शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मोरणेवर शिंगटेवाडी, चिखलवाडीत कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:30 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क मांगले : मोरणा नदीकाठावरील शिंगटेवाडी, चिखलवाडी नजीक नदीपात्र अरुंद व उथळ आहे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मांगले

: मोरणा नदीकाठावरील शिंगटेवाडी, चिखलवाडी नजीक नदीपात्र अरुंद व उथळ आहे. मोरणा धरणातून सोडलेले पाणी नदीपात्रातून खाली वाहून जाते. त्यामुळे या परिसरात पाण्याचा साठा होत नाही. त्यामुळे शेतीला सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात प्रतिवर्षी पाण्याअभावी पिके वाळून जातात. त्यामुळे शिंगटेवाडी व चिखलवाडीनजीक मोरणा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याची मागणी शिंगटेवाडी व चिखलवाडी येथील शेतकऱ्यांमधून होत आहे.

शिराळ्यानजीकच्या मोरणा मध्यम प्रकल्पातून मोरणा नदीकाठावरील शेतीला पाणी उपलब्ध होते. या पाण्यावरती शिराळा, तडवळे, उपवळे, पाडळी, बिऊर, भाटशिरगाव, जांभळेवाडी, शिंगटेवाडी, चिखलवाडी, मांगलेपर्यंतच्या शेतीला पाणी उपलब्ध होते.

दरम्यान, मोरणा नदीचे पात्र हे तीव्र उताराचे व अरुंद पात्र आहे. मोरणा धरणातून सोडलेले पाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याद्वारे ठिकठिकाणी अडवले जाते. मात्र, नदीवरील बंधाऱ्याची संख्या पुरेशी नाही. शिंगटेवाडीच्या वरील भागात धुमाळवाडी-कुरणे वस्तीदरम्यान मोरणा नदीवर बंधारा आहे. या बंधाऱ्यानंतर शिंगटेवाडी, चिखलवाडी या गावांच्या लगत जवळपास दोन ते अडीच किलोमीटर अंतरादरम्यान मोरणा नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी बंधारा नाही. खाली मांगले हद्दीतील नावडोह बंधाऱ्यात पाणी अडवले जाते. ते अडवलेले पाणी चिखलवाडी, शिंगटेवाडी, जांभळेवाडी शिवारातील नदीपात्रात पोहोचत नाही. त्यामुळे या शिवारातीत शेतकऱ्यांना प्रत्येकवर्षी उन्हाळ्यात पिके जगवण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसून नदीपात्रात खड्डे खोदावे लागतात. त्यातूनही पुरेसे पाणी मिळत नाही, अशी अवस्था आहे.

मोरणा पाटबंधारे विभाग उन्हाळ्यात नदीपात्रात सात दिवस पाणी सोडते व आठ दिवस पाणी बंद ठेवते. हे सोडलेले पाणी शिंगटेवाडीच्या वरील शिवारात उपसा झाल्यामुळे बऱ्याच वेळा खालील शिवारात पोहोचत नाही. जादा क्षमतेने पाणी सोडले तरच पाणी मांगले शिवारातील नावडोह व सरकार बाग बंधाऱ्यापर्यंत पोहोचते. दरम्यान, शिंगटेवाडी, चिखलवाडी दरम्यानचे नदीपात्र तीव्र उताराचे आहे. त्याचबरोबर या दरम्यान बंधारा नसल्याने मोरणा नदीपात्रातून पाणी खाली वाहून जाते. त्यामुळे या परिसरातील नदीपात्र सततच कोरडे ठणठणीत पडलेले असते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक उन्हाळ्यात नदीपात्रात खड्डे खोदावे लागतात व त्या खोदलेल्या खड्डयातील पाणी शेतीला उपसावे लागते. त्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्याचबरोबर कायमच या परिसरातील शेतीला अपुरे पाणी पडत असते. त्यामुळे पिके वाळून जाऊन शेतकऱ्यांना सतत नुकसानीला सामोरे जावे लागते.

दरम्यान, पाटबंधारे विभागाकडे शिंगटेवाडी, चिखलवाडी येथील शेतकऱ्यांनी बंधारा बांधण्याची मागणी अनेक वेळा केली आहे; परंतु त्याची कार्यवाही झालेली नाही. जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, आ. मानसिंगराव नाईक यांनी शेतकऱ्यांची मोरणा नदीवर शिंगटेवाडी व चिखलवाडी शिवारात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याची मागणी पूर्ण करून शिंगटेवाडी, चिखलवाडी येथील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

फोटो : २७ मांगले १

ओळ : शिंगटेवाडी, चिखलवाडी शिवारातील मोरणा नदीचे पात्र बंधाऱ्याअभावी पाणीसाठा होत नसल्याने असे कोरडे ठणठणीत पडलेले असते.