शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजना पूर्ण तरीही बुधगाव तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : बुधगाव (ता. मिरज) येथील पूर्ण झालेली पेयजल योजना केवळ वीज महावितरणच्या अडवणुकीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मिरज : बुधगाव (ता. मिरज) येथील पूर्ण झालेली पेयजल योजना केवळ वीज महावितरणच्या अडवणुकीच्या धोरणाने कार्यान्वित होण्यात अडथळा निर्माण झाल्याने योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असलेला गाव अद्याप तहानलेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ संतप्त आहेत. योजनेचा तातडीने वीजपुरवठा न जोडल्यास वीज महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य विक्रम पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

बुधगावसाठी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नातून चार कोटींहून अधिक खर्चाची नवीन पेयजल योजना पूर्ण झाली आहे. वीजजोडणीचे काम बाकी आहे. वीजजोडणीसाठी खासदार संजय काका पाटील यांनी वेगळ्या निधीची तरतूद केली आहे. यातून योजनेच्या वीजपुरवठ्याची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र वीज महावितरण अधिकाऱ्यांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे योजनेचा वीजपुरवठा जोडला जात नसल्याने पूर्ण झालेली पाणी योजना कार्यान्वित होऊ शकलेली नाही. वीस वर्षांनंतर योजनेचे पाणी मिळेल या अपेक्षेने ग्रामस्थांचे योजनेकडे लक्ष लागून आहे. मात्र. महावितरणचे अधिकारी जुन्या कालबाह्य योजनेच्या थकीत बिलाचे कारण पुढे करून योजनेचा वीजपुरवठा जोडत नसल्याने अधिकाऱ्यांच्या अडवणुकीच्या धोरणाने योजना पूर्ण होऊनही गाव पाण्याअभावी तहानलेला आहे. महावितरणच्या अडवणुकीच्या कारभारावर ग्रामस्थ संतप्त आहेत. योजनेचा तातडीने वीजपुरवठा न जोडल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती व सदस्य विक्रम पाटील यांच्यासह मनोहर पाटील, संभाजी पाटील, अभिजित गावडे, रोहित पाटील, सिद्धार्थ जाधव, विशाल पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

चौकट

आमदार व खासदार लक्ष देणार का : पाटील

कालबाह्य झालेल्या सात गावच्या पाणी योजनेच्या थकबाकीचा मुद्दा पुढे करून महावितरणचे अधिकारी नव्या पाणी योजनेचा वीजपुरवठा जोडण्यास नकार देऊन केवळ एका गावास वेठीस धरत आहेत हे चुकीचे आहे. सध्या गावात पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर असल्याने खासदार संजयकाका पाटील व आमदार सुधीर गाडगीळ यांनी लक्ष घालून वीजजोडणीचा प्रश्न सोडवून योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी पंचायत समिती सदस्य विक्रम पाटील यांनी केली आहे.