शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

इस्लामपुरात गुंडगिरी फोफावतेय

By admin | Updated: March 15, 2016 00:13 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : गल्लीबोळातून गुन्हेगारीचा आलेख वाढतोय

अशोक पाटील-- इस्लामपूर शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढतंच चालला आहे. गेल्या काही वर्षात पोलीस ठाण्यात सर्वसामान्यांना न्याय देण्यापेक्षा तडजोडीचेच पेव फुटले आहे. तसेच राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली वावरत असलेल्या गल्लीबोळात फाळकूट दादांची संख्या वाढू लागली आहे. त्यांना लगाम घालण्यात पोलीस अधिकारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुका पार पडेपर्यंत काही अतिसंवेदनशील चौकात टोळीयुध्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शहरात राजरोसपणे मटका सुरु आहे. हा व्यवसाय राजकीय लोकांच्या वरदहस्ताखाली सुरु असून या व्यवसायात मोठी स्पर्धा सुरु आहे. लागलेल्या आकड्याचे पैसे जो लगेच देईल, त्याच बुकीकडे ग्राहकांचा लोंढा वाढला आहे. शहरातील बहुतांश टपऱ्यांमधून खुलेआम मटका सुरु आहे. पालिका प्रशासन त्यांच्याकडून कायदेशीररीत्या जागेची कर वसुली करुन या व्यवसायाला अभयच देत आहे. गेल्या काही महिन्यात शहरात ४ खून झाले आहेत, तर काही गावगुंडांनी हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. खंडणी, सावकारी या व्यवसायाला तर उधाण आले आहे. यातूनच होणाऱ्या पैशाच्या जुळवाजुळवीवर नगरपालिकेची आगामी निवडणूक अवलंबून असल्याची चर्चा गावगुंडांकडून होत आहे.आगामी पालिका निवडणुकीत छोटे प्रभाग असणार आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यातच राष्ट्रवादीत ३ गट सक्रिय आहेत. या गटनेत्यांच्या ताकदीवरच गल्लीबोळातून नवीन उमेदवार निर्माण होऊ लागले आहेत. या गटनेत्यांनी आपणास उमेदवारी दिली नाही, तर बंडखोरी करण्याच्या तयारीतही काहीजण आहेत. त्यामुळे पक्षांतर्गतच मोठा संघर्ष पाहावयास मिळणार, अशी चिन्हे आहेत.राष्ट्रवादीच्या विरोधात महाडिक युवा शक्ती, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येऊन निवडणूक लढवत आले असले तरी, सत्ताधारी ही निवडणूक आर्थिक ताकदीवर एकतर्फी जिंकत आले आहेत. आगामी निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीतच बंडखोरी उफाळणार आहे. शहरात सध्या महाडिक युवाशक्ती, एन.ए., ए.पी. ग्रूप सक्रिय आहेत. त्यांनी आतापासूनच पालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे लाल चौक, शिराळा नाका परिसर, शिवनगर, शिवाजी चौक, जावडेकर चौक संवेदनशील बनत चालले आहेत. ऐन निवडणुकीत याठिकाणी टोळीयुध्द भडकण्याची शक्यता आहे.खमक्या अधिकारी हवाआघाडी शासनाच्या काळात जयंत पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी पोलीस खात्यात अमूलाग्र बदल करू, अत्याधुनिक शस्त्रे देऊ, अशी घोषणा केली होती. परंतु त्यांच्याच इस्लामपूर शहरातील पोलीस ठाण्यात गेल्या १५ वर्षाहून अधिक काळ लोटला तरी, खमक्या पोलीस अधिकारी मिळाला नाही. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे.गेल्या १0 वर्षात शहर व परिसरात वावरणाऱ्या गुंडांची माहिती घेतली जाणार आहे. त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, याची शहानिशा करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शहरात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी सामाजिक संघटनांची मदत घेतली जाईल. ज्यांना गुंडगिरीचा त्रास होत आहे, त्यांनी न घाबरता माझ्याशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.- प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक, इस्लामपूर.