शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

गलाई व्यावसायिक ‘पर्ल्स’मुळे हवालदिल

By admin | Updated: November 12, 2014 23:27 IST

कोट्यवधींची गुंतवणूक : खानापूर तालुक्यात ७000 एजंट

दिलीप मोहिते : विटा ::अवघ्या ६ वर्षे ३ महिन्यांत रक्कम दामदुप्पट करून देण्यासह एजंटांना दुचाकी व चारचाकी गाडी देण्याचा दावा करणाऱ्या आणि सध्या वादात सापडलेल्या ‘पर्ल्स’ कंपनीत खानापूर तालुक्यातील परराज्यात स्थायिक झालेले सोने-चांदी व्यवसायातील गलाई बांधवांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र पर्ल्स कंपनीबाबत उलटसुलट वृत्त येताच गलाई बांधव धास्तावले आहेत. तालुक्यात कंपनीचे सुमारे सात हजार एजंट कार्यरत असल्याचे वृत्त असून, आता या एजंटांच्या दारात अनेक गुंतवणूकदारांनी ठाण मांडले आहे.२००३-०४ च्या सुमारास खानापूर तालुक्यात पर्ल्स कंपनीची एन्ट्री झाली. त्यानंतर एजंटांचा शोध घेत कंपनीच्या जुन्या एजंटांनी खानापूर तालुक्यात नवीन एजंटांचे जाळे विणले. तालुक्यात सोने-चांदी व्यवसाय मोठा असल्याने परराज्यात स्थायिक झालेल्या गलाई बांधवांना एजंटांनी लक्ष्य केले. अनेक गलाई बांधवांनी गुंतवणूक केली. त्यातच एजंटांनाही सुरुवातीला मोठे कमिशन दिले जात असल्याने कालांतराने काही गलाई बांधवांनीही एजंटांची माळ स्वत:च्या गळ्यात अडकवून घेतली.गलाई बांधवही एजंट झाल्याने कंपनीला सुवर्णनगरीत चांगले दिवस आले. आता कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे समजताच गुंतवणूकदारांनी थेट एजंटांना लक्ष्य करीत गुंतवलेले पैसे परत देण्याची मागणी सुरू केली आहे.२०१२ ला करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार खानापूर तालुक्यात ३ हजार ५०० एजंट एकट्या पर्ल्स कंपनीचे काम करीत होते. त्यानंतर या एजंटांत वाढ झाल्यानंतर एजंटांचे संख्याबळ सुमारे सात हजारांपर्यंत पोहोचले. कंपनीत तालुक्यातील सुमारे ५५ ते ६० कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचे समजते. त्यामुळे हे पैसे काढून घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी एजंटांचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एजंटही हवालदिल झाले आहेत.सेवानिवृत्त होऊन गावी परतलेल्या माजी सैनिकांना गाठून कंपनीतील गुंतवणुकीचे फायदे पटवून देत त्यांना गुंतवणूक करण्यास एजंट भाग पाडत होते. काही शेतकऱ्यांनीही कमी कालावधित दामदुप्पट होत असल्याने उसाचे पैसे गुंतवल्याचे उजेडात आले आहे.