शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

दोघा भाऊंची गट्टी अन् बदलाचे वारे

By admin | Updated: December 15, 2015 00:34 IST

शिराळ्यातील चित्र : शिवाजीराव नाईकांविरोधात राजकीय व्यूहरचना

अशोक पाटील-- इस्लामपूर -शिराळा तालुक्यातील स्थानिक पातळीवरील सर्वच निवडणुकांत तिन्ही मातब्बर गट एकमेकांविरोधात नेहमीच उभे ठाकले जातात. विधानसभा निवडणुकीतही प्रत्येकाने ताकद अजमावली. त्यात शिवाजीराव नाईक सरस ठरले. त्यामुळे आता आगामी सर्व निवडणुकांत राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुखव या दोघा भाऊंनी हातात हात घालून गट्टी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे वाळवा-शिराळ्यात राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहे.विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी तोडून स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. याचा त्यांना मोठा फटकाही बसला. विकास आघाडीचे नेते शिवाजीराव नाईक यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून मोदी लाटेवर निवडणूक जिंकली. आता ते मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत. त्यांना मंत्रीपद मिळाल्यास त्यांची ताकद वाढणार आहे. याचा परिणाम दोघा भाऊंच्या राजकीय अस्तित्वावर झाला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या दोन भाऊंनी स्वतंत्रपणे मोर्चा काढून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आ. नाईक यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश व्हावा, अशी मागणी केली होती.या घटनेला जवळपास महिन्याभराचा कालावधी लोटला असला तरी, शासनाकडून अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. ‘एक से भले दो’ असे म्हणत सत्यजित देशमुख व मानसिंगराव नाईक यांनी हातात हात घालून १६ डिसेंबरला पुन्हा एकदा शासनाला जाग आणण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातून शेतकरी येण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. या दोघांच्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकविणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे या मोर्चामागे आमदार नाईक यांना धक्का देण्याची खेळी असल्याची चर्चा आहे.