शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

वीज तारांनजीकच्या झाडाच्या फांद्या तोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:27 IST

मिरज बसस्थानकामध्ये स्वच्छतेची मागणी मिरज : शहरातील बसस्थानकामध्ये प्रवाशांची रहदारी वाढत आहे. सध्या कोरोनामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. ...

मिरज बसस्थानकामध्ये स्वच्छतेची मागणी

मिरज : शहरातील बसस्थानकामध्ये प्रवाशांची रहदारी वाढत आहे. सध्या कोरोनामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यामुळे बसस्थानक परिसरात स्वच्छतेसह कोरोनाबाबत सुरक्षेसाठी सर्व बाबींची खबरदारी घेतली जावी, अशी मागणी होत आहे.

कोरोना लसीबाबत जनजागृतीची गरज

जत : जत तालुक्यात सध्या कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, अनेक नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. काही गैरसमजांमुळे ते लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. यामुळे कोरोना लसीकरणाबाबत ग्रामीण भागामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.

वीज पुरवठा खंडितच्या नोटिसा

करगणी : आटपाडी तालुक्यातील वीज ग्राहकांना वीज बिल वसुलीसाठी महावितरणच्या कार्यालयातून वीज पुरवठा खंडित करण्याच्या नाेटिसा देण्यात येत आहेत. काेराेना व लॉकडाऊनमुळे एकीकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असताना अशा नाेटिसांमुळे वीज ग्राहकांमध्ये अस्वस्थता आहे. यामुळे महावितरणने वीज बिलांची सक्ती न करता थकीत वीज बिलाचे हप्ते ठरवून ते भरण्यासाठी याेग्य ती मुदत द्यावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून करण्यात येत आहे.

चरण परिसरात शेतीच्या मशागती

चरण : शिराळा तालुक्यातील चरण परिसरात शेतीच्या मशागतींच्या कामांनी वेग घेतला आहे. मशागतीच्या खर्चात एकरी सुमारे ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. आधीच शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात आहे. त्यातच शेतीच्या मशागतीत दरवाढ झाल्याने शेतकरी विवंचनेत आहेत.

डासांचा उपद्रव वाढला

कुपवाड : कुपवाड शहर व उपनगरांमध्ये दोन वादळी पाऊस झाल्यामुळे पाणी साचून राहिले आहे. यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. महापालिकेने शहरात धूर फवारणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी हाेत आहे.

पेट्रोल चोरट्यांचा बंदोबस्त करावा

कवठेमहांकाळ : शहरात मागील काही दिवसांपासून पेट्रोल चोरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलचोर शाळा, महाविद्यालय, शहरातील विविध चौक, तसेच कॉम्प्लेक्समधील वाहनतळातून पेट्रोल चोरी करतात. या भुरट्या चोरट्यांवर कारवाईची नागरिकांनी मागणी केली आहे.

सांगलीतील बायपास रस्त्यावरच कचरा

सांगली : सांगलीतील बायपास रस्त्यावरच काही हॉटेल व्यावसायिक कचरा टाकत आहेत. यामुळे घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कलानगरमधील नाल्यांचा उपसा वेळेवर होत नाही. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. डासांचे प्रमाण वाढून आजार होऊ शकतात. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.