शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

भूकंपाचा केंद्रबिंदू हळूहळू सरकतोय वारणा खोऱ्यात

By admin | Updated: June 4, 2017 22:46 IST

भूकंपाचा केंद्रबिंदू हळूहळू सरकतोय वारणा खोऱ्यात

संजय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : कोयना विभागात गेल्या दहा वर्षांत तब्बल ६ हजार ८८२ भूकंप ‘किर्णास’ वेधशाळेत नोंदवले गेलेत. त्यापैकी बहुतांश भूकंपांचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात असल्याचे समोर आले आहे. या विभागात १९६७ मध्ये ६.६ रिश्टर स्केलचा शक्तीशाली भूकंप झाला. या भूकंपाने मोठ्या प्रमाणात जिवीत तसेच वित्तहानी झाली. त्यानंतर आजपर्यंत या विभागात एवढ्या मोठ्या तिव्रतेचा भूकंप झाला नसला तरी लहानमोठे हजारो धक्के दरवर्षी या विभागाला बसतायत. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती झाल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे ‘किर्णास’ भूकंपमापन वेधशाळा उभारण्यात आली. राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या या वेधशाळेत प्रादेशिक भूकंपांची नोंद घेतली जाते. वास्तविक येथे प्रादेशिकसह देशभरातील सर्वच भूकंप समजतात. मात्र, नोंद फक्त प्रादेशिक विभागातीलच घेतली जाते. या वेधशाळेतील नोंदीनुसार गेल्या दहा वर्षांत विभागामध्ये ६ हजार ८८२ भूकंपांची नोंद झाली आहे. या भूकंपांचा केंद्रबिंदू कोयना तसेच वारणा खोऱ्यामध्ये आहे. मात्र, कोयना खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांपेक्षा वारणा खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. तसेच वारणा खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांची तिव्रताही जास्त असल्याचे त्या त्या वेळच्या नोंदीवरून दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली व कोयना विभागात खऱ्या अर्थाने भूकंपांची मालिका ११ डिसेंबर १९६७ पासून सुरू झाली. तेव्हापासून या दोन्ही खोऱ्यांना हजारो धक्के बसलेत. रिश्टर स्केलवर या धक्क्यांची तिव्रता कधी ३ तर कधी ५ पर्यंत नोंदली गेली आहे. किर्णास वेधशाळेत नोंद झालेल्या भूकंपांपैकी गत काही वर्षातील मोठ्या भूकंपांचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात आहे. केंद्रबिंदू वारणा खोऱ्याकडे सरकण्याचे भौगोलिक कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गत अनेक वर्षापासून भूगर्भ तज्ञांकडून त्याची कारणमिमांसा करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कऱ्हाडसह कोयना व चांदोली विभागात अभ्यासही सुरू आहे. किर्णासच्या नोंदीनुसार गत दहा वर्षात झालेल्या भूकंपांपैकी एकच भुकंप ५ रिश्टर स्केलपर्यंत नोंदला गेला. हा भूकंप २०१२ मध्ये झाला होता. तसेच त्याचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात होता. या भुकंपाने त्यावेळी काही वित्तहानी झाली होती. मात्र, त्यानंतर ५ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तिव्रतेचा भुकंप झालेला नाही.सलग तीन वर्ष प्रमाण कमी२००९ सालापासून भुकंपाची संख्या काही प्रमाणात कमी झाली. २००९ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ८०९, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ११ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे ३ असे एकुण ८२३, २०१० साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ८१०, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे १६ असे एकुण ८२६, २०११ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ६१०, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ८ असे एकुण ६१८ भुकंप झाले.२००७ मध्ये सर्वाधिक धक्केकिर्णास वेधशाळेतील नोंदीनुसार गत दहा वर्षांमध्ये २००७ मध्ये सर्वात जास्त भूकंपाचे धक्के बसले. २००७ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे १ हजार २५३, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे १३ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे ३ असे एकुण १ हजार २६९ भुकंप झाले. २००८ सालीही तीन रिश्टर स्केलपर्यंतचे १ हजार १११, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ७ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे २ असे एकुण १ हजार १२० भुकंप झाले होते.२०१६ फक्त २७ भूकंपकोयना, चांदोली विभागात २०१२ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे १ हजार १३६, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ३ तर सहा रिश्टर स्केलपर्यंतचा १ असे एकुण १ हजार १४०, २०१३ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ३९६, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ६ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे १ असे एकुण ४०३, २०१४ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ४००, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे २ असे एकुण ४०२, २०१५ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे २५०, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ३ असे एकुण २५३ आणि २०१६ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे २०, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ६ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे १ असे एकुण २७ भुकंप झाले आहेत. हेळवाकपासून सुरू होते वारणा खोरेकोयना नदी हेळवाकपर्यंत येऊन तेथून ९० अंशामध्ये कऱ्हाडकडे वळते. तेथून दक्षिणेकडील भाग हा वारणा खोरे म्हणून ओळखला जाता. या खोऱ्यामध्ये चांदोलीचा भाग समाविष्ट आहे. मळे, कोळणे, पाथरपुंज, नाव, मोरगिरी खोरे, चांदोली, सिद्धेश्वर, चांदेल, पांढरपाणी ही गावे वारणा खोऱ्यात येतात. कोयना आणि वारणा खोरे नजीक असल्याने दोन्हीपैकी कोणत्याही खोऱ्यात भुकंप झाला तरी त्याची तिव्रता कमी-अधिक प्रमाणात दोन्ही खोऱ्यांमध्ये जाणवते.