शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
2
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
5
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
6
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
7
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
8
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
9
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
10
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
11
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
12
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
13
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
14
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
15
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
16
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
17
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
18
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
19
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
20
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे कोटीच्या कामांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:46 IST

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेच्या जवळपास दीडशे कोटीच्या कामांना ब्रेक लागला आहे. यात नगरोत्थान योजनेतून मंजूर ...

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेच्या जवळपास दीडशे कोटीच्या कामांना ब्रेक लागला आहे. यात नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या शंभर कोटीच्या निधीचाही समावेश आहे. याशिवाय समाजकल्याण, नगरसेवकांच्या स्थानिक विकास निधीतील कामेही आचारसंहितेच्या कात्रीत अडकली.महापालिकेला नगरोत्थान योजनेतून शंभर कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून २७८ कामांची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात रस्ते, गटारी, भाजी मंडई, नाट्यगृहाचे नूतनीकरण यासह अनेक कामांचा समावेश आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी ही कामे सुरू व्हावीत, यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी कमी कालावधी म्हणजे सात दिवस मुदतीची निविदाही काढण्यात आली. या निविदा प्रसिद्ध करून चार दिवस झाले आहेत. पण आचारसंहिता लागू झाल्याने निविदेची पुढील प्रक्रिया थांबणार आहे. आता ही कामे मे महिन्यातच सुरू होतील.जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला दलित वस्ती सुधारसाठी निधी मिळाला होता. गेल्यावर्षी ११.४५ कोटीचा निधी आला होता. पण हा निधी महापालिकेने वेळेवर खर्च न केल्याने पावणेसात कोटीचा निधी परत गेला आहे. आता उर्वरित पाच कोटीची कामे मार्चपर्यंत मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. पण आचारसंहितेमुळे ही कामेही कात्रीत सापडली आहे. नगरसेवकांच्या स्थानिक विकास निधीतून दोन लाखांच्या कामाच्या फायली मोठ्या प्रमाणात तयार आहेत. पण ही कामे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून थांबविली आहेत.महापालिकेच्या अंदाजपत्रकात नगरसेवकांसाठी दहा लाखाचा निधी देण्यात आला होता. या निधीतील कामांचे प्रस्तावही तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. गेल्याच आठवड्यात मंजुरीसाठी अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. काही कामांना आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविला, तर काही कामांच्या प्रस्तावांवर शेरे मारण्यात आले आहेत. या जवळपास सात ते आठ कोटीच्या कामांना ब्रेक लागला आहे.मे महिन्यात कामांचा धुरळामहापालिकेकडून तब्बल दीडशे कोटीची कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. काही कामांच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. पण आचारसंहिता लागू झाल्याने ही सर्व कामे थांबणार आहेत. मे महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू होतील. त्यामुळे पुढील दोन महिने प्रशासकीय स्तरावर सामसूमच राहणार आहे.बजेट अडकलेमहापालिकेचे बजेटही आचारसंहितेत अडकले आहे. प्रशासनाने साडेसातशे कोटीचे बजेट स्थायीकडे सादर केले होते. स्थायीकडून महासभेकडे बजेट गेलेले नाही. आता निवडणुकीनंतरच अंतिम बजेट सादर करावे लागणार आहे.