शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

इस्लामपुरात गुंडगिरी फोफावतेय

By admin | Updated: March 15, 2016 00:13 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : गल्लीबोळातून गुन्हेगारीचा आलेख वाढतोय

अशोक पाटील-- इस्लामपूर शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढतंच चालला आहे. गेल्या काही वर्षात पोलीस ठाण्यात सर्वसामान्यांना न्याय देण्यापेक्षा तडजोडीचेच पेव फुटले आहे. तसेच राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली वावरत असलेल्या गल्लीबोळात फाळकूट दादांची संख्या वाढू लागली आहे. त्यांना लगाम घालण्यात पोलीस अधिकारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुका पार पडेपर्यंत काही अतिसंवेदनशील चौकात टोळीयुध्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शहरात राजरोसपणे मटका सुरु आहे. हा व्यवसाय राजकीय लोकांच्या वरदहस्ताखाली सुरु असून या व्यवसायात मोठी स्पर्धा सुरु आहे. लागलेल्या आकड्याचे पैसे जो लगेच देईल, त्याच बुकीकडे ग्राहकांचा लोंढा वाढला आहे. शहरातील बहुतांश टपऱ्यांमधून खुलेआम मटका सुरु आहे. पालिका प्रशासन त्यांच्याकडून कायदेशीररीत्या जागेची कर वसुली करुन या व्यवसायाला अभयच देत आहे. गेल्या काही महिन्यात शहरात ४ खून झाले आहेत, तर काही गावगुंडांनी हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. खंडणी, सावकारी या व्यवसायाला तर उधाण आले आहे. यातूनच होणाऱ्या पैशाच्या जुळवाजुळवीवर नगरपालिकेची आगामी निवडणूक अवलंबून असल्याची चर्चा गावगुंडांकडून होत आहे.आगामी पालिका निवडणुकीत छोटे प्रभाग असणार आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यातच राष्ट्रवादीत ३ गट सक्रिय आहेत. या गटनेत्यांच्या ताकदीवरच गल्लीबोळातून नवीन उमेदवार निर्माण होऊ लागले आहेत. या गटनेत्यांनी आपणास उमेदवारी दिली नाही, तर बंडखोरी करण्याच्या तयारीतही काहीजण आहेत. त्यामुळे पक्षांतर्गतच मोठा संघर्ष पाहावयास मिळणार, अशी चिन्हे आहेत.राष्ट्रवादीच्या विरोधात महाडिक युवा शक्ती, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येऊन निवडणूक लढवत आले असले तरी, सत्ताधारी ही निवडणूक आर्थिक ताकदीवर एकतर्फी जिंकत आले आहेत. आगामी निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीतच बंडखोरी उफाळणार आहे. शहरात सध्या महाडिक युवाशक्ती, एन.ए., ए.पी. ग्रूप सक्रिय आहेत. त्यांनी आतापासूनच पालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे लाल चौक, शिराळा नाका परिसर, शिवनगर, शिवाजी चौक, जावडेकर चौक संवेदनशील बनत चालले आहेत. ऐन निवडणुकीत याठिकाणी टोळीयुध्द भडकण्याची शक्यता आहे.खमक्या अधिकारी हवाआघाडी शासनाच्या काळात जयंत पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी पोलीस खात्यात अमूलाग्र बदल करू, अत्याधुनिक शस्त्रे देऊ, अशी घोषणा केली होती. परंतु त्यांच्याच इस्लामपूर शहरातील पोलीस ठाण्यात गेल्या १५ वर्षाहून अधिक काळ लोटला तरी, खमक्या पोलीस अधिकारी मिळाला नाही. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे.गेल्या १0 वर्षात शहर व परिसरात वावरणाऱ्या गुंडांची माहिती घेतली जाणार आहे. त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, याची शहानिशा करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शहरात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी सामाजिक संघटनांची मदत घेतली जाईल. ज्यांना गुंडगिरीचा त्रास होत आहे, त्यांनी न घाबरता माझ्याशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.- प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक, इस्लामपूर.