : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना त्यात केंद्राचीच भूमिका महत्त्वाची आहे. आरक्षणाबाबत २०१८ मध्ये केंद्राने केलेले काही बदल माहिती ...

सांगली : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना त्यात केंद्राचीच भूमिका महत्त्वाची आहे. आरक्षणाबाबत २०१८ मध्ये केंद्राने केलेले काही बदल माहिती असतानाही टिकाऊ आरक्षण देण्यात आले नव्हते. मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याची भाजपची चाल असून आता केंद्रानेच घटनादुरुस्तीनुसार मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा स्वराज्य संघ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

साळुंखे म्हणाले की, मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले असले तरी ते परत देण्याची मानसिकता असेल तर मिळू शकते. केंद्रात २०१८ मध्ये १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्याला आरक्षण देण्याविषयी कोणताही अधिकारच राहिला नाही. मात्र, तरीही महाराष्ट्राच्या निवडणुका समोर ठेवून फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. नियमबाह्य मागासवर्गीय समितीही नेमली. या समितीने आरक्षणाबाबत सकारात्मक अहवाल दिला. मात्र, सर्वेाच्च न्यायालयात तो रद्दबातल ठरविण्यात आला आहे.

त्यामुळे आता आरक्षण देण्याचा पूर्ण अधिकार केंद्र सरकारला असल्याने त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी निर्णय घ्यावा. लोकसभा व राज्यसभेतील मंजुरीनंतर राष्ट्रपतीच्या सहीने हा बदल होऊ शकतो. केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या मान्यतेने हे होत असते हे माहिती असतानाही भाजपने मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित ठेवल्याचाही आरोप त्यांनी केला. दरम्यान, कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यानंतर यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.