शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मोरणेवर शिंगटेवाडी, चिखलवाडीत कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:30 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क मांगले : मोरणा नदीकाठावरील शिंगटेवाडी, चिखलवाडी नजीक नदीपात्र अरुंद व उथळ आहे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मांगले

: मोरणा नदीकाठावरील शिंगटेवाडी, चिखलवाडी नजीक नदीपात्र अरुंद व उथळ आहे. मोरणा धरणातून सोडलेले पाणी नदीपात्रातून खाली वाहून जाते. त्यामुळे या परिसरात पाण्याचा साठा होत नाही. त्यामुळे शेतीला सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात प्रतिवर्षी पाण्याअभावी पिके वाळून जातात. त्यामुळे शिंगटेवाडी व चिखलवाडीनजीक मोरणा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याची मागणी शिंगटेवाडी व चिखलवाडी येथील शेतकऱ्यांमधून होत आहे.

शिराळ्यानजीकच्या मोरणा मध्यम प्रकल्पातून मोरणा नदीकाठावरील शेतीला पाणी उपलब्ध होते. या पाण्यावरती शिराळा, तडवळे, उपवळे, पाडळी, बिऊर, भाटशिरगाव, जांभळेवाडी, शिंगटेवाडी, चिखलवाडी, मांगलेपर्यंतच्या शेतीला पाणी उपलब्ध होते.

दरम्यान, मोरणा नदीचे पात्र हे तीव्र उताराचे व अरुंद पात्र आहे. मोरणा धरणातून सोडलेले पाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याद्वारे ठिकठिकाणी अडवले जाते. मात्र, नदीवरील बंधाऱ्याची संख्या पुरेशी नाही. शिंगटेवाडीच्या वरील भागात धुमाळवाडी-कुरणे वस्तीदरम्यान मोरणा नदीवर बंधारा आहे. या बंधाऱ्यानंतर शिंगटेवाडी, चिखलवाडी या गावांच्या लगत जवळपास दोन ते अडीच किलोमीटर अंतरादरम्यान मोरणा नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी बंधारा नाही. खाली मांगले हद्दीतील नावडोह बंधाऱ्यात पाणी अडवले जाते. ते अडवलेले पाणी चिखलवाडी, शिंगटेवाडी, जांभळेवाडी शिवारातील नदीपात्रात पोहोचत नाही. त्यामुळे या शिवारातीत शेतकऱ्यांना प्रत्येकवर्षी उन्हाळ्यात पिके जगवण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसून नदीपात्रात खड्डे खोदावे लागतात. त्यातूनही पुरेसे पाणी मिळत नाही, अशी अवस्था आहे.

मोरणा पाटबंधारे विभाग उन्हाळ्यात नदीपात्रात सात दिवस पाणी सोडते व आठ दिवस पाणी बंद ठेवते. हे सोडलेले पाणी शिंगटेवाडीच्या वरील शिवारात उपसा झाल्यामुळे बऱ्याच वेळा खालील शिवारात पोहोचत नाही. जादा क्षमतेने पाणी सोडले तरच पाणी मांगले शिवारातील नावडोह व सरकार बाग बंधाऱ्यापर्यंत पोहोचते. दरम्यान, शिंगटेवाडी, चिखलवाडी दरम्यानचे नदीपात्र तीव्र उताराचे आहे. त्याचबरोबर या दरम्यान बंधारा नसल्याने मोरणा नदीपात्रातून पाणी खाली वाहून जाते. त्यामुळे या परिसरातील नदीपात्र सततच कोरडे ठणठणीत पडलेले असते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक उन्हाळ्यात नदीपात्रात खड्डे खोदावे लागतात व त्या खोदलेल्या खड्डयातील पाणी शेतीला उपसावे लागते. त्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्याचबरोबर कायमच या परिसरातील शेतीला अपुरे पाणी पडत असते. त्यामुळे पिके वाळून जाऊन शेतकऱ्यांना सतत नुकसानीला सामोरे जावे लागते.

दरम्यान, पाटबंधारे विभागाकडे शिंगटेवाडी, चिखलवाडी येथील शेतकऱ्यांनी बंधारा बांधण्याची मागणी अनेक वेळा केली आहे; परंतु त्याची कार्यवाही झालेली नाही. जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, आ. मानसिंगराव नाईक यांनी शेतकऱ्यांची मोरणा नदीवर शिंगटेवाडी व चिखलवाडी शिवारात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याची मागणी पूर्ण करून शिंगटेवाडी, चिखलवाडी येथील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

फोटो : २७ मांगले १

ओळ : शिंगटेवाडी, चिखलवाडी शिवारातील मोरणा नदीचे पात्र बंधाऱ्याअभावी पाणीसाठा होत नसल्याने असे कोरडे ठणठणीत पडलेले असते.