शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

समांतर पूल बांधा, पण व्यापारपेठेला धक्का नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST

सांगली : कृष्णा नदीवरील ‘आयर्विन’ला समांतर पूल व्हावा, पण नव्या पुलामुळे व्यापारपेठ आणि चिंचबागेला धक्का लागू नये, अशी भूमिका ...

सांगली : कृष्णा नदीवरील ‘आयर्विन’ला समांतर पूल व्हावा, पण नव्या पुलामुळे व्यापारपेठ आणि चिंचबागेला धक्का लागू नये, अशी भूमिका सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी गुरुवारी घेतली. लोकप्रतिनिधी, व्यापारी, नागरिकांना विश्वासात घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. लिंगायत स्मशानभूमीजवळील पुलाला मात्र त्यांनी विरोध दर्शविला.

आयर्विनच्या समांतर पुलाबाबत पवार यांनी पत्रकार बैठकीत भूमिका स्पष्ट केली. यावेळी नागरिक हक्क संघटनेचे नेते सतीश साखळकर, रिक्षा संघटनेचे महादेव पवार, राम देशपांडे, रेखा पाटील उपस्थित होते. पवार म्हणाले, आयर्विन पूल ऐतिहासिक ठेवा आहे. तो जपला पाहिजे. सांगलीची बाजारपेठही वाचविण्याची जबाबदारी साऱ्यांची आहे. समांतर पूल न झाल्यास ही बाजारपेठ उद्ध्वस्त होऊ शकते. पुलामुळे कापडपेठेतील दुकाने पाडावी लागणार असतील, तर ते चुकीचे आहे. तसा प्रयत्न कुणीही करू नये. आम्ही व्यापाऱ्यांसोबत काठ्या घेऊन उभे राहू. मारुती चौक आजही सांगलीची सुरक्षा करायला समर्थ आहे. समांतर पुलावरून अवजड वाहने, मोठी प्रवासी वाहने शहरात आणण्यास बंदी करता येईल. खरेदीनिमित्ताने शहरात येणाऱ्या वाहनांसाठी जनावर बाजार, वैरण बाजार येथे पार्किंगची अत्याधुनिक सुविधा निर्माण करता येऊ शकते. त्यासाठी महापालिकेने जबाबदारी घेतली पाहिजे.

समांतर पुलाबाबत अनेक मतमतांतरे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग यावर भूमिका स्पष्ट करायला तयार नाही. लोकप्रतिनिधी एकमेकांशी बोलायला तयार नाहीत. सर्वपक्षीय नेते, व्यापारी, सामाजिक कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

चौकट

व्यापार मोडून पडेल

सांगलीवाडीतून लिंगायत स्मशानभूमीजवळून शंभरफुटीपर्यंत नवा रस्ता व पूल बांधण्याचे नियोजन आहे. यामुळे सगळी वाहतूक शहराबाहेरून जाईल. त्यामुळे छोटे व्यापारी, रिक्षावाले, भाजी-फळवाले, हातगाडीवाले, छोटे दुकानदार, किराणा-भुसार, कापड व्यापार मोडून पडेल. शंभर फुटीकडे वाहतूक वळवण्याचा आग्रह सांगलीच्या अस्तित्वावर घाला घालणारा ठरणार आहे, असे ते म्हणाले.