शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बहुजनांनी ब्राह्मण्यवाद्यांचे राज्य उलथवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:29 IST

वाटेगाव : बहुजन समाजातील लोकांनी एकत्र येऊन ब्राह्मण्यवाद्यांचे राज्य बदलून टाकावे, असे प्रतिपादन बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष, राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केले. वाटेगाव (ता. वाळवा) येथून बहुजन क्रांती मोर्चा, परिवर्तन यात्रेचा प्रारंभ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.मेश्राम म्हणाले, कोरेगाव-भीमा ...

वाटेगाव : बहुजन समाजातील लोकांनी एकत्र येऊन ब्राह्मण्यवाद्यांचे राज्य बदलून टाकावे, असे प्रतिपादन बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष, राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केले. वाटेगाव (ता. वाळवा) येथून बहुजन क्रांती मोर्चा, परिवर्तन यात्रेचा प्रारंभ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.मेश्राम म्हणाले, कोरेगाव-भीमा येथे भिडे-एकबोटेंनी दंगल घडवून एकसंध बहुजन समाजामध्ये जातीय भावना भडकावून विभाजन करण्याचे षड्यंत्र रचले. ते षड्यंत्र जागरुक बहुजन समाजाने हाणून पाडले. बहुजन समाजाला एकसंध करुन ब्राह्मणी व्यवस्थेविरोधात संघर्ष करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाने परिवर्तन यात्रेचे आयोजन केले आहे. तेव्हा बहुजन समाजातील मराठा, ओ.बी.सी., अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जमाती, बलुतेदार, एस.बी.सी., मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, लिंगायत, शीख, जैन आदी समूहातील बांधवांनी आपले हक्क व अधिकार नष्ट होऊ नयेत, म्हणून एकत्र येऊन न्याय्य हक्कासाठी एकीची वज्रमूठ करुन लढा दिला पाहिजे.संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष उमेश शेवाळे म्हणाले, बहुजन समाजातील लोकांनी बहुजनक्रांती मोर्चाला बळ देऊन संघटना मोठी बनवावी. राज्याच्या ग्रामीण भागात ही परिवर्तन यात्रा मोठ्या प्रमाणात काढण्यात येणार आहे. यावेळी सरपंच सुरेश साठे, पोलीसपाटील संतोष करांडे, ग्रा. पं. सदस्य विनोद जाधव, संजय जाधव, अण्णा भाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्री साठे, नीशा मेश्राम, डॉ. आर. एन. कवठेकर, माया जमदाडे उपस्थित होते. योगेश साठे यांनी प्रास्ताविक केले. शालिग्राम आलामी यांनी आभार मानले.