शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

गलाई व्यावसायिक ‘पर्ल्स’मुळे हवालदिल

By admin | Updated: November 12, 2014 23:27 IST

कोट्यवधींची गुंतवणूक : खानापूर तालुक्यात ७000 एजंट

दिलीप मोहिते : विटा ::अवघ्या ६ वर्षे ३ महिन्यांत रक्कम दामदुप्पट करून देण्यासह एजंटांना दुचाकी व चारचाकी गाडी देण्याचा दावा करणाऱ्या आणि सध्या वादात सापडलेल्या ‘पर्ल्स’ कंपनीत खानापूर तालुक्यातील परराज्यात स्थायिक झालेले सोने-चांदी व्यवसायातील गलाई बांधवांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र पर्ल्स कंपनीबाबत उलटसुलट वृत्त येताच गलाई बांधव धास्तावले आहेत. तालुक्यात कंपनीचे सुमारे सात हजार एजंट कार्यरत असल्याचे वृत्त असून, आता या एजंटांच्या दारात अनेक गुंतवणूकदारांनी ठाण मांडले आहे.२००३-०४ च्या सुमारास खानापूर तालुक्यात पर्ल्स कंपनीची एन्ट्री झाली. त्यानंतर एजंटांचा शोध घेत कंपनीच्या जुन्या एजंटांनी खानापूर तालुक्यात नवीन एजंटांचे जाळे विणले. तालुक्यात सोने-चांदी व्यवसाय मोठा असल्याने परराज्यात स्थायिक झालेल्या गलाई बांधवांना एजंटांनी लक्ष्य केले. अनेक गलाई बांधवांनी गुंतवणूक केली. त्यातच एजंटांनाही सुरुवातीला मोठे कमिशन दिले जात असल्याने कालांतराने काही गलाई बांधवांनीही एजंटांची माळ स्वत:च्या गळ्यात अडकवून घेतली.गलाई बांधवही एजंट झाल्याने कंपनीला सुवर्णनगरीत चांगले दिवस आले. आता कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे समजताच गुंतवणूकदारांनी थेट एजंटांना लक्ष्य करीत गुंतवलेले पैसे परत देण्याची मागणी सुरू केली आहे.२०१२ ला करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार खानापूर तालुक्यात ३ हजार ५०० एजंट एकट्या पर्ल्स कंपनीचे काम करीत होते. त्यानंतर या एजंटांत वाढ झाल्यानंतर एजंटांचे संख्याबळ सुमारे सात हजारांपर्यंत पोहोचले. कंपनीत तालुक्यातील सुमारे ५५ ते ६० कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचे समजते. त्यामुळे हे पैसे काढून घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी एजंटांचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एजंटही हवालदिल झाले आहेत.सेवानिवृत्त होऊन गावी परतलेल्या माजी सैनिकांना गाठून कंपनीतील गुंतवणुकीचे फायदे पटवून देत त्यांना गुंतवणूक करण्यास एजंट भाग पाडत होते. काही शेतकऱ्यांनीही कमी कालावधित दामदुप्पट होत असल्याने उसाचे पैसे गुंतवल्याचे उजेडात आले आहे.