शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दिघंचीतील माणगंगा नदीवरील पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:26 IST

मल्हारपेठ-पंढरपूर या राज्यमार्गावर हा पूल असून, बांधकाम १९७४ मध्ये २२ लाख ४२ हजार रुपये खर्चून करण्यात आले होते. त्यावेळी ...

मल्हारपेठ-पंढरपूर या राज्यमार्गावर हा पूल असून, बांधकाम १९७४ मध्ये २२ लाख ४२ हजार रुपये खर्चून करण्यात आले होते. त्यावेळी या पुलावरून वाहतूक फार कमी प्रमाणात होती. सध्या या पुलावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. ऊस वाहतुकीबरोबर अवजड वाहतूकही या पुलावरून होत असल्याने धोका निर्माण होत आहे.

मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील माणगंगा नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याने येथील र स्त्याचे रुंदीकरण झाले आहे. मात्र नदीवरील पूल अरुंद आहे.

दिघंची हे गाव सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. दिघंचीपासून अवघ्या बारा किमी अंतरावर राजेवाडी साखर कारखाना असल्याने बऱ्याच प्रमाणात ऊस वाहतूकही या पुलावरून होत आहे. यामुळे पर्यायी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

कोट

माणगंगा नदीवरील पूल अरुंद झाला आहे, पुलाची दुरवस्था झाली आहे, कठडे तुटले आहेत. सध्या या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे व पर्यायी पूल बांधण्यात यावा, यासाठी आमदार अनिल बाबर आमदार अनिल बाबर व तानाजीराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. - अमोल मोरे, सरपंच, दिघंची

फोटो-२८दिघंची१

फोटो ओळी : दिघंची येथील माणगंगा नदीवरील धोकादायक स्थितीत व अरुंद असलेल्या पुलाची दुरवस्था झाली आहे.