शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

दहावी परीक्षा रद्द हा शिक्षण हक्क कायद्याचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:26 IST

मिरज : दहावी परीक्षा कोणत्याही परिस्थितीत रद्द करणे योग्य नाही. परीक्षा रद्द झाल्यास सामाजिक न्याय तत्त्व, ग्राहक संरक्षण ...

मिरज : दहावी परीक्षा कोणत्याही परिस्थितीत रद्द करणे योग्य नाही. परीक्षा रद्द झाल्यास सामाजिक न्याय तत्त्व, ग्राहक संरक्षण व शिक्षण हक्क कायद्याचा तो भंग होणार असल्याचा दावा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनचे माजी राज्याध्यक्ष प्रा. रवींद्र फडके यांनी केला आहे तसेच ‘छत्तीसगड पॅटर्न’प्रमाणे विद्यार्थ्यांकडून घरीच पेपर सोडवून घेण्याची गरज होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. फडके म्हणाले, शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पाचवी व आठवीच्या स्तरावर परीक्षा घेण्यास मुभा देणारी सुधारणा महाराष्ट्र सरकार करत आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिक्षकांच्या प्रशिक्षण व मूल्यांकन करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली तयार करून त्यासाठी तीस कोटी रुपयांची निविदा काढली आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांचे मूल्यमापन पाचवी ते आठवीला झाले पाहिजे असे सरकार म्हणते व दुसऱ्या बाजूला दहावीची परीक्षा रद्द करते ही बाब शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारी आहे. परीक्षेला बसू इच्छित नाहीत अशा विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणींत उत्तीर्ण करावे, जे परीक्षेला बसू इच्छितात त्यांची परीक्षा घेतली पाहिजे. दहावीची परीक्षा ही कोरोना काळात ऐच्छिक करावी, अन्यथा तो ग्राहक संरक्षण कायद्याचा भंग ठरेल. परीक्षा या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करतात. छत्तीसगड पॅटर्नप्रमाणे विद्यार्थ्यांना पेपर घरी सोडविण्याची परवानगी दिली तर चालण्यासारखे आहे. त्याप्रमाणे राज्य शासनाने जी बोर्ड प्रश्न पेढी तयार केलेली आहे ती विद्यार्थ्यांनी घरामध्ये बसून पुस्तकांचा वापर करून सोडवावी. त्यामुळे विद्यार्थ्यांचा दहावीचा मूलभूत अभ्यास होऊ शकेल. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा रद्द करणे योग्य होणार नाही. सामाजिक न्याय तत्त्व, ग्राहक संरक्षण व शिक्षण हक्क कायद्याचा तो भंग असेल, असा दावा फडके यांनी केला आहे.