शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

मोरणेवर शिंगटेवाडी, चिखलवाडीत कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:30 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क मांगले : मोरणा नदीकाठावरील शिंगटेवाडी, चिखलवाडी नजीक नदीपात्र अरुंद व उथळ आहे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मांगले

: मोरणा नदीकाठावरील शिंगटेवाडी, चिखलवाडी नजीक नदीपात्र अरुंद व उथळ आहे. मोरणा धरणातून सोडलेले पाणी नदीपात्रातून खाली वाहून जाते. त्यामुळे या परिसरात पाण्याचा साठा होत नाही. त्यामुळे शेतीला सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात प्रतिवर्षी पाण्याअभावी पिके वाळून जातात. त्यामुळे शिंगटेवाडी व चिखलवाडीनजीक मोरणा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याची मागणी शिंगटेवाडी व चिखलवाडी येथील शेतकऱ्यांमधून होत आहे.

शिराळ्यानजीकच्या मोरणा मध्यम प्रकल्पातून मोरणा नदीकाठावरील शेतीला पाणी उपलब्ध होते. या पाण्यावरती शिराळा, तडवळे, उपवळे, पाडळी, बिऊर, भाटशिरगाव, जांभळेवाडी, शिंगटेवाडी, चिखलवाडी, मांगलेपर्यंतच्या शेतीला पाणी उपलब्ध होते.

दरम्यान, मोरणा नदीचे पात्र हे तीव्र उताराचे व अरुंद पात्र आहे. मोरणा धरणातून सोडलेले पाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याद्वारे ठिकठिकाणी अडवले जाते. मात्र, नदीवरील बंधाऱ्याची संख्या पुरेशी नाही. शिंगटेवाडीच्या वरील भागात धुमाळवाडी-कुरणे वस्तीदरम्यान मोरणा नदीवर बंधारा आहे. या बंधाऱ्यानंतर शिंगटेवाडी, चिखलवाडी या गावांच्या लगत जवळपास दोन ते अडीच किलोमीटर अंतरादरम्यान मोरणा नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी बंधारा नाही. खाली मांगले हद्दीतील नावडोह बंधाऱ्यात पाणी अडवले जाते. ते अडवलेले पाणी चिखलवाडी, शिंगटेवाडी, जांभळेवाडी शिवारातील नदीपात्रात पोहोचत नाही. त्यामुळे या शिवारातीत शेतकऱ्यांना प्रत्येकवर्षी उन्हाळ्यात पिके जगवण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसून नदीपात्रात खड्डे खोदावे लागतात. त्यातूनही पुरेसे पाणी मिळत नाही, अशी अवस्था आहे.

मोरणा पाटबंधारे विभाग उन्हाळ्यात नदीपात्रात सात दिवस पाणी सोडते व आठ दिवस पाणी बंद ठेवते. हे सोडलेले पाणी शिंगटेवाडीच्या वरील शिवारात उपसा झाल्यामुळे बऱ्याच वेळा खालील शिवारात पोहोचत नाही. जादा क्षमतेने पाणी सोडले तरच पाणी मांगले शिवारातील नावडोह व सरकार बाग बंधाऱ्यापर्यंत पोहोचते. दरम्यान, शिंगटेवाडी, चिखलवाडी दरम्यानचे नदीपात्र तीव्र उताराचे आहे. त्याचबरोबर या दरम्यान बंधारा नसल्याने मोरणा नदीपात्रातून पाणी खाली वाहून जाते. त्यामुळे या परिसरातील नदीपात्र सततच कोरडे ठणठणीत पडलेले असते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक उन्हाळ्यात नदीपात्रात खड्डे खोदावे लागतात व त्या खोदलेल्या खड्डयातील पाणी शेतीला उपसावे लागते. त्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्याचबरोबर कायमच या परिसरातील शेतीला अपुरे पाणी पडत असते. त्यामुळे पिके वाळून जाऊन शेतकऱ्यांना सतत नुकसानीला सामोरे जावे लागते.

दरम्यान, पाटबंधारे विभागाकडे शिंगटेवाडी, चिखलवाडी येथील शेतकऱ्यांनी बंधारा बांधण्याची मागणी अनेक वेळा केली आहे; परंतु त्याची कार्यवाही झालेली नाही. जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, आ. मानसिंगराव नाईक यांनी शेतकऱ्यांची मोरणा नदीवर शिंगटेवाडी व चिखलवाडी शिवारात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याची मागणी पूर्ण करून शिंगटेवाडी, चिखलवाडी येथील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

फोटो : २७ मांगले १

ओळ : शिंगटेवाडी, चिखलवाडी शिवारातील मोरणा नदीचे पात्र बंधाऱ्याअभावी पाणीसाठा होत नसल्याने असे कोरडे ठणठणीत पडलेले असते.