शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांचे दौऱ्यातून ब्रॅन्डिंग; लोकांच्या अपेक्षांचे लॅन्डिंग

By admin | Updated: April 24, 2016 23:53 IST

तासगाव दौरा : दुष्काळ, पाणी योजनांच्या ठोस घोषणांचा भ्रमनिरास

दत्ता पाटील-- तासगाव --तासगाव तालुक्याला मंत्रीपद तसे नवखे नाही. मात्र भाजपचे सरकार आल्यानंतर तालुक्याला मंत्रिपदाची पोकळी जाणवू लागली. खासदार संजयकाकांनी ही पोकळी भरुन काढण्यासाठी तालुक्यात मंत्र्यांची हजेरी लावण्यासाठी वजन दाखवून दिले. मात्र ग्रामविकासमंत्री, जलसंपदामंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या दोन दिवसातील दौऱ्यातून केवळ शासन निर्णयाचे ब्रॅन्डींगच केल्याचे दिसून आले. तालुक्यातील दुष्काळ, रखडलेल्या पाणी योजनांच्याबाबतीत एकाही मंत्र्याकडून आश्वासक निर्णय जाहीर झाला नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेचा भ्रमनिरास तर झालाच, किंंबहुना मंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षांचे लॅन्डिंग झाल्याचे चित्र दिसून आले.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे सलग पंधरा वर्षे मंत्रीपद होते. नेहमीच सत्तेवर असणाऱ्या या तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा नेतृत्वाची धुरा संजयकाकांकडे आली. खासदार पाटील यांनीही शासनदरबारी आपले वजन वापरून तालुक्याच्या, मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्र्यांना तासगावात येण्याचे आवाहन केले. संजयकाकांच्या आग्रहामुळे गुरुवारी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सावळज येथील सरपंच परिषदेला हजेरी लावली, तर शुक्रवारी छत्रपती शिवरायांच्या पुतळा भूमिपूजनाच्या निमित्ताने जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी हजेरी लावली.भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा सहा महिन्यात तासगावचा हा दुसरा दौरा. ग्रामविकासमंत्री, जलसपंदामंत्र्यांचा हा पहिलाच दौरा झाला. तालुक्यात रखडलेल्या पाणी योजनांसाठी निधीचा प्रश्न आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न भेडसावत आहे. अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र मंत्र्यांच्या दौऱ्यात या समस्यांबाबत ठोस आश्वासन मिळाले नाही. बहुतांश नेत्यांनी तालुक्यातील समस्याच बेदखल केल्याचे दिसून आले. पंकजा मुंडे यांनी सावळज दौऱ्यात ग्रामविकास विभागाने घेतलेल्या निर्णयांचे ब्रॅन्डींग केले. सरकारने किती लोकहिताचे निर्णय घेतले, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. जाता-जाता दोन वर्षात राज्यातील दुष्काळ संपवू, असे आश्वासनाचे गाजर दाखवले, इतकाच काय तो दिलासा. मंत्र्यांचे दौरे हे शासनाच्या कँपेनिंगसाठी होते, की दुष्काळग्रस्तांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.शासन दरबारी दाखवले वजनसंजयकाकांनी तालुक्यात मंत्र्यांना आणून, शासनदरबारी असलेले वजन दाखवून दिले. जनतेची दुष्काळाची वेदना सावळजच्या जाहीर सभेत ग्रामविकास मंत्र्यांच्या कानावर घातली. तासगाव येथील कार्यक्रमातदेखील जलसंपदामंत्र्यांकडून जनतेच्या अपेक्षा असल्याची भावना व्यक्त केली. मात्र दोन्ही ठिकाणी मंत्र्यांकडून तालुक्याच्या प्रश्नांची दखल घेतली गेलीच नाही.