शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

‘सीसीटीव्ही’लाही चोरांचे आव्हान

By admin | Updated: November 6, 2014 23:01 IST

घटना वाढल्या : सांगली जिल्ह्यात वर्षात वीस लाखांची रोकड पळवली

अंजर अथणीकर - सांगली -बँकांमध्ये व बाहेर असणारे सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ असा प्रकार होऊन बसला आहे. हलक्या दर्जाचे कॅमेरे बसविल्याने पोलिसांच्या तपास कामात अडथळे निर्माण झाले असून, काही ठिकाणी अनेकदा आवाहन करूनही बाहेरील बाजूस कॅमेरे बसविण्याबाबत बँकांनी हात अखडता घेतला आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे. गेल्या वर्षभरात वीस लाखांहून अधिक रोकड चोरट्यांनी बँकांसमोरून लंपास केली आहे. गेल्या चार-पाच वर्षात सर्वच बँका, वित्तीय संस्था आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात झाली आहे. कॅशियरसह आतील बाजूस चांगल्या प्रकारचे कॅमेरे बसविले जातात, मात्र इमारतीच्या बाहेरील बाजूस बँका दर्जेदार कॅमेरे बसवत नाहीत. काही ठिकाणी तर इतक्या उंचीवर कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत की, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे चेहरेही स्पष्ट दिसत नाहीत. ‘बॅक अप्’मध्ये जाऊन हे स्पष्ट झाले असले तरी, त्याची काळजी बॅँका घेताना दिसत नाहीत. गेल्या वर्षभरात सांगली, विटा व इस्लामपूर शहरामध्ये सात ते आठ बॅगा पळविण्याचे प्रकार झाले. यामध्ये सुमारे वीस लाखांहून अधिक रोकड पळविण्यात आली. या बॅगा बँकांसमोरून पळविण्यात आल्या, मात्र एकाही कॅमेऱ्यामध्ये चोरट्यांचे चेहरे दिसले नाहीत. बाहेरील बाजूला कॅमेरा बसविणे आमची जबाबदारी नाही, असे सांगून बँक प्रशासन आपली जबाबदारी टाळत आहेत. त्याचबरोबर अनेकदा आवाहन करुनही बँक चालकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. सांगलीतील पुष्पराज चौकामध्ये महिन्यापूर्वीच एका व्यापाऱ्याची पाच लाखांची बॅग पळविण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी संबंधित बँक चालकांना इमारतीबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना केल्या होत्या. आता काल, बुधवारी एका व्यापाऱ्याची ८६ हजारांची बॅग तेथूनच पळविण्यात आली असताना, चोरट्यांचे चेहरे कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व बँकांना सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँका केवळ आतील बाजूस कॅमेरे बसवतात, यामुळे समस्या निर्माण होतात. यापुढे इमारती बाहेरही कॅमेरे बसवले पाहिजेत. आम्ही तीन महिन्याला एकदा ‘बॅकअप’ घेऊन त्याचे रेकॉर्डिंग कंट्रोल रूमला देतो. - लक्ष्मीकांत कट्टी, बँक आॅफ इंडियाचे करन्सी (रोकड) अधिकारीसर्व बॅँकांना सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देऊनही त्याचे पालन केले जात नाही. यापूर्वी चोरी झालेल्या ठिकाणीही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. आता पुन्हा बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कॅमेरे बसवण्यासाठी सूचना त्यांना देण्यात येतील. - प्रकाश गायकवाड, पोलीस उपअधीक्षक, सांगलीसांगली, इस्लामपूर, विट्यातून सात बॅगा लंपासगेल्या वर्षभरातून सांगलीमध्ये बँकांसमोरुन तीन बॅगा, तर विट्यामध्ये तीन व इस्लामपूरमध्ये एक बॅग पळविण्याचा प्रकार झाला आहे. यामधून सुमारे वीस लाखांची रोकड पळविण्यात आली आहे. यातील एकही चोरटा पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. या चोरट्यांचे फुटेज मिळविण्यातही पोलिसांना यश आलेले नाही.