शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

इस्लामपुरात गुंडगिरी फोफावतेय

By admin | Updated: March 15, 2016 00:13 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : गल्लीबोळातून गुन्हेगारीचा आलेख वाढतोय

अशोक पाटील-- इस्लामपूर शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढतंच चालला आहे. गेल्या काही वर्षात पोलीस ठाण्यात सर्वसामान्यांना न्याय देण्यापेक्षा तडजोडीचेच पेव फुटले आहे. तसेच राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली वावरत असलेल्या गल्लीबोळात फाळकूट दादांची संख्या वाढू लागली आहे. त्यांना लगाम घालण्यात पोलीस अधिकारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुका पार पडेपर्यंत काही अतिसंवेदनशील चौकात टोळीयुध्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शहरात राजरोसपणे मटका सुरु आहे. हा व्यवसाय राजकीय लोकांच्या वरदहस्ताखाली सुरु असून या व्यवसायात मोठी स्पर्धा सुरु आहे. लागलेल्या आकड्याचे पैसे जो लगेच देईल, त्याच बुकीकडे ग्राहकांचा लोंढा वाढला आहे. शहरातील बहुतांश टपऱ्यांमधून खुलेआम मटका सुरु आहे. पालिका प्रशासन त्यांच्याकडून कायदेशीररीत्या जागेची कर वसुली करुन या व्यवसायाला अभयच देत आहे. गेल्या काही महिन्यात शहरात ४ खून झाले आहेत, तर काही गावगुंडांनी हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. खंडणी, सावकारी या व्यवसायाला तर उधाण आले आहे. यातूनच होणाऱ्या पैशाच्या जुळवाजुळवीवर नगरपालिकेची आगामी निवडणूक अवलंबून असल्याची चर्चा गावगुंडांकडून होत आहे.आगामी पालिका निवडणुकीत छोटे प्रभाग असणार आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यातच राष्ट्रवादीत ३ गट सक्रिय आहेत. या गटनेत्यांच्या ताकदीवरच गल्लीबोळातून नवीन उमेदवार निर्माण होऊ लागले आहेत. या गटनेत्यांनी आपणास उमेदवारी दिली नाही, तर बंडखोरी करण्याच्या तयारीतही काहीजण आहेत. त्यामुळे पक्षांतर्गतच मोठा संघर्ष पाहावयास मिळणार, अशी चिन्हे आहेत.राष्ट्रवादीच्या विरोधात महाडिक युवा शक्ती, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येऊन निवडणूक लढवत आले असले तरी, सत्ताधारी ही निवडणूक आर्थिक ताकदीवर एकतर्फी जिंकत आले आहेत. आगामी निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीतच बंडखोरी उफाळणार आहे. शहरात सध्या महाडिक युवाशक्ती, एन.ए., ए.पी. ग्रूप सक्रिय आहेत. त्यांनी आतापासूनच पालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे लाल चौक, शिराळा नाका परिसर, शिवनगर, शिवाजी चौक, जावडेकर चौक संवेदनशील बनत चालले आहेत. ऐन निवडणुकीत याठिकाणी टोळीयुध्द भडकण्याची शक्यता आहे.खमक्या अधिकारी हवाआघाडी शासनाच्या काळात जयंत पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी पोलीस खात्यात अमूलाग्र बदल करू, अत्याधुनिक शस्त्रे देऊ, अशी घोषणा केली होती. परंतु त्यांच्याच इस्लामपूर शहरातील पोलीस ठाण्यात गेल्या १५ वर्षाहून अधिक काळ लोटला तरी, खमक्या पोलीस अधिकारी मिळाला नाही. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे.गेल्या १0 वर्षात शहर व परिसरात वावरणाऱ्या गुंडांची माहिती घेतली जाणार आहे. त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, याची शहानिशा करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शहरात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी सामाजिक संघटनांची मदत घेतली जाईल. ज्यांना गुंडगिरीचा त्रास होत आहे, त्यांनी न घाबरता माझ्याशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.- प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक, इस्लामपूर.