शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपाचा केंद्रबिंदू हळूहळू सरकतोय वारणा खोऱ्यात

By admin | Updated: June 4, 2017 22:46 IST

भूकंपाचा केंद्रबिंदू हळूहळू सरकतोय वारणा खोऱ्यात

संजय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : कोयना विभागात गेल्या दहा वर्षांत तब्बल ६ हजार ८८२ भूकंप ‘किर्णास’ वेधशाळेत नोंदवले गेलेत. त्यापैकी बहुतांश भूकंपांचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात असल्याचे समोर आले आहे. या विभागात १९६७ मध्ये ६.६ रिश्टर स्केलचा शक्तीशाली भूकंप झाला. या भूकंपाने मोठ्या प्रमाणात जिवीत तसेच वित्तहानी झाली. त्यानंतर आजपर्यंत या विभागात एवढ्या मोठ्या तिव्रतेचा भूकंप झाला नसला तरी लहानमोठे हजारो धक्के दरवर्षी या विभागाला बसतायत. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती झाल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे ‘किर्णास’ भूकंपमापन वेधशाळा उभारण्यात आली. राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या या वेधशाळेत प्रादेशिक भूकंपांची नोंद घेतली जाते. वास्तविक येथे प्रादेशिकसह देशभरातील सर्वच भूकंप समजतात. मात्र, नोंद फक्त प्रादेशिक विभागातीलच घेतली जाते. या वेधशाळेतील नोंदीनुसार गेल्या दहा वर्षांत विभागामध्ये ६ हजार ८८२ भूकंपांची नोंद झाली आहे. या भूकंपांचा केंद्रबिंदू कोयना तसेच वारणा खोऱ्यामध्ये आहे. मात्र, कोयना खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांपेक्षा वारणा खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. तसेच वारणा खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांची तिव्रताही जास्त असल्याचे त्या त्या वेळच्या नोंदीवरून दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली व कोयना विभागात खऱ्या अर्थाने भूकंपांची मालिका ११ डिसेंबर १९६७ पासून सुरू झाली. तेव्हापासून या दोन्ही खोऱ्यांना हजारो धक्के बसलेत. रिश्टर स्केलवर या धक्क्यांची तिव्रता कधी ३ तर कधी ५ पर्यंत नोंदली गेली आहे. किर्णास वेधशाळेत नोंद झालेल्या भूकंपांपैकी गत काही वर्षातील मोठ्या भूकंपांचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात आहे. केंद्रबिंदू वारणा खोऱ्याकडे सरकण्याचे भौगोलिक कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गत अनेक वर्षापासून भूगर्भ तज्ञांकडून त्याची कारणमिमांसा करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कऱ्हाडसह कोयना व चांदोली विभागात अभ्यासही सुरू आहे. किर्णासच्या नोंदीनुसार गत दहा वर्षात झालेल्या भूकंपांपैकी एकच भुकंप ५ रिश्टर स्केलपर्यंत नोंदला गेला. हा भूकंप २०१२ मध्ये झाला होता. तसेच त्याचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात होता. या भुकंपाने त्यावेळी काही वित्तहानी झाली होती. मात्र, त्यानंतर ५ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तिव्रतेचा भुकंप झालेला नाही.सलग तीन वर्ष प्रमाण कमी२००९ सालापासून भुकंपाची संख्या काही प्रमाणात कमी झाली. २००९ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ८०९, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ११ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे ३ असे एकुण ८२३, २०१० साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ८१०, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे १६ असे एकुण ८२६, २०११ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ६१०, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ८ असे एकुण ६१८ भुकंप झाले.२००७ मध्ये सर्वाधिक धक्केकिर्णास वेधशाळेतील नोंदीनुसार गत दहा वर्षांमध्ये २००७ मध्ये सर्वात जास्त भूकंपाचे धक्के बसले. २००७ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे १ हजार २५३, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे १३ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे ३ असे एकुण १ हजार २६९ भुकंप झाले. २००८ सालीही तीन रिश्टर स्केलपर्यंतचे १ हजार १११, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ७ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे २ असे एकुण १ हजार १२० भुकंप झाले होते.२०१६ फक्त २७ भूकंपकोयना, चांदोली विभागात २०१२ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे १ हजार १३६, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ३ तर सहा रिश्टर स्केलपर्यंतचा १ असे एकुण १ हजार १४०, २०१३ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ३९६, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ६ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे १ असे एकुण ४०३, २०१४ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ४००, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे २ असे एकुण ४०२, २०१५ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे २५०, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ३ असे एकुण २५३ आणि २०१६ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे २०, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ६ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे १ असे एकुण २७ भुकंप झाले आहेत. हेळवाकपासून सुरू होते वारणा खोरेकोयना नदी हेळवाकपर्यंत येऊन तेथून ९० अंशामध्ये कऱ्हाडकडे वळते. तेथून दक्षिणेकडील भाग हा वारणा खोरे म्हणून ओळखला जाता. या खोऱ्यामध्ये चांदोलीचा भाग समाविष्ट आहे. मळे, कोळणे, पाथरपुंज, नाव, मोरगिरी खोरे, चांदोली, सिद्धेश्वर, चांदेल, पांढरपाणी ही गावे वारणा खोऱ्यात येतात. कोयना आणि वारणा खोरे नजीक असल्याने दोन्हीपैकी कोणत्याही खोऱ्यात भुकंप झाला तरी त्याची तिव्रता कमी-अधिक प्रमाणात दोन्ही खोऱ्यांमध्ये जाणवते.