शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

रावळगुंडवाडीत दोन्ही पाणी योजना फोल

By admin | Updated: May 24, 2017 23:39 IST

रावळगुंडवाडीत दोन्ही पाणी योजना फोल

जयवंत आदाटे । लोकमत न्यूज नेटवर्कजत : तालुक्यातील रावळगुंडवाडी गावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शिवकालीन पाणी साठवण योजना आणि जलस्वराज्य योजना याची अंमलबजावणी झाली आहे. परंतु गतवर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे दोन्ही योजना कुचकामी ठरल्या आहेत. सध्या १२ हजार लिटर क्षमतेच्या एका टॅँकरद्वारे रोज तीन खेपा करून गावासह तेथील चार वस्त्यांवर टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.रावळगुंडवाडीची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. २५ किलोमीटरवर असलेल्या बिरनाळ साठवण तलावातून टॅँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २००५-०६ या वर्षात शिवकालीन पाणी साठवण योजना अंमलात आणली होती. यावेळी सार्वजनिक इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवून जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला होता. त्यासाठी ८० हजार रुपये खर्च करण्यात आले होते. २०११-१२ या वर्षात गावातील सर्व इमारतीवरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यात आले होते. त्यासाठी १४ लाख रुपये खर्च करण्यात आले होते.२००८-०९ वर्षात रावळगुंडवाडी गावासाठी जलस्वराज्य योजना मंजूर झाली होती. या योजनेतून गावाच्या दक्षिण बाजूस सुमारे ५०० मीटर अंतरावर १२५ फूट खोल विहीर खोदून त्यातून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे विहिरीतील उद्भव बंद झाला आहे. विहिरीची आणखी खुदाई केल्यानंतर पाणी लागेल या आशेवर ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून विहिरीची खुदाई केली आहे. परंतु पाणी लागले नाही. २००४ चा अपवाद वगळता या गावाला मागील १५ वर्षांत एकदाही टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागला नाही.शिवकालीन पाणी साठवण योजनेचा गावाला निश्चित स्वरूपात फायदा झाला आहे. गाव टॅँकरमुक्त झाले होते. परंतु गतवर्षी पाऊस कमी पडल्यामुळे यावर्षी टॅँकरची मागणी करावी लागली आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच बसाप्पा सुतार व उपसरपंच आण्णाप्पा हिरगोंड यांनी व्यक्त केली. सध्या गावाला बिरनाळ साठवण तलावातून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. हे पाणी अशुद्ध आहे, ते शुद्ध केले जात नाही. तलावातून पाणी विद्युत मोटारीद्वारे उचलून टॅँकरमध्ये भरले जाते. तो टॅँकर २५ किलोमीटर अंतरावर नेऊन तेथे त्या पाण्याचे वाटप केले जाते. या पाण्यात टी. सी. एल. मिसळून त्याचे वाटप केले जाते, असा दावा प्र्रशासनाकडून केला जात आहे. परंतु २५ किलोमीटर अंतरावरून सतत ढवळून आलेल्या पाण्यात तात्काळ टीसीएल टाकून ते शुद्ध कसे होणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पिण्याच्या पाण्यासाठी चार किलोमीटरवर पायपीटटॅँकरद्वारे मिळणाऱ्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जात नाही. अंघोळ व इतर दैनंदिन वापरासाठी त्याचा उपयोग केला जात आहे. पिण्यासाठी तीन-चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणून त्याचा उपयोग नागरिक करत आहेत. टॅँकरद्वारे मिळणाऱ्या दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, अशी भीती नागरिक व्यक्त करत असले तरी, त्याची शक्यता कमी आहे, असा दावा सरपंच बसाप्पा सुतार व उपसरपंच आण्णाप्पा हिरगोंड यांनी केला आहे.