शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जातनिहाय जनगणनेसाठी मोठा लढा उभारू : गोरे, संविधानिक न्याययात्रेचे सांगलीत आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:28 IST

सांगली : विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी इतर मागासवर्गीय समाजाची (ओबीसी) जातनिहाय जनगणना करण्यात यावी. याप्रश्नी शासनाने दखल न घेतल्यास मोठा लढा उभारण्यात येईल,

ठळक मुद्दे जनगणना नसल्यामुळे ओबीसींच्या प्रश्नांची गर्दी वाढली

सांगली : विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी इतर मागासवर्गीय समाजाची (ओबीसी) जातनिहाय जनगणना करण्यात यावी. याप्रश्नी शासनाने दखल न घेतल्यास मोठा लढा उभारण्यात येईल, असा इशारा भारतीय ओबीसी शोषित संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर गोरे यांनी सोमवारी सांगलीत दिला.

संघटनेमार्फत देशव्यापी ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी सुरू असलेल्या संविधानिक न्याय यात्रेचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या पिछाडीस असलेल्या कालिका मंदिरात संघटनेचा मेळावा झाला. याठिकाणी व्यासपीठावर संघटनेचे गणेश सुतार, विलास काळे, दिलीप दीक्षित, माया गोरे, सुनीता काळे उपस्थित होते. गोरे म्हणाले की, ओबीसींची जातनिहाय जनगणना भारतीय संविधानानुसार आजतागायत झालेली नाही. घटनेच्या ३४० व्या कलमानुसार ओबीसींचा सर्वांगीण विकास केवळ जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे होऊ शकला नाही. भटके विमुक्त अल्पसंख्यांकांना सुरक्षा तथा नागरी हक्क मिळालेच पाहिजेत. जनगणना नसल्यामुळे ओबीसींच्या प्रश्नांची गर्दी वाढत आहे. अनेक नवनवे प्रश्न निर्माण होत आहेत.

खासगी क्षेत्रात ओबीसी, एस. सी. एन. टी यांना आरक्षण लागू करावे, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत.यावेळी प्रा. सुभाष दगडे, डॉ. संपतराव गायकवाड, दत्तात्रय घाटगे, अरुण खरमाटे, राजेंद्र माळी, चंद्रकांत मालवणकर उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्चना सुतार, विनायक सुतार व सुरेश सुतार यांनी केले....अन्यथा महाराष्ट्रात तीव्र आंदोलनशासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करायला हवा. आम्ही त्यासाठीच यात्रा काढली आहे. तरीही शासनाने दखल घेतली नाही, तर देशातील सर्व ओबीसी समाज एकवटल्याशिवाय राहणार नाही. हा समाज एकत्र आल्यानंतर मोठे आंदोलन उभे केले जाईल. जातनिहाय जनगणनेबरोबरच महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावे, सर्व मागास आयोगाची अंमलबजावणी करावी, कोरेगाव-भीमा दंगलीस कारणीभूत असलेल्या लोकांवर कारवाई करावी, आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.