शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

दहावी परीक्षा रद्द हा शिक्षण हक्क कायद्याचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:26 IST

मिरज : दहावी परीक्षा कोणत्याही परिस्थितीत रद्द करणे योग्य नाही. परीक्षा रद्द झाल्यास सामाजिक न्याय तत्त्व, ग्राहक संरक्षण ...

मिरज : दहावी परीक्षा कोणत्याही परिस्थितीत रद्द करणे योग्य नाही. परीक्षा रद्द झाल्यास सामाजिक न्याय तत्त्व, ग्राहक संरक्षण व शिक्षण हक्क कायद्याचा तो भंग होणार असल्याचा दावा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनचे माजी राज्याध्यक्ष प्रा. रवींद्र फडके यांनी केला आहे तसेच ‘छत्तीसगड पॅटर्न’प्रमाणे विद्यार्थ्यांकडून घरीच पेपर सोडवून घेण्याची गरज होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. फडके म्हणाले, शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पाचवी व आठवीच्या स्तरावर परीक्षा घेण्यास मुभा देणारी सुधारणा महाराष्ट्र सरकार करत आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिक्षकांच्या प्रशिक्षण व मूल्यांकन करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली तयार करून त्यासाठी तीस कोटी रुपयांची निविदा काढली आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांचे मूल्यमापन पाचवी ते आठवीला झाले पाहिजे असे सरकार म्हणते व दुसऱ्या बाजूला दहावीची परीक्षा रद्द करते ही बाब शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारी आहे. परीक्षेला बसू इच्छित नाहीत अशा विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणींत उत्तीर्ण करावे, जे परीक्षेला बसू इच्छितात त्यांची परीक्षा घेतली पाहिजे. दहावीची परीक्षा ही कोरोना काळात ऐच्छिक करावी, अन्यथा तो ग्राहक संरक्षण कायद्याचा भंग ठरेल. परीक्षा या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करतात. छत्तीसगड पॅटर्नप्रमाणे विद्यार्थ्यांना पेपर घरी सोडविण्याची परवानगी दिली तर चालण्यासारखे आहे. त्याप्रमाणे राज्य शासनाने जी बोर्ड प्रश्न पेढी तयार केलेली आहे ती विद्यार्थ्यांनी घरामध्ये बसून पुस्तकांचा वापर करून सोडवावी. त्यामुळे विद्यार्थ्यांचा दहावीचा मूलभूत अभ्यास होऊ शकेल. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा रद्द करणे योग्य होणार नाही. सामाजिक न्याय तत्त्व, ग्राहक संरक्षण व शिक्षण हक्क कायद्याचा तो भंग असेल, असा दावा फडके यांनी केला आहे.