शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

मंत्र्यांचे दौऱ्यातून ब्रॅन्डिंग; लोकांच्या अपेक्षांचे लॅन्डिंग

By admin | Updated: April 24, 2016 23:53 IST

तासगाव दौरा : दुष्काळ, पाणी योजनांच्या ठोस घोषणांचा भ्रमनिरास

दत्ता पाटील-- तासगाव --तासगाव तालुक्याला मंत्रीपद तसे नवखे नाही. मात्र भाजपचे सरकार आल्यानंतर तालुक्याला मंत्रिपदाची पोकळी जाणवू लागली. खासदार संजयकाकांनी ही पोकळी भरुन काढण्यासाठी तालुक्यात मंत्र्यांची हजेरी लावण्यासाठी वजन दाखवून दिले. मात्र ग्रामविकासमंत्री, जलसंपदामंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या दोन दिवसातील दौऱ्यातून केवळ शासन निर्णयाचे ब्रॅन्डींगच केल्याचे दिसून आले. तालुक्यातील दुष्काळ, रखडलेल्या पाणी योजनांच्याबाबतीत एकाही मंत्र्याकडून आश्वासक निर्णय जाहीर झाला नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेचा भ्रमनिरास तर झालाच, किंंबहुना मंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षांचे लॅन्डिंग झाल्याचे चित्र दिसून आले.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे सलग पंधरा वर्षे मंत्रीपद होते. नेहमीच सत्तेवर असणाऱ्या या तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा नेतृत्वाची धुरा संजयकाकांकडे आली. खासदार पाटील यांनीही शासनदरबारी आपले वजन वापरून तालुक्याच्या, मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्र्यांना तासगावात येण्याचे आवाहन केले. संजयकाकांच्या आग्रहामुळे गुरुवारी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सावळज येथील सरपंच परिषदेला हजेरी लावली, तर शुक्रवारी छत्रपती शिवरायांच्या पुतळा भूमिपूजनाच्या निमित्ताने जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी हजेरी लावली.भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा सहा महिन्यात तासगावचा हा दुसरा दौरा. ग्रामविकासमंत्री, जलसपंदामंत्र्यांचा हा पहिलाच दौरा झाला. तालुक्यात रखडलेल्या पाणी योजनांसाठी निधीचा प्रश्न आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न भेडसावत आहे. अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र मंत्र्यांच्या दौऱ्यात या समस्यांबाबत ठोस आश्वासन मिळाले नाही. बहुतांश नेत्यांनी तालुक्यातील समस्याच बेदखल केल्याचे दिसून आले. पंकजा मुंडे यांनी सावळज दौऱ्यात ग्रामविकास विभागाने घेतलेल्या निर्णयांचे ब्रॅन्डींग केले. सरकारने किती लोकहिताचे निर्णय घेतले, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. जाता-जाता दोन वर्षात राज्यातील दुष्काळ संपवू, असे आश्वासनाचे गाजर दाखवले, इतकाच काय तो दिलासा. मंत्र्यांचे दौरे हे शासनाच्या कँपेनिंगसाठी होते, की दुष्काळग्रस्तांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.शासन दरबारी दाखवले वजनसंजयकाकांनी तालुक्यात मंत्र्यांना आणून, शासनदरबारी असलेले वजन दाखवून दिले. जनतेची दुष्काळाची वेदना सावळजच्या जाहीर सभेत ग्रामविकास मंत्र्यांच्या कानावर घातली. तासगाव येथील कार्यक्रमातदेखील जलसंपदामंत्र्यांकडून जनतेच्या अपेक्षा असल्याची भावना व्यक्त केली. मात्र दोन्ही ठिकाणी मंत्र्यांकडून तालुक्याच्या प्रश्नांची दखल घेतली गेलीच नाही.