शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

किर्लोस्करवाडीत बसस्थानकाची मागणी

By admin | Updated: October 26, 2014 23:23 IST

प्रवाशांची गैरसोय : दररोज शंभरहून अधिक गाड्यांची ये-जा

किरण सावंत : किर्लोस्करवाडी :किर्लोस्करवाडी, रामानंदनगर परिसरातील हजारो प्रवाशांचे बसस्थानकांचे स्वप्न परिवहन खात्याच्या दुर्लक्षामुळे अधुरेच राहिले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. किर्लोस्करवाडीत किर्लोस्करांचा कारखाना, रेल्वेस्थानक, विविध शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, बाजारपेठ अशी महत्त्वाची ठिकाणे असल्याने दररोज दहा ते पंधरा गावातील नागरिकांचा दैनदिंन संपर्क असतो. विद्यार्थी-कामगार आदी हजारो प्रवासी रामानंदनगरमधून ये-जा करीत असतात. जिल्ह्यातील १०० हून अधिक एसटी बसेस किर्लोस्करवाडीमार्गे जातात. तरीही गावात बसस्थानक नाही की प्रवाशांसाठी साधे निवारा शेडही नाही. ऊन, पावसात प्रवाशांना एसटी बसची वाट पहावी लागते. रामानंदनगर येथे बसस्थानक व्हावे, ही मागणी तशी जुनीच आहे. विकासाचे जाळे बनल्याने या परिसरात परिवहन खात्याला उत्पन्न चांगले मिळते, तरीही बसस्थानकाच्या मागणीला आतापर्यंत तरी वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहेत. परिसरातील प्रवाशांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न सुभाष माळी यांनी केला. यासाठी प्रवासी संघटनाही स्थापन केली. बसस्थानकांसाठीही प्रयत्न केले. पण तेही अपुरे पडले. परिवहन खात्यानेही या परिसरातील प्रवाशांची बसस्थानकाची मागणी पूर्ण करून त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी गंभीरपणे विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. रामानंदनगर, बुर्ली, दुधोंडी, नागराळे, सावंतपूर, पुणदी, आमणापूरसह परिसरातील नेत्यांनी या बसस्थानकांसाठी आग्रही भूमिका घेण्याची मागणी होत आहे. पलूस गावात बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर सुसज्ज बसस्थानक झाले. त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. कदम यांनी किर्लोस्करवाडीतील नागरिकांची बसस्थानकाची मागणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.