शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

ब्रिटिशकालीन कालव्याची पुन्हा दुरवस्था...

By admin | Updated: November 11, 2015 00:13 IST

या कालव्यामध्ये साचलेला गाळ काढण्याची, नव्याने अस्तरीकरणाची व नव्याने दुरुस्ती करण्याची गरज असून, त्यासाठी पाठपुरावा आवश्यक

किर्लोस्करवाडी : विजेसाठी एक रुपयाही खर्च न करता केवळ सायपन पद्धतीने वाहणाऱ्या ब्रिटिशकालीन कृष्णा कालव्याची दुरवस्था झाली आहे. या कालव्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नेतेमंडळी आणि प्रशासनाने पाठपुरावा करण्याची गरज आहे.कऱ्हाड, वाळवा, पलूस आणि तासगाव तालुक्यातील सुमारे ४१ हजार ३०२ एकर क्षेत्र ओलिताखाली आणणारा हा कालवा बारमाही वाहता रहावा, यासाठी कृती समिती स्थापन करुन शासनावर दबाव आणला होता. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने या कालव्याला २७० टीएमसी पाणी राखीव ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र आजअखेर हे पाणी कोणत्या धरणातून मिळणार, याचा निर्णय घेण्यात तत्कालीन व विद्यमान शासनाने पदाधिकारी व अधिकारी घेऊ शकले नाहीत. आजही हा निर्णय झालेलाच नाही. कृती समितीने मागणी केल्यानंतरच २००६-२००७ साठी जागतिक बँकेच्या अर्थसहायातून सुमारे १६ कोटी खर्च करुन कालव्याच्या दोन्ही बाजूचे रस्ते करण्यात आले होते. कालव्याच्या सुरुवातीपासून खोडशीपासून ते वसगडेपर्यंतच्या ८६ किमीच्या कालव्यात आणि आजूबाजूच्या पोटकालव्यांमध्ये झाडे-झुडपे तसेच गवत उगवले असून, या कालव्यामध्ये साचलेला गाळ काढण्याची, नव्याने अस्तरीकरणाची व नव्याने दुरुस्ती करण्याची गरज असून, त्यासाठी पाठपुरावा आवश्यक आहे. (वार्ताहर)