शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

वाळवा तालुक्यात ‘सहकार’चा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील तिन्ही गटांतील सहकार पॅनलच्या उमेदवारांनी विजयश्री खेचून आणल्यानंतर समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील तिन्ही गटांतील सहकार पॅनलच्या उमेदवारांनी विजयश्री खेचून आणल्यानंतर समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करून गुलालाच्या उधळणीत मिरवणुका काढल्या.

बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटात सहकार पॅनलचे विजयी उमेदवार संजय पाटील (इस्लामपूर), जितेंद्र पाटील (बोरगाव), जे. डी. मोरे (रेठरे हरणाक्ष), अविनाश खरात (खरातवाडी), जयश्री पाटील (बहे) विजयी झाले. नेर्ले -तांबवे गटात सहकार पॅनलचे संभाजी पाटील (नेर्ले), लिंबाजी पाटील (तांबवे), इंदुमती जाखले (नेर्ले), तर येडेमच्छिंद्र वांगी गटात शिवाजी पाटील (येडेमच्छिंद्र), बाबासाहेब शिंदे (देवराष्ट्रे) विजयी झाल्यनंतर समर्थकांनी आपापल्या गावात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून मिरवणूक काढली.

इस्लामपूर येथे संजय पाटील यांच्या समर्थकांनी उरुण परिसरात मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजी करत आष्टा नाक्यावरील राजारामबापू पुतळ्यास अभिवादन केले. बोरगाव येथे जितेंद्र पाटील यांचे वडील एल. के. पाटील यांचे नुकतेच निधन झाल्याने तेथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला नाही. जे. डी. मोरे यांच्या समर्थकांनी रेठरे हरणाक्ष येथे फटाक्याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. अविनाश खरात यांनी खरातवाडी येथे गुलालाची उधळण केली. बहे येथे जयश्री पाटील यांनीही विजयोत्सव साजरा केला. येडेमच्छिंद्र आणि देवराष्ट्रे येथे सहकार पॅनलचे शिवाजी पाटील आणि बाबासाहेब शिंदे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून मिरवणूक काढली.

चौकट

कौल मान्य

इस्लामपूर येथे संस्थापक पॅनलचे उमेदवार शिवाजी पवार आणि रयत पॅनलचे आनंदराव मलगुंडे यांनी सभासदांचा कौल मान्य करत धनशक्तीमुळे पराभव झाल्याचे सांगितले. मनोमिलनचे गुऱ्हाळ लांबत गेल्याने प्रचाराला वेळ मिळाला नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.