शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

दोघा भाऊंची गट्टी अन् बदलाचे वारे

By admin | Updated: December 15, 2015 00:34 IST

शिराळ्यातील चित्र : शिवाजीराव नाईकांविरोधात राजकीय व्यूहरचना

अशोक पाटील-- इस्लामपूर -शिराळा तालुक्यातील स्थानिक पातळीवरील सर्वच निवडणुकांत तिन्ही मातब्बर गट एकमेकांविरोधात नेहमीच उभे ठाकले जातात. विधानसभा निवडणुकीतही प्रत्येकाने ताकद अजमावली. त्यात शिवाजीराव नाईक सरस ठरले. त्यामुळे आता आगामी सर्व निवडणुकांत राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुखव या दोघा भाऊंनी हातात हात घालून गट्टी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे वाळवा-शिराळ्यात राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहे.विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी तोडून स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. याचा त्यांना मोठा फटकाही बसला. विकास आघाडीचे नेते शिवाजीराव नाईक यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून मोदी लाटेवर निवडणूक जिंकली. आता ते मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत. त्यांना मंत्रीपद मिळाल्यास त्यांची ताकद वाढणार आहे. याचा परिणाम दोघा भाऊंच्या राजकीय अस्तित्वावर झाला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या दोन भाऊंनी स्वतंत्रपणे मोर्चा काढून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आ. नाईक यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश व्हावा, अशी मागणी केली होती.या घटनेला जवळपास महिन्याभराचा कालावधी लोटला असला तरी, शासनाकडून अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. ‘एक से भले दो’ असे म्हणत सत्यजित देशमुख व मानसिंगराव नाईक यांनी हातात हात घालून १६ डिसेंबरला पुन्हा एकदा शासनाला जाग आणण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातून शेतकरी येण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. या दोघांच्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकविणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे या मोर्चामागे आमदार नाईक यांना धक्का देण्याची खेळी असल्याची चर्चा आहे.